शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आठवडी बाजार रद्द: १५ लाखांचा भाजीपाला शेतकऱ्यांनी नेला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 13:00 IST

Weekly market canceled: आठवडी बाजारात भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा जवळपास १५ लाखांचा भाजीपाला परत न्यावा लागला.

बुलडाणा: कोरोना संक्रमण वाढण्याची भीती पाहता बुलडाण्यातील रविवारचा आठवडी बाजार दोन आठवड्यासाठी बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बुलडाण्याच्या आठवडी बाजारात भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा जवळपास १५ लाखांचा भाजीपाला परत न्यावा लागला.मुळात सकाळी होणारी हर्राशीच आठवडी बाजार बंद असल्याने होऊ शकली नाही. यासंदर्भात आधीच जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले होते. मात्र काही शेतकऱ्यांपर्यंत या संदर्भातील निरोप न पोहोचल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला त्यांना तसाच परत न्यावा लागला. त्यामुळे  शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला. 

बाजार बंदचा निर्णय का?जिल्ह्यात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. बुलडाणा येथील आठवडी बाजारात संपूर्ण जिल्ह्यातून व्यापारी, नागरिक येतात. त्यामुळे सुपरस्प्रेडरच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण आकलनापलीकडे होऊ शकते. हा मुद्दा गृहीत धरून आठवडी बाजार बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेही एकट्या बुलडाणा शहरातील कोरोना बाधितांचा दररोजचा आकडा हा ३० च्या घरात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही १५० पर्यंत बाधितांची संख्या जात नव्हती. ती आता दररोज २०० च्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी