शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचारास अधिकारी, कंत्राटदारांची स्वार्थी वागणूक कारणीभूत - सुबोध सावजी यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 18:34 IST

खामगाव: जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यातील शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार आहे.आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. मात्र, चार-पाच महिने उलटल्यानंतरही या भ्रष्टाचाराची चौकशी थंडबस्त्यात.यासंदर्भात जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला.

 

खामगाव:  बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार आहे. याबाबत वारंवार आवाज उठविल्यानंतर मुख्यसचिव, सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची  भेट घेवून त्यांना माहिती देण्यात आली त्यांच्याही चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. मात्र, चार-पाच महिने उलटल्यानंतरही या भ्रष्टाचाराची चौकशी थंडबस्त्यात असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला.स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी ते म्हणाले की, १ ते १६ जानेवारीच्या कालावधीत मेहकर तालुक्यातील १४६ गावांमध्ये संपर्क दौरा करण्यात आला. त्यानंतर २१ ते २७ जानेवारी दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील ६६ गावांमध्ये संपर्क दौरा करण्यात आला. यामध्ये दूषीत पाणी पुरवठ्यामुळे तालुक्यातील ३००-४०० जणांचा किडनी आजाराने मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यामध्ये सोनाळा १००, कळमखेड ४०, वरवट खंडेराव ३०-४०  तर लाडणापूरमध्ये १०० जणांचा समावेश आहे. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यामध्ये आरोग्य विषयक सुविधांचा अभाव असल्याचेही समोर आल्याचे माजी मंत्री सावजी यांनी नमूद केले. तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र तीन महिन्यांपासून बंद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाणी पुरवठा योजनेचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असून काही ठिकाणी पाईपलाईनचीही जोडणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी पाच वर्षांमध्ये १४० गाव पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार की नाही? याबाबत काही शाश्वती नाही. तथापि, या भागातील ४० गावांतील रस्त्यांचीही अतिशय दयनिय अवस्था झाली असून, या रस्त्याने मोटार सायकल चालविणेही  कठीण असल्याचेही सावजी यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन  समितीचे उपाध्यक्ष वा.रा.पिसे, चंद्रकांत माने,  संजय तारापुरे, डॉ. अविनाश झाडोकार, अ‍ॅड. गायगोळ आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाSubodh Savjiसुबोध सावजी