शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचारास अधिकारी, कंत्राटदारांची स्वार्थी वागणूक कारणीभूत - सुबोध सावजी यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 18:34 IST

खामगाव: जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यातील शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार आहे.आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. मात्र, चार-पाच महिने उलटल्यानंतरही या भ्रष्टाचाराची चौकशी थंडबस्त्यात.यासंदर्भात जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला.

 

खामगाव:  बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार आहे. याबाबत वारंवार आवाज उठविल्यानंतर मुख्यसचिव, सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची  भेट घेवून त्यांना माहिती देण्यात आली त्यांच्याही चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. मात्र, चार-पाच महिने उलटल्यानंतरही या भ्रष्टाचाराची चौकशी थंडबस्त्यात असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला.स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी ते म्हणाले की, १ ते १६ जानेवारीच्या कालावधीत मेहकर तालुक्यातील १४६ गावांमध्ये संपर्क दौरा करण्यात आला. त्यानंतर २१ ते २७ जानेवारी दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील ६६ गावांमध्ये संपर्क दौरा करण्यात आला. यामध्ये दूषीत पाणी पुरवठ्यामुळे तालुक्यातील ३००-४०० जणांचा किडनी आजाराने मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यामध्ये सोनाळा १००, कळमखेड ४०, वरवट खंडेराव ३०-४०  तर लाडणापूरमध्ये १०० जणांचा समावेश आहे. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यामध्ये आरोग्य विषयक सुविधांचा अभाव असल्याचेही समोर आल्याचे माजी मंत्री सावजी यांनी नमूद केले. तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र तीन महिन्यांपासून बंद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाणी पुरवठा योजनेचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असून काही ठिकाणी पाईपलाईनचीही जोडणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी पाच वर्षांमध्ये १४० गाव पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार की नाही? याबाबत काही शाश्वती नाही. तथापि, या भागातील ४० गावांतील रस्त्यांचीही अतिशय दयनिय अवस्था झाली असून, या रस्त्याने मोटार सायकल चालविणेही  कठीण असल्याचेही सावजी यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन  समितीचे उपाध्यक्ष वा.रा.पिसे, चंद्रकांत माने,  संजय तारापुरे, डॉ. अविनाश झाडोकार, अ‍ॅड. गायगोळ आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाSubodh Savjiसुबोध सावजी