शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

वान धरणातील जलसाठा तीन दिवसात १२ टक्क्यांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 2:29 PM

वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात बुधवार पर्यंत ३६.८४ जल साठा जमा झाला आहे.

- अझहर अलीसंग्रामपुर : अकोला, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर बांधलेले हनुमान सागर धरणाच्या जलसाठ्यात तीन दिवसापासुन  वाढ होत आहे. पावसाळा सुरू झाला तेव्हा पासुन धरणाच्या जलसाठ्यात वाढ होताना दिसत नव्हती. चार दिवस अगोदर या धरणात २५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यात आता झपाट्याने वाढ होताना दिसत असुन, तीन दिवसामध्ये १२ टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ झाली. धरणामध्ये पाण्याची आवक वाढतीवर आहे. गत पाच दिवसापासुन पावसाच्या चांगल्याच सरी कोसळत असुन धरण परीसरातही वरूणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या जल साठ्यात वाढ होत आहे. वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात बुधवार पर्यंत ३६.८४ जल साठा जमा झाला आहे. या धरणातुन अकोला जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर व खारपान पट्टयातील संग्रामपुर व जळगाव जा. तालुक्यातील १४० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. वान नदी पात्रावर उभारण्यात आलेले हे धरण शेकडो गावातील लाखो लोकांची तहान भागवत आहे. यावर विज निर्मिती संच उभारण्यात आला असुन त्या संचाची क्षमता १ हजार ५०० किलो मेगावँट आहे. येथे एक हजार किलो मेगावँट विज निर्मिती करण्यात येत असुन अकोला जिल्ह्यातील हिवरखेड उप केंद्राला विज पुरवठा करण्यात येतो. तसेच अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला या धरणातुन पाठाच्या माध्यमातुन पाणी मिळते. त्यामुळे वारी हनुमान येथील धरण या भागातील जनतेसाठी जिवनदायी ठरत आहे. धरणामधील जलसाठ्यात वाढ होत असल्याने या भागात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणि उपलब्ध होणार आहे. सातपुडा पर्वत रांगेतुन वाहत येत असलेली वान नदीचा उगम मध्यप्रदेशातुन असल्याने पर प्रांतात पाऊस पडल्यास या नदीला मोठ्या प्रमाणात पाणि येते सद्यास्थिती मध्यप्रदेशासह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने हनुमान सागर धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. धरण परीसरात अशाच प्रकारे पाऊस पडला तर वारी येथील धरण लवकर भरण्याची शक्यता आहे. या धरणात सोमवार पासुन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असुन बुधवारी सकाळ पर्यंत धरणामध्ये ३६.८४ टक्के जलसाठा जमा झाला असल्याची माहीती वान प्रकल्पाकडुन प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पbuldhanaबुलडाणाAkolaअकोलाSangrampurसंग्रामपूर