शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पाणीटंचाई: महिलांचा खामगाव पालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 14:28 IST

मंगळवारी दुपारी १ वाजता भर उन्हात शंकर नगरातील महिला व बच्चे कंपनींनी घागर मोर्चा काढला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील पाणीटंचाईचे निवारण करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येते. खामगाव शहराला सध्या गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. यावर्षी मागील तीन महिन्यापासून खामगाव शहरातील विविध भागात १२ ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रासून गेले आहेत. भर उन्हात पाण्यासाठी महिला, मुले हातपंपावर पाणी भरताना दिसतात. पालिका प्रशासनातर्फे शिर्ला डॅमवरून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुुरु आहे. मात्र एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी अद्याप खामगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होवू शकला नाही. खामगाव शहरातील काही भागात पालिकेची नळयोजना सुद्धा पोहचू शकली नाही. ़अशा भागात शहरातील सामाजिक कायकर्त्यांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र टँकरवर तहान भागवणे जिकरीचे झाले आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता भर उन्हात शंकर नगरातील महिला व बच्चे कंपनींनी घागर मोर्चा काढला होता. पंधरा दिवसानंतर आमच्या भागात पाणी पुरवठा होत आहे. पालिका प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन तथा तोंडी सांगूनही अद्याप या भागातील पाणीपुरवठा सुरुळीत होवू शकला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.कायमस्वरुपी उपाययोजनांची गरजपाणीटंचाईची ाीषणता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या खामगाव व शेगाव तालुक्यातील ६४ गावांना दररोज टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरवर तहान भागत नसल्याने अनेक ठिकाणी खाजगी विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. गत ३ वर्षापासून सातत्याने बुलढाणा जिल्ह्यात कमी पाऊस होत आहे. मागील वर्षी तर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला. यामुळे धरणे भरली नाहीत. विहिरींना पुरेसे पाणी आले नाही. काही धरणात पाणी आले पण तेही कमी. खामगाव तालुक्यातील परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. तालुक्यातील एक तलाव पुर्णत: भरला नव्हता. अनेक धरणात तर पूर्ण पावसाळ्यात थेंबभरही पाणी आले नाही. त्यामुळे तालुक्यात पावसाळ्यापासून पाण्याची टंचाई जाणवत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाई