शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा तालुक्यातील १२ गावात आतापासूनच पाणीटंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:09 IST

नांदुरा: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तालुक्यातील गावांना आ तापासूनच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी पेक्षा भीषण पाणीटंचाई यावर्षी तालुक्यात राहणार असून, प्रशासनाने  सजग राहण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देफेब्रुवारीच्या अखेरीसच पाण्यासाठी भटकंती! 

संदीप गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तालुक्यातील गावांना आतापासूनच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी पेक्षा भीषण पाणीटंचाई यावर्षी तालुक्यात राहणार असून, प्रशासनाने  सजग राहण्याची आवश्यकता आहे.नांदुरा तालुक्यातील बहुतांश गावामध्ये विहीर बोअरवेलच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. काही गावांना पूर्णामायचा आधार आहे. दरवर्षी  घटणार्‍या भूजल पातळीमुळे विहीर किंवा बोअरवेल बाराही महीने  पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात गावाशेजारील  एखाद्या पाणी उपलब्ध असणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतातील विहीरी व  बोअरवेलचे अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु  यावर्षी भूजल पातळीत झालेल्या लक्षणीय घटीमुळे पाणी मिळणे कठीण  झाले आहे. मागील वर्षी तालुक्यातील २३ गावामध्ये २४ ठिकाणी  अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात आला होता; मात्र यावर्षी  जानेवारीतच १२ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत  असून, मार्चमध्ये अध्र्याधिक तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची  शक्यता आहे. पंचायत समितीमार्फत ८ गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव  तहसील कार्यालयाकडे तर ४ गावचे प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा  विभागाकडे परवानगीसाठी पाठविले असून, तहसील कार्यालयाने आता पर्यंत ५ गावांना अधिग्रहणासाठी परवानगी दिली आहे.

या गावात पाणीटंचाईची झळनांदुरा तालुक्यातील सिरसोडी, काटी, हिंगणे गव्हाड,. मामूलवाडी,  माळेगाव, पिंपळखुटा, विटाळी, शेलगाव, आंबोड.ा, चांदुर बिस्वा,  खेडा, मोमिनाबाद, नवे खेडगाव येथे भीषण पाणीटंचाईचा सामना  करावा लागणार असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :WaterपाणीNanduraनांदूरा