शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
4
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
5
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
6
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
7
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
8
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
10
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
11
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
12
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
13
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
14
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
15
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
16
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
17
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
18
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
19
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
20
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला

चिखली तालुक्यात ३१ गावांमध्ये पाणी समस्या गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:18 AM

तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहुतांश तलावांची पाण्याची मोठय़ा प्रमाणात पातळी खालावल्याने सद्यस्थितीत ३१ गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून, उन्हाच्या चटक्यांबरोबर पाणीटंचाईची ही समस्या दिवसागणिक भीषण रूप धारण करणारी असल्याने येत्या काळात पाणीटंचाईग्रस्त गावांच्या यादीत आणखी काही गावांची भर पडणार असून, यामध्ये चिखली शहराचाही समावेश आहे.

ठळक मुद्देसहा गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण एका गावास टँकरने पाणी पाणी पुरवठा

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तालुक्यात यावर्षी दिलासादायक पाऊस पडला असला तरी पाणीपुरवठय़ाच्या जलस्रोतांमध्ये  जलसाठा होऊ न शकल्याने अनेक गावांत पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. तालुक्यातील मुख्य नदी पैनगंगेला तसेच इतर सर्वच लहान-मोठय़ा नद्यांना यावर्षी एकही अपेक्षित  पूर आला नाही. त्यामुळे आज रोजी अनेक नद्यांचे पात्न कोरड्या स्थितीत आहे, तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहुतांश तलावांची पाण्याची मोठय़ा प्रमाणात पातळी खालावल्याने सद्यस्थितीत ३१ गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून, उन्हाच्या चटक्यांबरोबर पाणीटंचाईची ही समस्या दिवसागणिक भीषण रूप धारण करणारी असल्याने येत्या काळात पाणीटंचाईग्रस्त गावांच्या यादीत आणखी काही गावांची भर पडणार असून, यामध्ये चिखली शहराचाही समावेश आहे.शहरासह ग्रामीण भागात राहणार्‍या  नागरिकांना दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. उन्हाळय़ातील तळपत्या उन्हासोबत ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत असून, तीव्र पाणीटंचाईचा समाना करावा लागणार्‍या गावांच्या यादीत अधिक भर पडली आहे. तालुक्यातील १४४ गावांपैकी चिखली शहरासह ४१ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात गत पावसाळय़ात १ जून २0१७ ते ३१ ऑक्टोबर २0१७ दरम्यान एकूण ७४0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; मात्र तरीही पाणीपुरवठय़ाच्या प्रमुख स्रोतांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात जलसाठा होऊ शकला नाही. तालुक्यातील लहान-मोठे, प्रकल्प, पाझर तलाव, नद्या, विहिरी यावरच पाणीपुरवठय़ाची संपूर्ण मदार अवलंबून असते; मात्र यंदा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच या जलस्रोतांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. तर सद्यस्थितीत जवळपास काही जलशये कोरडे पडले आहेत. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ पंचायत समितीने चंदनपूर, मेरा खु., धोत्रा भनगोजी, पळसखेड जयंती, दिवठाणा, उंद्री या गावांच्या विहीर अधिग्रहणाच्या प्रस्तावास दिलेल्या मंजुरीवरून ऑक्टोबरपासून अधिग्रहित केलेल्या विहिरींवरून या गावांचा पाणीपुरवठा सुरू आहे. या व्यतिरिक्त शेलसूर, खोर, सावरगाव डुकरे, ईसोली, पळसखेड जयंती, दिवठणा, चांधई, धानोरी, सावरखेड कु., साकेगाव, गोदरी, पळसखेड दौलत, कारखेड, पेठ, वळती, धोडप, मालगणी, रानअंत्री, हातणी, मेरा बु., वैरागड, किन्ही सवडद, अंत्रीकोळी, वाघापूर, आमखेड, अंत्री खेडेकर, गांगलगाव, सवणा ही गावे तीव्र पाणीटंचाईच्या सावटाखाली असल्याने या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, दरवर्षी उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या निवारणार्थ शासनस्तरावर राबविण्यात येणार्‍या योजना तोकड्या पडत असून, नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रचंड पायपीट पाचविला पुजलेली आहे. 

‘थ्री व्हॉल्व्ह सिस्टीम’ची तांत्रिक अडचण कायम चिखली शहराला पाणीपुरवठा होणार्‍या पेनटाकळी प्रकल्पातून चिखली शहराची तहान भागविली जाते; मात्र पालिकेच्या सदोष वितरण व्यवस्थेमुळे शहराला कायम १0 ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून शहराला भेडसावत असल्याने शहराला ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा या हेतूने प्रकल्पातून पाणी उपसा करणार्‍या जुनाट पंप व मोटारींच्या जागी पालिकेने सुमारे सव्वा कोटी रुपयांचे पंप, मोटार व इतर साहित्य बसविले आहे; मात्र या पश्‍चातही शहराच्या पाणीपुरवठय़ात सुधारणा झालेली नाही. शहराच्या या समस्येवर उपायकारक ठरणारी थ्री व्हॉल्व्ह सिस्टीम गत काही वर्षांप्रमाणेच अद्यापही तांत्रिक अडचणींत असून, या तांत्रिक फेर्‍यात फसलेली ही योजना केव्हा कार्यान्वियत होणार याकडे लक्ष लागले आहे.

 ७ कोटी खचरूनही मेरा बु. बारमाही तहानलेलेतालुक्यातील मेरा बु. हे सुमारे ८ हजार ५२४ लोकसंख्या वस्तीचे हे गाव वर्षातील १२ महिने तहानलेले असते. गत दहा वर्षांपासून गावास तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असल्याने ग्रामस्थांना हिवाळा व पावसाळय़ातदेखील पाणी विकत घ्यावे लागते. यावर उपाय म्हणून या गावात खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आठवड्यातून २१ फेर्‍यांद्वारे गावाची तहान भागविण्याचा प्रयत्न होत असला तरी अनेक ग्रामस्थांना पाणी वेळेवर मिळत नसल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड पायपीट करण्यासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विशेष बाब म्हणजे गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीने ७ कोटी ३ लाख रुपयांचा निधी खर्च केलेला असताना येथे बाराही महिने तीव्र पाणीटंचाई आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी