शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

खडकपूर्णावरील तीनही बंधाऱ्यांत पोहोचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:47 IST

 दुसरबीड : खडकपूर्णा नदीकाठच्या तीन तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकल्पातून सहा दलघमी पाणी सोडल्यामुळे बहुतांश प्रमाणात मिटला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने तातडीने बैठक घेऊन चार मे रोजी संत चोखा सागरातून सहा दलघमी पाणी खडकपूर्णा नदीत सोडले होते.बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक गणल्या जाणार्या देवखेड (लिंगा) कोल्हापूरी बंधार्यापर्यंत हे पाणी पोहोचले आहे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे या गावांमध्ये आता नागरिकांच्या चेहऱ्यांवर हास्य उमटले आहे.

 

 दुसरबीड : खडकपूर्णा नदीकाठच्या तीन तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकल्पातून सहा दलघमी पाणी सोडल्यामुळे बहुतांश प्रमाणात मिटला आहे. खडकपूर्णा नदीवरील तीनही कोल्हापूरी बंधार्यामध्ये जवळपास एक दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाळ््यातील किमान आगामी दीड महिन्याची पिण्याच्या पाण्याची नदीकाठच्या गावांची चिंता मिटली आहे. नदीकाठच्या गावांची पाणीटंचाईची समस्या पाहता प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन चार मे रोजी संत चोखा सागरातून सहा दलघमी पाणी खडकपूर्णा नदीत सोडले होते. वास्तविक कोरड्या पडलेल्या नदीत पाणी सोडणे ही मोठी जोखीम होती. त्याउपरही प्रशासाने पाणीसमस्येची गंभीरता पाहता नदी पात्रात पाणी सोडले होते. सहा मे रोजी पर्यंत हे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक गणल्या जाणार्या देवखेड (लिंगा) कोल्हापूरी बंधार्यापर्यंत हे पाणी पोहोचले आहे. २८ घनमीटर प्रती सेकंद या वेगाने हे पाणी सोडण्यात आले होते. पाणी उपलब्ध झाल्यामुळे या गावांमध्ये आता नागरिकांच्या चेहऱ्यांवर हास्य उमटले आहे. त्यामुळे टंचाई काळात पाण्याचा मोठा अपव्य होत असतााही ४४ गावांसाठी पाणी सोडून प्रशासनाने त्यांची माणूसकी दाखवली असली तरी आता या गावांवर पाणी जपून वापरण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. नाही म्हणायला नदी काठच्या विहीरींनाही प्रकल्पातून सोडलेल्या या पाण्याचा मोठा फायदा झाला असल्याचे सुत्रांनी सांगितले.

तीनही बंधाऱ्यांत ०.७५ दलघमी जलसाठा

खडकपूर्णा नदीपात्रामध्ये निमगाव वायाळ, दुसरबीड आणि देवखेड (लिंगा) हे तीन कोल्हापूरी बंधारे आहे. या तीनही बंधार्यांची पाणीसाठवण क्षमता ही एक दलघमी आहे. मात्र उन्हाळ््याची परिस्थिती व सोडलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा अपव्य पाहता ०.५ मीटर लांबीच्या लाकडी फळ््या टाकून हे ०.२५ दलघमी प्रत्येकी पाणीसाठा या तीनही बंधार्यामध्ये करण्यात आला आहे. उर्वरित पाणी हे जमीनीत झिरपले तर काही पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर