शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खडकपूर्णावरील तीनही बंधाऱ्यांत पोहोचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:47 IST

 दुसरबीड : खडकपूर्णा नदीकाठच्या तीन तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकल्पातून सहा दलघमी पाणी सोडल्यामुळे बहुतांश प्रमाणात मिटला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने तातडीने बैठक घेऊन चार मे रोजी संत चोखा सागरातून सहा दलघमी पाणी खडकपूर्णा नदीत सोडले होते.बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक गणल्या जाणार्या देवखेड (लिंगा) कोल्हापूरी बंधार्यापर्यंत हे पाणी पोहोचले आहे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे या गावांमध्ये आता नागरिकांच्या चेहऱ्यांवर हास्य उमटले आहे.

 

 दुसरबीड : खडकपूर्णा नदीकाठच्या तीन तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकल्पातून सहा दलघमी पाणी सोडल्यामुळे बहुतांश प्रमाणात मिटला आहे. खडकपूर्णा नदीवरील तीनही कोल्हापूरी बंधार्यामध्ये जवळपास एक दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाळ््यातील किमान आगामी दीड महिन्याची पिण्याच्या पाण्याची नदीकाठच्या गावांची चिंता मिटली आहे. नदीकाठच्या गावांची पाणीटंचाईची समस्या पाहता प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन चार मे रोजी संत चोखा सागरातून सहा दलघमी पाणी खडकपूर्णा नदीत सोडले होते. वास्तविक कोरड्या पडलेल्या नदीत पाणी सोडणे ही मोठी जोखीम होती. त्याउपरही प्रशासाने पाणीसमस्येची गंभीरता पाहता नदी पात्रात पाणी सोडले होते. सहा मे रोजी पर्यंत हे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक गणल्या जाणार्या देवखेड (लिंगा) कोल्हापूरी बंधार्यापर्यंत हे पाणी पोहोचले आहे. २८ घनमीटर प्रती सेकंद या वेगाने हे पाणी सोडण्यात आले होते. पाणी उपलब्ध झाल्यामुळे या गावांमध्ये आता नागरिकांच्या चेहऱ्यांवर हास्य उमटले आहे. त्यामुळे टंचाई काळात पाण्याचा मोठा अपव्य होत असतााही ४४ गावांसाठी पाणी सोडून प्रशासनाने त्यांची माणूसकी दाखवली असली तरी आता या गावांवर पाणी जपून वापरण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. नाही म्हणायला नदी काठच्या विहीरींनाही प्रकल्पातून सोडलेल्या या पाण्याचा मोठा फायदा झाला असल्याचे सुत्रांनी सांगितले.

तीनही बंधाऱ्यांत ०.७५ दलघमी जलसाठा

खडकपूर्णा नदीपात्रामध्ये निमगाव वायाळ, दुसरबीड आणि देवखेड (लिंगा) हे तीन कोल्हापूरी बंधारे आहे. या तीनही बंधार्यांची पाणीसाठवण क्षमता ही एक दलघमी आहे. मात्र उन्हाळ््याची परिस्थिती व सोडलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा अपव्य पाहता ०.५ मीटर लांबीच्या लाकडी फळ््या टाकून हे ०.२५ दलघमी प्रत्येकी पाणीसाठा या तीनही बंधार्यामध्ये करण्यात आला आहे. उर्वरित पाणी हे जमीनीत झिरपले तर काही पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर