शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

पाणी उशाला, कोरड घशाला; वरवट बकाल तालुक्याची स्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:50 IST

वरवट बकाल : तालुक्यातील  वरवट बकाल ग्राम पंचायतच्या  दुर्लक्षामुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी असूनही  वरवट बकाल ग्रामस्थांच्या घशाला कोरड असल्याचे चित्र दिसून येत  आहे. 

ठळक मुद्देपाणी पुरवठा विस्कळीत

नारायण सावतकर। लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : तालुक्यातील  वरवट बकाल ग्राम पंचायतच्या  दुर्लक्षामुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी असूनही  वरवट बकाल ग्रामस्थांच्या घशाला कोरड असल्याचे चित्र दिसून येत  आहे. वरवट बकाल ग्राम पंचायत अंतर्गत एकूण सुमारे पाच ते साडे पाच  हजार लोकसंख्या असून, ग्रामपंचायतकडे एक विहीर व एक टूबेल  तसेच भाडे तत्त्वावर एक टूबेल आहे; मात्र गावात पाणी पुरवठा सुरळीत  होत नाही. या गंभीर समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस् थांमधून होत आहे.   ग्राम विकास अधिकारी हे पद गेल्या कित्येक  महिन्यांपासून प्रभारी असल्याने ते  सुद्धा मुख्यालयी राहत नाहीत; तसेच   ग्रामपंचायतला दिलेल्या दिवसालासुद्धा त्यांची गैरहजेरी राहते. त्यामुळे  गावातील विविध कामे खोळंबली आहेत.  ग्रामपंचायतकडे काकनवाडा शिवारात असलेल्या टूबेलवरून पाणी  पुरवठा येत असल्याने सदर पाइप लाइनमधून पाणी गळतीचे प्रमाण  जास्त आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय होताना  दिसून येतो. परिणामी गावात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. अनेक  वेळा  ग्रामपंचायतकडून पाइप लाइन दुरुस्ती करण्यात आली; मात्र ही  समस्या कायमच दिसून येत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढला असून,  पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे गावात पाणी समस्या  निर्माण झाली आहे. याकरिता पाइपलाइन गळती थांबून त्यावर नवीन  पाइपलाइन करावी व गाव योजनेचे पाणीपुरवठा लवकर सुरु करण्यात  यावा, अशी मागणी वरवट बकाल ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे. 

ग्रामविकास अधिकार्‍यांचे दुर्लक्षगावातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असून, याकडे ग्रामविकास  अधिकार्‍यांचे दुर्लक्ष दिसून येते. तसेच दिलेल्या दिवसाला ग्रामविकास  अधिकारी गावात हजर राहत नसल्याने नागरिकांचे अनेक कामे प्रलंबित  पडत आहेत. ग्राम विकास अधिकारी कोरे यांचा शनिवार हा दिवस  वरवट ग्रामपंचायत येथे असताना ते गैरहजर होते. दरम्यान, यासंदर्भात  कोरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

पाण्याचा अपव्ययवरवट बकाल गावाला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन वारंवार फुटत  आहे. पाइपलाइन लिकेज होण्याचा या प्रकारामुळे पाण्याचा अ पव्ययसुद्धा वाढला आहे. त्यामुळे वरवट बकाल ग्रामस्थांना कृत्रिम पाणी  टंचाईचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन पाइपलाइन प क्की करण्याची मागणी होत आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी