शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

पाणी उशाला, कोरड घशाला; वरवट बकाल तालुक्याची स्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:50 IST

वरवट बकाल : तालुक्यातील  वरवट बकाल ग्राम पंचायतच्या  दुर्लक्षामुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी असूनही  वरवट बकाल ग्रामस्थांच्या घशाला कोरड असल्याचे चित्र दिसून येत  आहे. 

ठळक मुद्देपाणी पुरवठा विस्कळीत

नारायण सावतकर। लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : तालुक्यातील  वरवट बकाल ग्राम पंचायतच्या  दुर्लक्षामुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी असूनही  वरवट बकाल ग्रामस्थांच्या घशाला कोरड असल्याचे चित्र दिसून येत  आहे. वरवट बकाल ग्राम पंचायत अंतर्गत एकूण सुमारे पाच ते साडे पाच  हजार लोकसंख्या असून, ग्रामपंचायतकडे एक विहीर व एक टूबेल  तसेच भाडे तत्त्वावर एक टूबेल आहे; मात्र गावात पाणी पुरवठा सुरळीत  होत नाही. या गंभीर समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस् थांमधून होत आहे.   ग्राम विकास अधिकारी हे पद गेल्या कित्येक  महिन्यांपासून प्रभारी असल्याने ते  सुद्धा मुख्यालयी राहत नाहीत; तसेच   ग्रामपंचायतला दिलेल्या दिवसालासुद्धा त्यांची गैरहजेरी राहते. त्यामुळे  गावातील विविध कामे खोळंबली आहेत.  ग्रामपंचायतकडे काकनवाडा शिवारात असलेल्या टूबेलवरून पाणी  पुरवठा येत असल्याने सदर पाइप लाइनमधून पाणी गळतीचे प्रमाण  जास्त आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय होताना  दिसून येतो. परिणामी गावात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. अनेक  वेळा  ग्रामपंचायतकडून पाइप लाइन दुरुस्ती करण्यात आली; मात्र ही  समस्या कायमच दिसून येत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढला असून,  पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे गावात पाणी समस्या  निर्माण झाली आहे. याकरिता पाइपलाइन गळती थांबून त्यावर नवीन  पाइपलाइन करावी व गाव योजनेचे पाणीपुरवठा लवकर सुरु करण्यात  यावा, अशी मागणी वरवट बकाल ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे. 

ग्रामविकास अधिकार्‍यांचे दुर्लक्षगावातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असून, याकडे ग्रामविकास  अधिकार्‍यांचे दुर्लक्ष दिसून येते. तसेच दिलेल्या दिवसाला ग्रामविकास  अधिकारी गावात हजर राहत नसल्याने नागरिकांचे अनेक कामे प्रलंबित  पडत आहेत. ग्राम विकास अधिकारी कोरे यांचा शनिवार हा दिवस  वरवट ग्रामपंचायत येथे असताना ते गैरहजर होते. दरम्यान, यासंदर्भात  कोरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

पाण्याचा अपव्ययवरवट बकाल गावाला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन वारंवार फुटत  आहे. पाइपलाइन लिकेज होण्याचा या प्रकारामुळे पाण्याचा अ पव्ययसुद्धा वाढला आहे. त्यामुळे वरवट बकाल ग्रामस्थांना कृत्रिम पाणी  टंचाईचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन पाइपलाइन प क्की करण्याची मागणी होत आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी