शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

पाणी उशाला, कोरड घशाला; वरवट बकाल तालुक्याची स्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:50 IST

वरवट बकाल : तालुक्यातील  वरवट बकाल ग्राम पंचायतच्या  दुर्लक्षामुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी असूनही  वरवट बकाल ग्रामस्थांच्या घशाला कोरड असल्याचे चित्र दिसून येत  आहे. 

ठळक मुद्देपाणी पुरवठा विस्कळीत

नारायण सावतकर। लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : तालुक्यातील  वरवट बकाल ग्राम पंचायतच्या  दुर्लक्षामुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी असूनही  वरवट बकाल ग्रामस्थांच्या घशाला कोरड असल्याचे चित्र दिसून येत  आहे. वरवट बकाल ग्राम पंचायत अंतर्गत एकूण सुमारे पाच ते साडे पाच  हजार लोकसंख्या असून, ग्रामपंचायतकडे एक विहीर व एक टूबेल  तसेच भाडे तत्त्वावर एक टूबेल आहे; मात्र गावात पाणी पुरवठा सुरळीत  होत नाही. या गंभीर समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस् थांमधून होत आहे.   ग्राम विकास अधिकारी हे पद गेल्या कित्येक  महिन्यांपासून प्रभारी असल्याने ते  सुद्धा मुख्यालयी राहत नाहीत; तसेच   ग्रामपंचायतला दिलेल्या दिवसालासुद्धा त्यांची गैरहजेरी राहते. त्यामुळे  गावातील विविध कामे खोळंबली आहेत.  ग्रामपंचायतकडे काकनवाडा शिवारात असलेल्या टूबेलवरून पाणी  पुरवठा येत असल्याने सदर पाइप लाइनमधून पाणी गळतीचे प्रमाण  जास्त आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय होताना  दिसून येतो. परिणामी गावात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. अनेक  वेळा  ग्रामपंचायतकडून पाइप लाइन दुरुस्ती करण्यात आली; मात्र ही  समस्या कायमच दिसून येत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढला असून,  पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे गावात पाणी समस्या  निर्माण झाली आहे. याकरिता पाइपलाइन गळती थांबून त्यावर नवीन  पाइपलाइन करावी व गाव योजनेचे पाणीपुरवठा लवकर सुरु करण्यात  यावा, अशी मागणी वरवट बकाल ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे. 

ग्रामविकास अधिकार्‍यांचे दुर्लक्षगावातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असून, याकडे ग्रामविकास  अधिकार्‍यांचे दुर्लक्ष दिसून येते. तसेच दिलेल्या दिवसाला ग्रामविकास  अधिकारी गावात हजर राहत नसल्याने नागरिकांचे अनेक कामे प्रलंबित  पडत आहेत. ग्राम विकास अधिकारी कोरे यांचा शनिवार हा दिवस  वरवट ग्रामपंचायत येथे असताना ते गैरहजर होते. दरम्यान, यासंदर्भात  कोरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

पाण्याचा अपव्ययवरवट बकाल गावाला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन वारंवार फुटत  आहे. पाइपलाइन लिकेज होण्याचा या प्रकारामुळे पाण्याचा अ पव्ययसुद्धा वाढला आहे. त्यामुळे वरवट बकाल ग्रामस्थांना कृत्रिम पाणी  टंचाईचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन पाइपलाइन प क्की करण्याची मागणी होत आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी