शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

६00 हेक्टर शेतात पाणी

By admin | Updated: December 11, 2015 02:37 IST

उपसा सिंचन योजनेचे काम सुमार दर्जाचे; खडकपूर्णेचे पाणी शेतक-यांच्या मुळावर.

चिखली (जि. बुलडाणा): खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत झालेल्या उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक ४ व टप्पा क्रमांक ३ अंतर्गत मुरादपूर फाटा ते खैरव शिवरापर्यंंत कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने खडकपूर्णेचे पाणी तालुक्यातील भरोसा, वसंतनगर, मुरादपूर व शेजारील डो्रढा येथील शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे. कालव्याशेजारील शेतात पाणी पाझरले असून, सुमारे ६00 हेक्टर शेती चिबडल्याने सर्वत्र रब्बी हंगामातील पिके बहरली असताना उपरोक्त गावातील लाभार्थी शेतकर्‍यांची अद्याप पेरणीदेखील झाली नसून, प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. जिल्हय़ातील महत्त्वाकांक्षी खडकपूर्णा प्रकल्पामुळे सुमारे १३ हजार हेक्टराहून अधिक कोरडवाहू शेतजमीन ओलिताखाली आली आहे. यात वाढ होऊन चिखली तालुक्यातील शेतकर्‍यांनाही सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील भरोसा येथे पंप हाऊसची निर्मिती करण्यात येऊन मुख्य कालवा व उपसा सिंचन टप्पा क्रमांक ३ चे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. दरम्यान, या कालव्यात पाणी सोडल्यामुळे सतत दुष्काळाचा सामना करणार्‍या या भागातील शेतकर्‍यांची जमीन ओलिताखाली आल्याचे पाहून शेतकर्‍यांमध्ये कमालीचे चैतन्य पसरले होते; मात्र कालव्याचे कंत्राट घेणार्‍या कंत्राटदाराने अंचरवाडी ते भरोसा येथील पंप हाऊसपर्यंत केलेल्या कालव्यात कमी सिमेंट व वाळूऐवजी गिट्टीची चुरी वापरून निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी पाझरून कालव्याशेजारील शेतात शिरले आहे. या पाण्यामुळे भरोसा येथील सरस्वती राऊत, कृष्णा शेटे, शिवाजी थुट्टे, दत्तात्रय मुळे, एकनाथ शेरे, डिगांबर राठोड, संतोष शेरे, रामदास राऊत, राजेंद्र राऊत, अशोक जाधव, नामदेव थुट्टे, नामदेव राऊत, सुनंदा जाधव, भास्कर जाधव, शे. कदीर शे. बाबन, विठ्ठल थुट्टे, ज्ञानेश्‍वर थुट्टे, किसन गवई, देवीदास जाधव तर वसंतनगर येथील उक्रमा राठोड, भिकाभाई चव्हाण, गोविंद राठोड, साहेबराव राठोड, मोहन चव्हाण, विनोद राठोड, गिरजाबाई राठोड, तुकाराम चव्हाण, रेखा चव्हाण, साहेबराव चव्हाण, बाबुराव चव्हाण, सुगदेव चव्हाण, मांगू चव्हाण, बाबुराव चव्हाण, दीपक चव्हाण आदी शेतकर्‍यांची रब्बी हंगामाची पेरणीसुद्धा अद्याप झालेली नाही. तथापि, यावर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके वाचविण्यासाठी कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. तत्पूर्वी पंप हाऊसद्वारे कालव्यात पाणी सोडण्याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले होते. त्यामुळे उपरोक्त लाभार्थी शेतकर्‍यांच्या जमिनीची अशीच दयनीय अवस्था होऊन खरिपातील पिकेदेखील नष्ट होऊन नुकसान सोसावे लागले. याबाबत शेतकर्‍यांनी वेळोवेळी तक्रार करून तसेच नुकसान भरपाई मागणी करूनही त्याची साधी दखलही घेतली जात नसल्याने या शेतकर्‍यांच्या हरित क्रांतीचे स्वप्न भंगले आहे. काम अपूर्ण असतानाही सर्व देयके निकाली मुख्य कालवा व उपसा सिंचन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध होऊन तसेच कालव्यावरील रोहडा फाट्यानजीक असलेले पाणी वळविण्याचे किंवा बंद करण्याचे गेट बसविले नसतानाही संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचे दर्शवून प्रशासनाकडून सर्व बिले पास करून घेतली आहेत. रोहडा फाट्यानजीक कालव्यास गेट नसल्यामुळे पाणी सोडणे अथवा बंद करण्यासाठी कालव्यात प्रत्येक वेळी मुरूम टाकून बांध तयार करण्यात येतो त्यामुळे पाण्याचाही मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होत असताना संबंधित बांधकाम ठेकेदाराकडून झालेल्या कामाची तपासणी न करता बिले पास केल्याचा प्रताप अधिकारी वर्गाने केला आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केल्या जात आहे.