शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यातून जलजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:56 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये सध्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून जलजागृती करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये सध्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून जलजागृती करण्यात येत आहे.केंद्र शासनाच्या पाण्याच्या वाढत्या दुर्भिक्षावर उपाय शोधण्यासाठी व प्रभावी उपाय योजना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालय स्थापन केले आहे. या मंत्रालया अंतर्गत देशभरात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यांचा समावेश अभियानात करण्यात आला आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये जलजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळां - शाळांमधून कार्यक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. वरवट बकाल ता. संग्रामपूर येथील नागेश्वर महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून पाणी वाचविण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. शालेय जीवनापासून पाणी बचतीचा संस्कार होणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सहभागाने जल जागृती करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. एकलारा बानोदा येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी नाटीका सादर केली. या नाटीकेतून पाण्याअभावी सुंदर वसुंधरेचा होणारा विनाश यामध्ये दाखविण्यात आला. जलशक्ती अभियानातून विद्यार्थी जलजागृती करीत असल्यामुळे विद्यार्थीदशेतच त्यांच्यावर जलसंस्कार बिंबविल्या जात आहे.(प्रतिनिधी)जलशक्तीचा जागरङ्घबुलडाणा: शासनाने सुरू केलल्या जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून अनेकविध उपक्रमांमधून जलशक्तीचा जागर करण्यात येत आहे. त्यानुसार २२ जुलै रोजी संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील शिवशंकर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. तसेच गावात जल जागृतीचा संदेश देणारी रॅली काढण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक आर. ओ. राठी, सहायक शिक्षण पी. एन. नागोलकर, सहायक शिक्षीका एम. जी. सोळंके, सहायक शिक्षीका पी. के. जवंजाळ, सहायक शिक्षक एम. एच. रौंदळे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पातुर्डा येथील जिल्हा परिषद शाळेत रांगोळी स्पर्धा २३ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. या रांगोळी स्पर्धेतून ३५ विद्यार्थीनींनी जलजागृतीचा संदेश दिला. जलशक्ती अभियानातून जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. जिल्हा परिषद विद्यालय, पातुर्डा येथे प्राचार्य एस. के देशपांडे, सहायक शिक्षीका व्ही. व्ही पाठक, शिक्षीका पी. एच. मानकर, आशा परेश पहुरकार, ममता संजय खांडे, मार्गदर्शक शिक्षक पी. एस सपकाळ उपस्थित होते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोदSangrampurसंग्रामपूरStudentविद्यार्थी