शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यातून जलजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:56 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये सध्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून जलजागृती करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये सध्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून जलजागृती करण्यात येत आहे.केंद्र शासनाच्या पाण्याच्या वाढत्या दुर्भिक्षावर उपाय शोधण्यासाठी व प्रभावी उपाय योजना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालय स्थापन केले आहे. या मंत्रालया अंतर्गत देशभरात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यांचा समावेश अभियानात करण्यात आला आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये जलजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळां - शाळांमधून कार्यक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. वरवट बकाल ता. संग्रामपूर येथील नागेश्वर महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून पाणी वाचविण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. शालेय जीवनापासून पाणी बचतीचा संस्कार होणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सहभागाने जल जागृती करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. एकलारा बानोदा येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी नाटीका सादर केली. या नाटीकेतून पाण्याअभावी सुंदर वसुंधरेचा होणारा विनाश यामध्ये दाखविण्यात आला. जलशक्ती अभियानातून विद्यार्थी जलजागृती करीत असल्यामुळे विद्यार्थीदशेतच त्यांच्यावर जलसंस्कार बिंबविल्या जात आहे.(प्रतिनिधी)जलशक्तीचा जागरङ्घबुलडाणा: शासनाने सुरू केलल्या जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून अनेकविध उपक्रमांमधून जलशक्तीचा जागर करण्यात येत आहे. त्यानुसार २२ जुलै रोजी संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील शिवशंकर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. तसेच गावात जल जागृतीचा संदेश देणारी रॅली काढण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक आर. ओ. राठी, सहायक शिक्षण पी. एन. नागोलकर, सहायक शिक्षीका एम. जी. सोळंके, सहायक शिक्षीका पी. के. जवंजाळ, सहायक शिक्षक एम. एच. रौंदळे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पातुर्डा येथील जिल्हा परिषद शाळेत रांगोळी स्पर्धा २३ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. या रांगोळी स्पर्धेतून ३५ विद्यार्थीनींनी जलजागृतीचा संदेश दिला. जलशक्ती अभियानातून जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. जिल्हा परिषद विद्यालय, पातुर्डा येथे प्राचार्य एस. के देशपांडे, सहायक शिक्षीका व्ही. व्ही पाठक, शिक्षीका पी. एच. मानकर, आशा परेश पहुरकार, ममता संजय खांडे, मार्गदर्शक शिक्षक पी. एस सपकाळ उपस्थित होते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोदSangrampurसंग्रामपूरStudentविद्यार्थी