शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

मतदान हा लोकशाहीचा लोकोत्सव - रमेश थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 19:13 IST

रंगभूमी प्रयोग परिरिक्षण मंडळ मुंबई, महाराष्ट्र शासनाचे सदस्य रमेश थोरात यांच्याशी साधलेला संवाद... 

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क  संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा समान हक्क दिला आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही भेद पाळल्या जात नाही. त्यादिवशी मतदार हा राजा असतो. ही भावना समाजमनात रूजविण्यासाठी कलेतून जनजागृतीचा आपला प्रयत्न असतो. रंगभूमी प्रयोग परिरिक्षण मंडळ मुंबई, महाराष्ट्र शासनाचे सदस्य रमेश थोरात यांच्याशी साधलेला संवाद... 

 कला आणि अभिनयाच्या क्षेत्राची सुरूवात कधी झाली? वयाच्या सातव्यावर्षी इयत्ता दुसरीत असताना एका नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका वठविण्याचा योग आला. तेथूनच पुढे आपल्या अभिनयाला सुरूवात झाली. मराठी आणि हिंदीतील १० सिनेमामध्ये विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याशिवाय दूरचित्रवाणीवरील १७१ नाटके आणि एकांकिकामध्ये विविध भूमिका अदा केल्या आहेत. ‘सह्याद्री गलबलतो’ या महानाट्यात केलेली अफजलखानाची भूमिका प्रचंड गाजली होती.

मतदान जनजागृतीसाठी आतापर्यंत कोठे कोठे कलेचे सादरीकरण केले?   शासनाच्या विविध जनजागृती अभियानात विविध एकपात्री वेशभूषा सादर केल्या. आता विधानसभा निवडणुकीत विदुषकाच्या भूमिकेतून मतदान जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा आणि आता मुंबई येथे ‘मतदार राजा मतदान कर’ अशी साद अभियानातून घालत आहे. 

कचºया हिंदुस्थानी या एकपात्री प्रयोगाचं सादरीकरण कुठे झाले?माझ्याअंगी असलेल्या अभियनाला अजरामर ‘फॉरेन रिटर्न कचºया हिंदुस्थानी’ या एकपात्री प्रयोगानेच केले. या एकपात्री नाट्याचे महाराष्ट्रासह, दिल्ली, भोपाळ, हरियाणा आणि गुजरात राज्यात २०३७ प्रयोग सादर झाले आहेत. तर ‘कफन को जेब नही होती’ या नाट्याचेही ३२९ प्रयोग सादर करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले.

दुसºयाच्या चेहºयाच्या आनंद फुलविणे, ही भगवंताने प्रत्येक मनुष्याला दिलेली निसर्गदत्त देणगी आहे. या कलेचा वापर करून मनुष्य जीवनसुखी करण्यासाठी प्रत्येकाने तत्पर असावे. दुसºयाला आनंद देतो, तेव्हाच कोणत्याही मनुष्याला खरा आनंद प्राप्त होतो. प्रेम आणि आनंद या दोनच गोष्टी मनुष्य जन्माचा अनमोल ठेवा आहेत.

कलेच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीसाठी योगदान काय ?बाबा आमटे आणि नटसम्राट यांच्या प्रेरणेमुळे कलेच्या क्षेत्रात पर्दापण झाले.  कचºया हिंदूस्थानी, कफन को जेब नही होती, दंगल शांततेत पार पडली. गण्या गणपती गणपतराव, बकरी शेर खा-गई यासारख्या एकपात्री प्रयोगातून रसिकांचे प्रबोधन करण्याची संधी आपल्या प्राप्त झाली आहे. एकपात्री प्रयोगासोबतच होळी, रंगपंचमी, स्वच्छ भारत अभियान यासह शासनाच्या विविध अभियानात  एकपात्री प्रयोगातून कलेच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी आपला पुढाकार असतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावinterviewमुलाखत