शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मतदान हा लोकशाहीचा लोकोत्सव - रमेश थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 19:13 IST

रंगभूमी प्रयोग परिरिक्षण मंडळ मुंबई, महाराष्ट्र शासनाचे सदस्य रमेश थोरात यांच्याशी साधलेला संवाद... 

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क  संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा समान हक्क दिला आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही भेद पाळल्या जात नाही. त्यादिवशी मतदार हा राजा असतो. ही भावना समाजमनात रूजविण्यासाठी कलेतून जनजागृतीचा आपला प्रयत्न असतो. रंगभूमी प्रयोग परिरिक्षण मंडळ मुंबई, महाराष्ट्र शासनाचे सदस्य रमेश थोरात यांच्याशी साधलेला संवाद... 

 कला आणि अभिनयाच्या क्षेत्राची सुरूवात कधी झाली? वयाच्या सातव्यावर्षी इयत्ता दुसरीत असताना एका नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका वठविण्याचा योग आला. तेथूनच पुढे आपल्या अभिनयाला सुरूवात झाली. मराठी आणि हिंदीतील १० सिनेमामध्ये विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याशिवाय दूरचित्रवाणीवरील १७१ नाटके आणि एकांकिकामध्ये विविध भूमिका अदा केल्या आहेत. ‘सह्याद्री गलबलतो’ या महानाट्यात केलेली अफजलखानाची भूमिका प्रचंड गाजली होती.

मतदान जनजागृतीसाठी आतापर्यंत कोठे कोठे कलेचे सादरीकरण केले?   शासनाच्या विविध जनजागृती अभियानात विविध एकपात्री वेशभूषा सादर केल्या. आता विधानसभा निवडणुकीत विदुषकाच्या भूमिकेतून मतदान जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा आणि आता मुंबई येथे ‘मतदार राजा मतदान कर’ अशी साद अभियानातून घालत आहे. 

कचºया हिंदुस्थानी या एकपात्री प्रयोगाचं सादरीकरण कुठे झाले?माझ्याअंगी असलेल्या अभियनाला अजरामर ‘फॉरेन रिटर्न कचºया हिंदुस्थानी’ या एकपात्री प्रयोगानेच केले. या एकपात्री नाट्याचे महाराष्ट्रासह, दिल्ली, भोपाळ, हरियाणा आणि गुजरात राज्यात २०३७ प्रयोग सादर झाले आहेत. तर ‘कफन को जेब नही होती’ या नाट्याचेही ३२९ प्रयोग सादर करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले.

दुसºयाच्या चेहºयाच्या आनंद फुलविणे, ही भगवंताने प्रत्येक मनुष्याला दिलेली निसर्गदत्त देणगी आहे. या कलेचा वापर करून मनुष्य जीवनसुखी करण्यासाठी प्रत्येकाने तत्पर असावे. दुसºयाला आनंद देतो, तेव्हाच कोणत्याही मनुष्याला खरा आनंद प्राप्त होतो. प्रेम आणि आनंद या दोनच गोष्टी मनुष्य जन्माचा अनमोल ठेवा आहेत.

कलेच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीसाठी योगदान काय ?बाबा आमटे आणि नटसम्राट यांच्या प्रेरणेमुळे कलेच्या क्षेत्रात पर्दापण झाले.  कचºया हिंदूस्थानी, कफन को जेब नही होती, दंगल शांततेत पार पडली. गण्या गणपती गणपतराव, बकरी शेर खा-गई यासारख्या एकपात्री प्रयोगातून रसिकांचे प्रबोधन करण्याची संधी आपल्या प्राप्त झाली आहे. एकपात्री प्रयोगासोबतच होळी, रंगपंचमी, स्वच्छ भारत अभियान यासह शासनाच्या विविध अभियानात  एकपात्री प्रयोगातून कलेच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी आपला पुढाकार असतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावinterviewमुलाखत