शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

खोलीकरणातून गावे पाणीदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:16 IST

जळगाव जामोद : गत वर्षीच्या तुलनेत जळगाव व संग्रामपूर तालुक्यात पाऊस कमी होवूनही पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे विहिरींचा जलस्तर वाढला आहे.

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : गत वर्षीच्या तुलनेत जळगाव व संग्रामपूर तालुक्यात पाऊस कमी होवूनही पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे विहिरींचा जलस्तर वाढला आहे. यामुळे गावकऱ्यांच्या चेहºयावर आनंद फुलला आहे. ४८ डिग्री तापमानात केलेल्या श्रमदानाचे फलीत झाले असा कृतार्थतेचा भाव या गावांमध्ये दिसून येत आहे. येत्या काही दिवसात वरुणराजाने साथ दिली तर ज्या गावामध्ये पाणी फाऊंडेशन अंतर्गत कामे झाली ती गावे खºया अर्थाने पाणीदार होणार आहेत.जलगाव जामोद तालुक्यातील ५५ गावे तर संग्रामपूर तालुक्यातील ६० गावे यावर्षी पाणी फाऊंडेशनमध्ये सहभागी झाली होती. त्यापैकी अनुक्रमे ३५ व ३९ गावांनीच प्रत्यक्ष काम सुरु केले. जळगाव तालुक्यात २० गावांनी चांगले काम केले तर संग्रामपूरमध्ये सक्रिय राहणारी १८ गावे होती. त्यामध्ये चांगेफळ बु., उमरा पानाचे, सावळा, भीलखेड, पिंप्री कवठळ ही ५ गावे तालुकास्तरीय स्पर्धेत पात्र ठरली. तर जळगाव तालुक्यातील बांडा पिंपळ, काजेगाव, निंभोरा बु. व निंभोरा खु. ही ४ गावे तालुकास्तरावर पात्र ठरली. यापैकी बांडा पिंपळ हे जळगाव तालुक्यातील आदिवासी गाव राज्यस्तरावरील १५ गावांमध्ये पात्र ठरले आहे.संग्रामपूर तालुक्यातील काकोडा, वानखेड, जस्तगाव, पंचाळा, वकाणा, काकणवाडा खुर्द, सालवन, सगोडा, एकलारा, सायखेड, पलसोडा, खळद बु., वरवट बकाल, नेकनामपूर, आलेवाडी, बावनबीर, अकोली, दुर्गादैत्य व धामणगाव या गावांनी पाणी फाऊंडेशनचे चांगले काम केले. जळगाव तालुक्यात पळसखेड, सुनगाव, जामोद, आसलगाव, सुलज, पळशी सुपो, हाशमपूर (वडगाव), हनवतखेड, राजुरा खुर्द, खांडवी, टाकळी खाती, पाटण (वडगाव), वडगाव पाटण या गावांनी सक्रिय राहत चांगले श्रमदान करीत व मशीनकाम करुन घेतले. जिल्हा समन्वयक प्रताप मारोडे यांच्या मार्गदर्शनात जळगाव तालुका समन्वयक ऋषिकेश ढोले, राहुल शिरसाट, वैभव गावंडे व संग्रामपूर तालुका समन्वयक विवेक वानखडे, सीमा उमाळे, गजानन ढोबाळे यांनी विशेष परिश्रम घेवून गावकऱ्यांना योग्य सूचना दिल्या. यातून गावे पाणीदार होण्यास मदत होत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट कामयावर्षी पाणी फाऊंडेशनच्या कामाच्या कालावधीत नेमकी लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाली होती. त्यामुळे बहुतांश अधिकारी वर्ग या कामात व्यस्त होता. तसेच राजकीय क्षेत्रात वावरणारी नेतेमंडळी सुध्दा या निवडणुकीत कामात गुंतली असल्याने त्यांचे अपेक्षित सहकार्य पाणी फाऊंडेशनच्या कामाला मिळू शकले नाही असे असूनही गावकºयांनी मात्र आपली जिद्द कमी होवू दिली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या कामांचा गाजावाजा कमी झाला परंतु प्रत्यक्ष काम मात्र दुपटीने झाले. संग्रामपूर तालुक्यात श्रमदानाने ३५ हजार घनमीटर पेक्षा जास्त काम झाले. तर मशीनद्वारे साडेचार लाख ते पाच लाख घनमीटर काम झाले. जळगाव तालुक्यात श्रमदानाने सुमारे ९० हजार घनमीटरपेक्षा जास्त काम झाले तर मशीनद्वारे सुमारे ५ लाख घनमीटरची सीमा ओलांडली आहे.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकSangrampurसंग्रामपूरJalyukt Shivarजलयुक्त शिवार