शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

खोलीकरणातून गावे पाणीदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:16 IST

जळगाव जामोद : गत वर्षीच्या तुलनेत जळगाव व संग्रामपूर तालुक्यात पाऊस कमी होवूनही पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे विहिरींचा जलस्तर वाढला आहे.

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : गत वर्षीच्या तुलनेत जळगाव व संग्रामपूर तालुक्यात पाऊस कमी होवूनही पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे विहिरींचा जलस्तर वाढला आहे. यामुळे गावकऱ्यांच्या चेहºयावर आनंद फुलला आहे. ४८ डिग्री तापमानात केलेल्या श्रमदानाचे फलीत झाले असा कृतार्थतेचा भाव या गावांमध्ये दिसून येत आहे. येत्या काही दिवसात वरुणराजाने साथ दिली तर ज्या गावामध्ये पाणी फाऊंडेशन अंतर्गत कामे झाली ती गावे खºया अर्थाने पाणीदार होणार आहेत.जलगाव जामोद तालुक्यातील ५५ गावे तर संग्रामपूर तालुक्यातील ६० गावे यावर्षी पाणी फाऊंडेशनमध्ये सहभागी झाली होती. त्यापैकी अनुक्रमे ३५ व ३९ गावांनीच प्रत्यक्ष काम सुरु केले. जळगाव तालुक्यात २० गावांनी चांगले काम केले तर संग्रामपूरमध्ये सक्रिय राहणारी १८ गावे होती. त्यामध्ये चांगेफळ बु., उमरा पानाचे, सावळा, भीलखेड, पिंप्री कवठळ ही ५ गावे तालुकास्तरीय स्पर्धेत पात्र ठरली. तर जळगाव तालुक्यातील बांडा पिंपळ, काजेगाव, निंभोरा बु. व निंभोरा खु. ही ४ गावे तालुकास्तरावर पात्र ठरली. यापैकी बांडा पिंपळ हे जळगाव तालुक्यातील आदिवासी गाव राज्यस्तरावरील १५ गावांमध्ये पात्र ठरले आहे.संग्रामपूर तालुक्यातील काकोडा, वानखेड, जस्तगाव, पंचाळा, वकाणा, काकणवाडा खुर्द, सालवन, सगोडा, एकलारा, सायखेड, पलसोडा, खळद बु., वरवट बकाल, नेकनामपूर, आलेवाडी, बावनबीर, अकोली, दुर्गादैत्य व धामणगाव या गावांनी पाणी फाऊंडेशनचे चांगले काम केले. जळगाव तालुक्यात पळसखेड, सुनगाव, जामोद, आसलगाव, सुलज, पळशी सुपो, हाशमपूर (वडगाव), हनवतखेड, राजुरा खुर्द, खांडवी, टाकळी खाती, पाटण (वडगाव), वडगाव पाटण या गावांनी सक्रिय राहत चांगले श्रमदान करीत व मशीनकाम करुन घेतले. जिल्हा समन्वयक प्रताप मारोडे यांच्या मार्गदर्शनात जळगाव तालुका समन्वयक ऋषिकेश ढोले, राहुल शिरसाट, वैभव गावंडे व संग्रामपूर तालुका समन्वयक विवेक वानखडे, सीमा उमाळे, गजानन ढोबाळे यांनी विशेष परिश्रम घेवून गावकऱ्यांना योग्य सूचना दिल्या. यातून गावे पाणीदार होण्यास मदत होत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट कामयावर्षी पाणी फाऊंडेशनच्या कामाच्या कालावधीत नेमकी लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाली होती. त्यामुळे बहुतांश अधिकारी वर्ग या कामात व्यस्त होता. तसेच राजकीय क्षेत्रात वावरणारी नेतेमंडळी सुध्दा या निवडणुकीत कामात गुंतली असल्याने त्यांचे अपेक्षित सहकार्य पाणी फाऊंडेशनच्या कामाला मिळू शकले नाही असे असूनही गावकºयांनी मात्र आपली जिद्द कमी होवू दिली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या कामांचा गाजावाजा कमी झाला परंतु प्रत्यक्ष काम मात्र दुपटीने झाले. संग्रामपूर तालुक्यात श्रमदानाने ३५ हजार घनमीटर पेक्षा जास्त काम झाले. तर मशीनद्वारे साडेचार लाख ते पाच लाख घनमीटर काम झाले. जळगाव तालुक्यात श्रमदानाने सुमारे ९० हजार घनमीटरपेक्षा जास्त काम झाले तर मशीनद्वारे सुमारे ५ लाख घनमीटरची सीमा ओलांडली आहे.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकSangrampurसंग्रामपूरJalyukt Shivarजलयुक्त शिवार