शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

vidhan sabha 2019 : कोणाला बसणार हादरे; राजकीय गणितांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 14:26 IST

युतीचा गुंता न सुटल्याने राजकीय महत्त्वाकांक्षा वृद्धींगत झालेल्या अनेक इच्छुकांची चलबिचल सुरू आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदारांनी प्रस्थापितांना नाकारत सात मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्या पृष्ठभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाला ‘हादरे’ बसतात तर कोणाला पुन्हा ‘संधी’ मिळते याबाबत सध्या राजकीय वर्तुळात गणिते मांडली जात आहेत. त्यातच युतीमधील वाढता गुंता पाहता जागा वाटपाच्या निर्णायक क्षण येण्यास अद्यापही दोन ते तीन दिवसांचा अवकाश आहे. त्यामुळे काही इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.सध्या भाजप, शिवसेना या पक्षांची चांगलीच चलती असल्याने या दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील सात विधानसभांसाठी भाजपने घेतलेल्या मुलाखतीसाठी तब्बल ६४ जणांनी हजेरी लावली होती. एकट्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून नऊ जण इच्छूक होते तर सिंदखेड राजा व चिखलीतूनही अनेक जण इच्छूक होते. शिवसेनेचा विचार करता एकट्या बुलडाण्यासाठी तब्बल ३२ जणांनी मुंबईतील शिवसेना भवनाची पायरी चढून मुलाखतीची तयारी पूर्ण केली होती. अगदी चिखली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या काही इच्छुकांनही बुलडाण्यासाठी मुलाखती दिल्या होत्या. मात्र अद्याप युतीचा गुंता न सुटल्याने राजकीय महत्त्वाकांक्षा वृद्धींगत झालेल्या अनेक इच्छुकांची चलबिचल सुरू आहे.भाजपच्या दृष्टीने खामगाव, मलकापूर आणि जळगाव जामोदमधील उमेदवार निश्चत असून गेल्या पाच वर्षाच्या काळात विद्यमान आमदारांनी आपला प्रभाव कायम ठेवल्याचे दिसून आले आहे.त्यातच लोकसभा निवडणुकीमध्ये खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला मिळालेले ३३ हजार २७९ आणि ३६ हजार ९८४ मताधिक्य हे जमेची बाजू ठरणारे आहे.दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विजयराज शिंदे, काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा, ध्रृपदराव सावळे, रेखाताई खेडकर यांना पराभवाचे हादरे बसले होते तर खामगावात अ‍ॅड. आकाश फुंडकर, बुलडाण्यात हर्षवर्धन सपकाळ आणि सिंदखेड राजामध्ये डॉ. शशिकांत खेडेकर या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली होती.ही स्थिती पहता १४ व्या विधानसभा निवडणुकीत कोणाला हादरे बसतात आणि कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे. काहीजण ‘वंचीत’च्या उंबरठ्यावर असल्याचीही जिल्ह्यात चर्चा आहे.

यंदा निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार१४ व्या विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. अनेकांच्या महत्त्वाकांक्षा उंचावलेल्या आहेत. त्या पृष्ठभूमीवर १४ वी विधानसभा जिल्ह्यात काही नवी समिकरणे निर्माण करते की काय? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्यातच १२ व्या विधानसभा निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर २०१४ च्या निवडणुकीत १०१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी ८१ जणांची अनामत रक्कम जप्त झाली होती. २०१९ ची निवडणूकही विविध कारणांनी अभूतपूर्व ठरणार आहे. त्यामुळे १४ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात कोणती समिकरणे उदयास येतात याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठणी आहे. मात्र निवडणुक रिंगणातील उमेदवारांचे यंदा पुन्हा शतक गाठल्या जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019