शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

विदर्भवाद्यांकडून बुलढाण्यात नागपूर कराराची होळी, मेहकरमध्येही आंदोलन

By निलेश जोशी | Updated: September 28, 2022 19:05 IST

विदर्भवाद्यांकडून बुलढाण्यात नागपूर कराराची होळी करत आंदोलन केले. 

बुलढाणा : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती पुन्हा आक्रमक झाली असून वेगळ्या विदर्भ राज्याच्या संदर्भाने करण्यात आलेल्या नागपूर कराराची बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २८ सप्टेंबरला होळी करण्यात आली. दरम्यान, मेहकर येथेही अशाच पद्धतीचे आंदोलन करण्यात आले. बुलडाणा येथे प्रा. राम बारोटे, प्रकाश देशमुख, ॲड. सुभाष विमकर, सुखदेव नरोटे, दिनकर टेकाडे, ॲड. दीपक मापारी यांनी तर मेहकर येथे ॲड. सुरेश वानखेडे, संजय सुरळखर, प्रल्हादराव बाजड, देबाजे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी आंदोलन केले.

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसंदर्भात १९५३ दरम्यान नागपूर करार करण्यात आला होता. मात्र आज जवळपास ६९ वर्षांनंतरही या कराराची अंमलबजावणी झालेली नाही. त्यातच आता स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ निर्मिती मिशन-२०२३ सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आता हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून नागपूर कराराची बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली. सोबतच मेहकर येथेही निदर्शने करण्यात आली. २८ सप्टेंबर २०२२ अर्थात नागपूर करार दिनीच ही होळी करण्यात आली. आता पुढील टप्प्यात २ ऑक्टोबरला महापुरुषांच्या पुतळ्यासमोर विदर्भवाद्याकंडून आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर ३ ऑक्टोबरला अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल.

 नागपूर अधिवेनसादरम्यानही आंदोलन करण्यात येणार आहे. अशा विविध तीन ते चार टप्प्यांवर हे आंदोलन होणार आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीसोबच विजेची दरवाढ मागे घ्यावी, अन्नधान्यावरील जीएसटी तात्काळ रद्द करावा, पूर, अतिवृष्टी व ढगफुटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने हेक्टरी ७५ हजार रुपये तत्काळ मदत यावी, अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाVidarbhaविदर्भnagpurनागपूर