शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सिंचन क्षमता वापरात रिक्त पदांचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:53 IST

स्थापित व प्रत्यक्ष होऊ शकणारे सिंचन रिक्तपदे आणि कालव्यांच्या दुरुस्ती व स्वच्छतेसाठीच निधी उपलब्ध नसल्याने एक मोठी समस्या बनू पाहत आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात निर्माण झालेली सिंचन क्षमता महत्तम क्षमतेने वापरामध्ये बुलडाणा पाटबंधारे विभागातील रिक्तपदांमुळे मोठा खोडा निर्माण होण्याची शक्यता असून देखभाल दुरुस्तीअभावी प्रकल्पावरील कालव्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या कालव्यांची दुरुस्ती व स्वच्छतेसाठीच तब्बल तीन कोटी रुपयांची विशेष मागणी बुलडाणा पाटबंधारे विभागाला आता करण्याची वेळ आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पाणी आरक्षण समितीच्या बैठकीनंतर हे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे जिल्ह्यात जिगाव सारख्या प्रकल्पाचे काम वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होत असताना स्थापित व प्रत्यक्ष होऊ शकणारे सिंचन रिक्तपदे आणि कालव्यांच्या दुरुस्ती व स्वच्छतेसाठीच निधी उपलब्ध नसल्याने एक मोठी समस्या बनू पाहत आहे.बुलडाणा जिल्ह्याची महत्तम सिंचन क्षमता ही ३१ टक्के असून जिगाव प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास ती प्रत्यक्षात उतरू शकते. मात्र वर्तमान स्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांचा विचार करता एक लाख ६१ हजार ३१४ हेक्टर क्षेत्रावर सिंचन होईल ऐवढी क्षमता स्थापीत झाली आहे. त्यापैकी प्रत्यक्षात एक लाख १८ हजार ०८३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून जिल्ह्यातील अवर्षण स्थिती पाहता कालव्यांची दुरुस्ती व स्वच्छताच केली गेली नसल्यामुळे प्रत्यक्षात होणाऱ्या सिंचनाला फटका बसू शकतो. बुलडाणा पाटबंधारे विभाग, विदर्भ विकास पाटबंधारे मंडळ आणि जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागा मिळून जिल्ह्याची महत्तम सिंचन क्षमता ही ३१ टक्के आहे. मात्र प्रत्यक्ष सिंचनाचा विचार करता जसे खोलात जावू तशा अनेक समस्या समोर येतात. जिल्हा पाणी आरक्षण समितीच्या बैठकीच्या निमित्ताने प्रामुख्याने ही बाब अधोरेखीत होत आहे. त्यानुषंगाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे (व्हीआयडीसी) त्यानुषंगाने आता विशेष निधीची मागणी करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिल कन्ना यांनी दिली. ती जवळपास पाच कोटींच्या घरात असून कालवा स्वच्छता व दुरुस्तीसाठी करावयाच्या यांत्रिकी कामासाठी एक कोटी ८० लाख आणि कालवा स्वच्छतेसाठी तीन कोटी रुपयांची अवश्यकता आहे. तशी मागणी महामंडळाकडे यंदा करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

५५ टक्के पदे रिक्तबुलडाणा पाटबंधारे विभागातंर्गत आकृतीबंधानुसार आवश्यक असलेल्या पदांचा विचार करता ५५ टक्के पदे रिक्त आहे. ४९० पदांची येथे अवश्यकता असताना प्रत्यक्षात २१९ पदेच येथे कार्यरत आहेत तर २७१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाजामध्येही येथे मोठी समस्या निर्माण होत आहे. दुसरीकडे पाण्याचे टेल टू हेड वितरण करताना कालवा निरीक्षकांची १०७, मोजणीदारांची ५४, कालवा टपाली दहा आणि कालवा चौकीदाराची ९ पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम प्रत्यक्ष पाणीवितरणावर होणार असल्याने स्थापित सिंचन क्षमतेचा वापर करण्यात यंदा मोठ्या अडचणी येणार आहेत.मोठ्या प्रकल्पांद्वारे ३४ हजार हेक्टर सिंचनरब्बी हंगामातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता पेनटाकळी, खडकपूर्णा आणि नळगंगा या तीन प्रकल्पाद्वारे प्रत्यक्षात ३४ हजार ४९ हेक्टरच्या आसपास सिंचन होऊ शकते. पेनटाकाळी प्रकल्पाद्वारे आठ हजार ४९, खडकपूर्णा प्रकल्पाद्वारे २४ हजार हेक्टरपैकी १८ हजार हेक्टर आणि नळगंगा प्रकल्पाद्वारे आठ हजार हेक्टरपर्यंत यंदा सिंचन होऊ शकते, असे सुत्रांनी सांगितले.

३०० किमी कालव्यांच्या स्वच्छतेची गरजनळगंगा प्रकल्पावरून १०४ किमी लांबीचे, पेनटाकळी प्रकल्पावरून ९० किमी लांबीचे व खडकपूर्णावरूनही सुमारे १०० किमी लांबीचे मुख्य, शाखा आणि वितरण कालवे आहेत. मात्र मधल्या काळात अवर्षणस्थिती व प्रदीर्घ कालावधीपासून या प्रकल्पांमधून कालव्याद्वारे पाणी न सोडण्यात आल्याने कालव्यांची तुटफूट झाली आहे. काही कालव्यांमध्ये झुडपे वाढली आहेत. परिणामी पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच निधीची ही विशेष मागणी करण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प