शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शौचालये उभारणीसाठी ग्रामसेवकांवर अन्यायकारक सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:02 IST

गावे  हागणदारीमुक्त करण्याची जबाबदारी ही एकट्या ग्रामसवेकांचीच  नाही तर यामध्ये महसूल व कृषी विभागासह पोलिस प्रशासनावर  याची जबाबदारी असताना  हागणदारीमुक्तीसाठी ग्रामसेवकांवर  अन्यायकारक सक्ती असल्याने ग्रामसेवकांमध्ये तीव्र नाराजी  पसरली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन योजनेत समाविष्ठ इतर विभागावर कारवाई  शून्य

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सुरू केलेल्या  स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या निर्मितीचे  काम युध्दपातळीवर राबविण्याबाबत प्रशासन काम करत असले  तरी आजरोजी जिल्हय़ातील ग्रामीण भागात शौचालयांची व्याप्ती  पाहिजे त्या प्रमाणात होतांना दिसत नाही. यामध्ये नागरीकांकडे  जागा नसणे तसेच केवळ दिखावूपणाचे शौचालये उभारणे व  विशेष म्हणजे नागरीकांमध्ये शौचालये बांधणे व त्याचा नियमित  वापर करणे याबाबत असलेली प्रचंड अनास्था कारणीभूत अस ताना शौचालये उभारणीची ही चळवळ यशस्वी करण्यासाठी  सदोदीत ग्रामसेवकांनाच ‘टार्गेट’ केल्या जात आहे. वस्तुत: गावे  हागणदारीमुक्त करण्याची जबाबदारी ही एकट्या ग्रामसवेकांचीच  नाही तर यामध्ये महसूल व कृषी विभागासह पोलिस प्रशासनावर  याची जबाबदारी असताना  हागणदारीमुक्तीसाठी ग्रामसेवकांवर  अन्यायकारक सक्ती असल्याने ग्रामसेवकांमध्ये तीव्र नाराजी  पसरली आहे.पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छता अभियानातून गावोगावच्या कार्यक र्त्यांना प्रेरित केले. या योनजेत २ ऑक्टोबर २0१४ पासून  देशभरात शहर व ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयांसाठी  लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येत आहे. तर जिल्हाभरात ही मोहिम  यशस्वीपणे राबविण्यासाठी तालुकास्तरावर सर्व उपाययोजना  राबविण्यासह नागरीकांना शौचालये उभारण्यासाठी प्रेरित करून  जनजागृतीसह कठोर भूमिका घेत उघड्यावर जाणार्‍या  नागरीकांवर गुड मॉर्निंग पथकाव्दारे ‘वॉच’ ठेवून थेट पोलिस  स्टेशनमध्ये दाखल करूनही नागरीकांमध्ये शौचालयांबाबत  अनास्था आहे. स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून केली जाणारी ही  कारवाई निश्‍चित स्वागताहार्य, मात्र, गाव पातळीवर शौचालयांचा  भार एकट्या ग्रामसेवकांवर सोपविणे योजनेच्या यशस्वीतेत  अडथळा ठरत आहे. ग्रामसेवकांव्दारे शौचालय बांधकामसाठी  लाभार्थी प्रवृत्त व्हावा म्हणून गृहभेटी घेणे, जनजागृती करणे,  शौचालय असल्याचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय ग्रामपंचायतीचे  कोणतेच दाखले न देणे आदी करूनही बरेच नागरीक त्यांना  जुमानत नाहीत.  ग्रामीण व शहरी भागातही ज्यांनी अनुदान घेवून  शौचालये बांधली आहेत त्यापैकी अनेकजण त्यांचा वापर करीत  नाहीत. अशा स्थितीत शौचालयांबाबत ग्रामसेवकांनाच जबाबदार  ठविण्यात येत आहे.  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालये  उभारणीचे काम पूर्णत्वास नेण्याचे व त्या शौचालयांचा नियमित  वापर करण्याबाबत नागरीकांना प्रवृत्त करणे हे काम एकट्या  ग्रामसेवकांचेच नाही. तर ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी  शासनाने यामध्ये महसूल व कृषी विभागासह पोलिस  प्रशासनाचाही समावेश केला आहे. असे असताना गाव  हागणदारीमुक्तीसाठी नेहमी ग्रामसेवकांवरच कारवाईचा बडगा  उगारला जातो. निलंबन, वेतन वाढ रोखणे, विभागीय चौकशी  प्रस्तावित करणे, अचानक दप्तर तपासणी करणे अशा कारवाया  केल्या जात आहेत. तसेच ही कारवाई करताना बाजू मांडण्याच्या  नैसर्गिक न्याय तत्वालाही हरताळ फासण्यात येत आहे.  अधिकार्‍यांच्या बैठकीत ग्रामसेवकांना अवमानित करणे, महिला  ग्रामसेवकांना कामकाजाची वेळ संपल्यानंतरही रात्नी अपरात्नी  उशिरा बैठकीस बोलवणे अशी अन्यायकारक वागणूक दिली  जात असल्याचा आरोप ग्रामसेवकांकडून होत आहे.गावे हागणदारीमुक्त व्हावीत, ही अधिकार्‍यांची भावना स्वाग ताहार्य  असली तरी केवळ ग्रामसेवकांनाच जबाबदार ठरवून  केवळ त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई होणे, ही बाब  अन्यायकारक आहे. कर्तव्यात कसूर करणार्‍यांवर कारवाई करणे  वरिष्ठांना क्रमप्राप्त ठरत असले तरी ही कारवाई करताना या  योजनेत समावेश असलेल्या महसूल व कृषी विभागासह पोलिस  प्रशासनातील जबाबदार अधिकारी, कर्मचार्‍यांवर देखील  कारवाई होणे गरजेचे ठरत असल्याने दरवेळी केवळ  आमच्यावरच कारवाई का केली जाते? असा प्रश्न  ग्रामसेवकांकडून उपस्थित होत आहे.

स्वच्छ भारत मिशनमध्ये महसूल, कृषी आणि पोलिस विभगा तील कर्मचार्‍यांनाही समाविष्ट करण्यात आले. परंतू, त्यांचा  फारसा सहभाग राहत नसल्याने यामध्ये एकट्या ग्रामसेवकांची  दमछाक होते. शिवाय अनेक ग्रामसेवकांकडे तीन-तीन गावे दिले  आहेत. असे असताना सर्व ग्रामसेवक प्रामाणिकपणे काम करतो.  मात्र, त्यांच्याविरूध्द कारवाई होत असेल तर ही बाब चुकीची  असून या योजने सर्वांचा सहभाग राहील्यास शौचालये  उभारणीला गती येवून स्वच्छ भारतचे स्वप्न साकार होण्यास  फारसा वेळ लागणार नाही.- रामेश्‍वर रिंढेतालुकाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना चिखली

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान