शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालेल्या कुटुंबावर गावकऱ्यांचा जीवनावश्यक वस्तु देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 10:56 IST

Boycott by villagers : या कुटुंबावर दुहेरी आघात सहन करण्याची वेळ आली आहे. 

ठळक मुद्देएका दिवसाच्या अंतराने दोघांचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला.दोन महिला व दोन मुलांनी बोथा काजी गावातील घरी दु:खात दिवस काढणे सुरू केले. जीवनावश्यक गरजा भागविणाऱ्यांनी त्यांना नकार देण्यास सुरुवात केली.

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : कुटुंब प्रमुखासह वडिलांचा दोन दिवसांत मृत्यू झाल्याने त्या कुटुंबातील इतर सदस्यांना जीवनावश्यक वस्तू देण्यास व्यावसायिकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार घडत आहे. संबंधितांनी ही बाब इतर गावांतील नातेवाइकांना कळविल्याने उघडकीस आली आहे.

खामगाव तालुक्यातील बोथा काजी येथे गेल्या काही दिवसांपासून त्या कुटुंबाला अशी वागणूक दिली जात आहे. गावातील ३५ वर्षीय तरुण नोकरीनिमित्त बाहेरगावी होता. प्रकृती बिघडल्याने तो गावात आला. गावात आल्यानंतर कुटुंबातील सेवानिवृत्त वडिलांची प्रकृती बिघडली. दोघांनाही अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एका दिवसाच्या अंतराने दोघांचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबात असलेल्या दोन महिला व दोन मुलांनी बोथा काजी गावातील घरी दु:खात दिवस काढणे सुरू केले. या काळात त्यांना धीर देण्यासोबतच मदतीचा हात मिळणे आवश्यक असताना त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळणेही कठीण झाले.  थंड पाण्याचे कॅन, दळण, किराणा तसेच इतरही जीवनावश्यक गरजा भागविणाऱ्यांनी त्यांना नकार देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे कुटुंब गावातच कसेबसे दिवस काढत आहे. गावातील या परिस्थितीबाबत त्यांनी नातेवाइकांना माहिती दिली. त्यामुळे काहींनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीवनावश्यक गरजा भागविणाऱ्यांना समजावून कोण सांगणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे, गावात या कुटुंबासोबतच इतरही दोन कुटुंबांतील सदस्य कोरोना पाॅझिटिव्ह आहेत. त्या कुटुंबांबद्दल जीवनावश्यक पुरवठादारांकडून सहानुभूती दाखवली जात आहे, तर या कुटुंबात दोन मृत्यू झाल्याने त्यांना सुविधा देण्यास नकारघंटा आहे. त्यामुळे या कुटुंबावर दुहेरी आघात सहन करण्याची वेळ आली आहे. 

भीतीने बोलण्यास नकार दरम्यान, या कुटुंबातील संबंधितांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गावपातळीवरचा विषय आहे.  आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, या आशेवर बोलण्यास नकार दिला. 

बाहेरगावी असलेल्या आरओ प्लांटकडून त्यांना पाणी देण्यास नकार दिला होता. ही समस्या आपण त्यांच्याशी बोलून सुरळीत केली. उर्वरित जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत त्यांनी माहिती दिल्यास ती समस्याही निकाली काढता येईल. - सोपान तुंबडे, पोलीस पाटील, बोथा काजी.

एकाचवेळी कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतली होती. त्यानंतर खबरदारीच्या सर्वच उपाययोजना केल्या. कुटुंबाच्या घरात फवारणी केली. तसेच इतरही मदतीसंदर्भात माहिती मिळाल्यास ती ग्रामपंचायत प्रशासनाकडून केली जाईल. -अलका उद्धव म्हस्के, सरपंच, बोथा काजी.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाSocialसामाजिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस