शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

आंचरवाडीत वीजेच्या धक्क्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 16:57 IST

दोघे मृतक नात्याने काका-पुतण्या: अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

अंढेरा (जि. बुलडाणा): शेतातील स्प्रींक्लरचे नोझल बदलताना लोंखडी पाईपमध्ये वीजेचा प्रवाह आल्याने शॉक लागून नात्याने काका-पुतण्या असलेल्या दोन शेतकर्यांचा आंचरवाडी शिवारात बुधवारी मृत्यू झाला. भीमराव रामकृष्ण परिहार (काका) आणि गणेश लक्ष्मण परिहार (पुतण्या) अशी मृत पावलेल्या दोन्ही शेतकर्यांची नावे आहेत.

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आंचरवाडी येथे भाग एक मधील गट नं. ३७ मध्ये त्यांचे सुमारे साडेचार एक्कर शेत आहे. दोघांचीही शेती वेगवेगळी व एकमेकाला लागूनच होती. सकाळी या शेतात पेरलेल्या गव्हाला पाणी देण्यासाठी ते गेले होते. दरम्यान, विहीरीवरील वीज जोडणीच्या पेटीजवळच स्प्रींकलरचे लोखंडी पाईप ठेवण्यात आलेले होते. या पाईपला लावण्यात आलेले स्प्रींकलरचे नोझल काढत असताना त्यात वीजेचा प्रवाह आल्याने गणेश लक्ष्मण परिहार यास वीजेचा जोरदार शॉक लागला. ते पाहताच त्याला वाचविण्यासाठी भीमराव रामकृष्ण परिहार हे गेले असता त्यांनाही वीजेचा जोरदार शॉक लागून दोघेही घटनास्थळीच ठार झाले, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक व्ही. एल. कवास यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

या घटनेनंतर कामानिमित्त दिनकर बाबुराव परिहार यांनी गणेश लक्ष्मण परिहार यास भ्रमणध्वनीवर फोन केला असता त्याने तो उचलला नाही. म्हणून दिनकर  परिहार हे त्याला पाहण्यासाठी शेतात गेले असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर दिनकर बाबुराव परिहार यांनी आंचरवाडी गावात या घटनेची माहिती फोनवरून दिली. त्यानुषंगाने संजय नारायण परिहार व त्यांचे सहकारी गावात गेले असता त्यांना भीमराव रामकृष्ण परिहार व गणेश परिहार हे वीजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडलेले असल्याचे निदर्शनास आले. प्रकरणी संजय नारायण परिहार (रा. आंचरवाडी) यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील कारवाई अंढेरा पोलिस करीत आहेत.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक व्ही. एल. कवास, समाधान झीने आणि निवृत्ती पोफळे या पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सध्या दोन्ही मृत शेतकऱ्यांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी उपरोक्त पोलिस कर्मचारी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात आहेत.

आंचरवाडी शिवारीतल गव्हाच्या शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या भीमराव रामकृष्ण परिहार आणि त्यांचा पुतण्या गणेश लक्ष्मण परिहार यांचा स्प्रींकलरचे नोझल काढत असताना पाईपात वीजेचा प्रवाह आल्याने शॉक लागून मृत्यू झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.- व्ही. एल. कवास, पोलिस उपनिरीक्षक, अंढेरा

टॅग्स :Farmerशेतकरी