शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

स्वाभिमानी योजनेपासून आदिवासी वंचित

By admin | Updated: September 19, 2014 00:40 IST

आदिवासी विकास मंडळाचे दुर्लक्ष : पश्‍चिम विदर्भातील ११0 प्रस्ताव पडून.

बुलडाणा : शासनाच्या रेडिरेकनरप्रमाणे जमीन खरेदीचे न परवडणारे दर, स्थानिक प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष त्यामुळे राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने सुरू केलेल्या स्वाभिमानी योजनेला हरताळ फासल्या जात आहे. बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील ११0 लाभार्थ्यांंनी जमिनीसाठी अर्ज करूनही मागील तीन वर्षांपासून एक गुंठाही जमीन शासनाने खरेदी करून लाभार्थ्यांंना दिली नाही.ह्यस्वाभिमानीह्ण योजनेंतर्गत शासन दोन एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहु जमीन विकत घेऊन ती आदिवासी बांधवांना वाटप करते. परिसरात कोणाची जमीन विक्री असल्यास त्यासंबंधी आदिवासी विभागाकडे तसा अर्ज केल्यास संबंधित विभाग जमीन मालकाची भेट घेऊन जमीन शासनाच्या रेडिरेकनरप्रमाणे किंमत देऊन ही जमीन विकत घेते व त्या भागातील आदिवासींना ती जमीन वाटप करते. मागील तीन वर्षात ११0 आदिवासींनी जमिनीसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून सर्वाधिक ८0 अर्ज तर अकोला जिल्ह्यातून १0 आणि वाशिम जिल्ह्यातून २0 अर्ज प्राप्त झाले आहेत; मात्र हे प्रस्ताव दाखल होऊन तीन वर्ष उलटले तरी एकाही आदिवासी बांधवाला जमीन वाटप केले नाही. आदिवासी प्रकल्पाचे अकोला येथील अधिकारी बी. के. तायडे यांनी जमीन विक्रीचे प्रस्ताव त्यांच्याकडे आले असल्याचे सांगीतले; मात्र शासनाचे रेडिरेकनर दर आणि जमिनीचे आजचे बाजार भावाप्रमाणे असलेले दर यामध्ये प्रचंड तफावत जमीन मिळत नसल्याने प्रस्ताव पडून असल्याचे त्यांनी नमूद केले.