शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

वृक्ष लागवड योजनेतील वृक्ष सुकले!

By admin | Updated: April 15, 2017 01:11 IST

संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष: सामाजिक संस्था, वृक्षप्रेमींनी फिरवली पाठ!

नीलेश शहाकार - बुलडाणाशासनाच्यावतीने मोठा गाजावाजा करीत गतवर्षी १ जुलै रोजी वन महोत्सव साजरा करत शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यात वृक्ष लागवड करण्यात आली; मात्र त्यानंतर वृक्ष संवर्धनाकडे प्रशासनासह सहभागी सामाजिक संघटनांकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने उन्हाळ्याच्या प्रारंभीच हे वृक्ष सुकले आहेत. पर्यावरण धोका निर्माण होत असल्यामुळे १ ते १५ जुलै २०१६ दरम्यान वन महोत्सव साजरा करून २ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था व विविध संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, तसेच पंधरा दिवसात शहर आणि ग्रामीण स्तरावर ३ लाख ४६२ वृक्ष लागवड करण्यात उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. मात्र मोठा गाजावाजा करून लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन प्रशासन व सामाजिक संघटनांना करता आले नाही. शेवटी वृक्षारोपण अभियान केवळ प्रसिद्धीपुरतेच मर्यादित राहिले. आज वृक्षारोपण झालेल्या ठिकाणी केवळ खड्डेच शिल्लक राहिले आहे, तर हजारो रुपये खर्च करून लावण्यात आलेले लोखंडी ट्रिगार्ड केवळ वृक्ष सुकल्याने रिकामे असल्याचे दृष्टीस पडत आहे. वृक्ष अडकले अतिक्रमणातशहरातील मलकापूर-औरंगाबाद मार्गावर वन महोत्सवादरम्यान तब्बल १०० वृक्षांचे रोप करण्यात आले. त्यावेळी स्थानिक नगरपालिकेकडून या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे संपूर्ण रस्ता मोकळा होता; मात्र आज या मार्गावर लघू व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केल्यामुळे या मार्गावर लावण्यात आलेले वृक्ष व त्यांचे ट्रि गार्ड अतिक्रमणात गडप झाले आहेत.वृक्ष संवर्धनाचे दायित्व कोण घेणार?बुलडाणा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे सामाजिक दायित्व अनेक संस्थांनी नेहमीच जोपासले आहे. यातून शहरातील विविध मार्गांवरील दुभाजक व परिसरातील वृक्षांना पाणी देण्याचे काम दररोज सायंकाळी बुलडाणा अर्बन संस्था व नगर परिषदेकडून करण्यात येत होते. सुरुवातीला शहरातील वृक्ष टवटवीत दिसायची; मात्र नवीन वर्षात नगर परिषदेमध्ये सत्ता बदल झाला. आता शहरातील दुभाजकावर वृक्षाऐवजी मोकाट कुत्रे बसलेली आढळून येत आहेत. या कारणामुळे शहरातील वृक्ष संवर्धनाचे दायित्व कोण घेणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.