शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

वृक्ष लागवड योजनेतील वृक्ष सुकले!

By admin | Updated: April 15, 2017 01:11 IST

संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष: सामाजिक संस्था, वृक्षप्रेमींनी फिरवली पाठ!

नीलेश शहाकार - बुलडाणाशासनाच्यावतीने मोठा गाजावाजा करीत गतवर्षी १ जुलै रोजी वन महोत्सव साजरा करत शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यात वृक्ष लागवड करण्यात आली; मात्र त्यानंतर वृक्ष संवर्धनाकडे प्रशासनासह सहभागी सामाजिक संघटनांकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने उन्हाळ्याच्या प्रारंभीच हे वृक्ष सुकले आहेत. पर्यावरण धोका निर्माण होत असल्यामुळे १ ते १५ जुलै २०१६ दरम्यान वन महोत्सव साजरा करून २ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था व विविध संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, तसेच पंधरा दिवसात शहर आणि ग्रामीण स्तरावर ३ लाख ४६२ वृक्ष लागवड करण्यात उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. मात्र मोठा गाजावाजा करून लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन प्रशासन व सामाजिक संघटनांना करता आले नाही. शेवटी वृक्षारोपण अभियान केवळ प्रसिद्धीपुरतेच मर्यादित राहिले. आज वृक्षारोपण झालेल्या ठिकाणी केवळ खड्डेच शिल्लक राहिले आहे, तर हजारो रुपये खर्च करून लावण्यात आलेले लोखंडी ट्रिगार्ड केवळ वृक्ष सुकल्याने रिकामे असल्याचे दृष्टीस पडत आहे. वृक्ष अडकले अतिक्रमणातशहरातील मलकापूर-औरंगाबाद मार्गावर वन महोत्सवादरम्यान तब्बल १०० वृक्षांचे रोप करण्यात आले. त्यावेळी स्थानिक नगरपालिकेकडून या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे संपूर्ण रस्ता मोकळा होता; मात्र आज या मार्गावर लघू व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केल्यामुळे या मार्गावर लावण्यात आलेले वृक्ष व त्यांचे ट्रि गार्ड अतिक्रमणात गडप झाले आहेत.वृक्ष संवर्धनाचे दायित्व कोण घेणार?बुलडाणा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे सामाजिक दायित्व अनेक संस्थांनी नेहमीच जोपासले आहे. यातून शहरातील विविध मार्गांवरील दुभाजक व परिसरातील वृक्षांना पाणी देण्याचे काम दररोज सायंकाळी बुलडाणा अर्बन संस्था व नगर परिषदेकडून करण्यात येत होते. सुरुवातीला शहरातील वृक्ष टवटवीत दिसायची; मात्र नवीन वर्षात नगर परिषदेमध्ये सत्ता बदल झाला. आता शहरातील दुभाजकावर वृक्षाऐवजी मोकाट कुत्रे बसलेली आढळून येत आहेत. या कारणामुळे शहरातील वृक्ष संवर्धनाचे दायित्व कोण घेणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.