शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

वृक्ष लागवड योजनेतील वृक्ष सुकले!

By admin | Updated: April 15, 2017 01:11 IST

संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष: सामाजिक संस्था, वृक्षप्रेमींनी फिरवली पाठ!

नीलेश शहाकार - बुलडाणाशासनाच्यावतीने मोठा गाजावाजा करीत गतवर्षी १ जुलै रोजी वन महोत्सव साजरा करत शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यात वृक्ष लागवड करण्यात आली; मात्र त्यानंतर वृक्ष संवर्धनाकडे प्रशासनासह सहभागी सामाजिक संघटनांकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने उन्हाळ्याच्या प्रारंभीच हे वृक्ष सुकले आहेत. पर्यावरण धोका निर्माण होत असल्यामुळे १ ते १५ जुलै २०१६ दरम्यान वन महोत्सव साजरा करून २ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था व विविध संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, तसेच पंधरा दिवसात शहर आणि ग्रामीण स्तरावर ३ लाख ४६२ वृक्ष लागवड करण्यात उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. मात्र मोठा गाजावाजा करून लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन प्रशासन व सामाजिक संघटनांना करता आले नाही. शेवटी वृक्षारोपण अभियान केवळ प्रसिद्धीपुरतेच मर्यादित राहिले. आज वृक्षारोपण झालेल्या ठिकाणी केवळ खड्डेच शिल्लक राहिले आहे, तर हजारो रुपये खर्च करून लावण्यात आलेले लोखंडी ट्रिगार्ड केवळ वृक्ष सुकल्याने रिकामे असल्याचे दृष्टीस पडत आहे. वृक्ष अडकले अतिक्रमणातशहरातील मलकापूर-औरंगाबाद मार्गावर वन महोत्सवादरम्यान तब्बल १०० वृक्षांचे रोप करण्यात आले. त्यावेळी स्थानिक नगरपालिकेकडून या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे संपूर्ण रस्ता मोकळा होता; मात्र आज या मार्गावर लघू व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केल्यामुळे या मार्गावर लावण्यात आलेले वृक्ष व त्यांचे ट्रि गार्ड अतिक्रमणात गडप झाले आहेत.वृक्ष संवर्धनाचे दायित्व कोण घेणार?बुलडाणा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे सामाजिक दायित्व अनेक संस्थांनी नेहमीच जोपासले आहे. यातून शहरातील विविध मार्गांवरील दुभाजक व परिसरातील वृक्षांना पाणी देण्याचे काम दररोज सायंकाळी बुलडाणा अर्बन संस्था व नगर परिषदेकडून करण्यात येत होते. सुरुवातीला शहरातील वृक्ष टवटवीत दिसायची; मात्र नवीन वर्षात नगर परिषदेमध्ये सत्ता बदल झाला. आता शहरातील दुभाजकावर वृक्षाऐवजी मोकाट कुत्रे बसलेली आढळून येत आहेत. या कारणामुळे शहरातील वृक्ष संवर्धनाचे दायित्व कोण घेणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.