शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वृक्ष गायब, उरले केवळ काट्यांचे फास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 13:27 IST

खामगाव:  तालुक्यातील विविक्ष क्षेत्रावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड घोळ प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आल्याचे समजते.

- अनिल गवई 

खामगाव:  तालुक्यातील विविक्ष क्षेत्रावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड घोळ प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी राज्य शासनाकडे दाखल तक्रारीची गंभीर दखल घेत,  मुख्य वनसंरक्षक, अमरावती यांनी संबंधितांना तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. परिणामी, सामाजिक वनीकरण विभागात एकच खळबळ उडाल्याचे दिसून येते.

पर्यावरण रक्षणासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून खामगाव-शेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रांवरील रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीऐवजी काही ठिकाणी कागदोपत्री तर काही ठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षांची निगा राखण्यात आली नाही. परिणामी, शेलोडी, तिंत्रव, चिंचपूर, अटाळी, हिंगणा कारेगाव, जलंब, माटरगाव आदी क्षेत्रांवरील हजारो वृक्ष गायब आहेत. काही ठिकाणी ही वृक्ष करपली असून, अनेक ठिकाणी वृक्षांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेले केवळ काट्यांचे फास शिल्लक आहेत. सामाजिक वन मजुराच्या पुढाकारातून लक्षावधींचा घोळ करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर या वनमजूराविरोधात महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ या बेब पोर्टलवर तक्रार करण्यात आली.  या तक्रारींच्या अनुषंगाने मुख्य वनसंरक्षक अमरावती यांनी विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, बुलडाणा यांना पत्र देत, तक्रार अर्ज विहित कालमर्यादेमध्ये निकाली काढण्याचे निर्देश दिलेत. तसेच सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही सुचविले आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागात एकच खळबळ उडाली आहे..

मजूरा विरोधात गंभीर तक्रार!

खामगाव परिक्षेत्रातील मजूर विजय नामदेव पवार यांनी वरिष्ठांची मर्जी संपादीत करीत वृक्ष लागवड योजनेत भ्रष्टाचार केल्याची गंभीर तक्रार शासनाच्या आपले सरकार बेब पोर्टलसह, विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण बुलडाणा आणि मुख्य वनसंरक्षक अमरावती यांच्याकडे करण्यात आली. या तक्रारींच्या अनुषंगाने वृक्ष लागवड घोळाची उच्च स्तरीय चौकशी केली जात आहे.

‘लोकमत’वृत्तांची वनमंत्र्यांकडून दखल!

खामगाव तालुक्यातील वृक्ष लागवड घोळ ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. यासंदर्भात विविध वृत्तांची अर्थ तथा वनमंत्री ना. सुधीर मुनगुंटीवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे  ‘लोकमत’वृत्तांच्या आधारेही खामगाव तालुक्यातील वृक्ष लागवड भ्रष्टाचाराची चौकशी केली जाणार असल्याची माहिती वनीकरण विभागाच्या एका बड्या अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

लक्षावधींच्या भ्रष्टाचाराच्या घोळावर शिक्कामोर्तब!

सामाजिक वनीकरण विभागातंर्गत खामगाव तालुक्यातील सुमारे ३० ते ३५ क्षेत्रांवरील रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष गायब आहेत. गायब असलेल्या वृक्षांची संख्या ही मोठी असल्याने, वृक्ष लागवड घोळ लक्षावधी रूपयांची धक्कादायक बाब सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत समोर आल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावforest departmentवनविभाग