शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

बुलडाणा-अजिंठा महामार्गावरील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 13:04 IST

विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय माहमार्गावरील तीन पर्यायी पुल बुलडाणा, जालना जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेले आहेत.

बुलडाणा: विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय माहमार्गावरील तीन पर्यायी पुल बुलडाणा, जालना जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे अजिंठा-बुलडाणा मार्गावरील वाहूक ठप्प झाली आहे. परिणामी सीमावर्ती भागातून अकोला, अमरावती आणि नागपूरला नेण्यात येणाºया भाजीपाल्याची आवकच थांबली आहे.बुलडाणा-अजिंठा या मार्गाचे गेल्या अडीच वर्षापासून काम सुरू आहे. या मार्गावर जालना जिल्ह्यातील धावडा व वाढोणा, जाळीचा देव या भागात गुरुवार, शुक्रवार दरम्यान जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धावड्या नजीकचा एक व वाढोणा येथील दोन नद्यांना पूर आल्याने आणखी एक असे तीन पूल वाहून गेले. त्यामुळे जवळपास १२ जून पासून बुलडाणा-अजिंठा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा फटका अजिंठा, शिवना, धावडा परिसरातील शेतकऱ्यांना बसला असून त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील या भागातून पालक, मेथीसह मिरची व अन्य भाजीपाल हा मोठ्या प्रमाणावर बुलडाणा, खामगाव, अमरावती व नागपूर येथे जातो. दररोज भाजीपाला घेवून वाहने या मार्गावरून नागपूरच्या दिशेने जातात. त्यामुळे विदर्भात येणाºया भाजीपाल्याची आवक रोडावली आहे. दुसरीकडे धाड-बुलडाणा मार्गावरील कोलवड नजीकचा पैनगंगा नदीवरील पर्यायी पुलही गेल्या तीन दिवसापूर्वी वाहून गेला आहे. त्यामुळे धाड, माहोरा आणि पारध परिसरातूनही मेथीची आवक घटली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ ई अंतर्गत बुलडाणा-अजिंठा मार्ग येतो. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याचे सीमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस