शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बुलडाणा-औरंगाबाद रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 15:20 IST

बुलडाणा ते औरंगाबाद या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीचाही प्रश्न आहे. 

बुलडाणा: जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला. यामध्ये रस्त्या काम सुरू असलेल्या ठिकाणी चिखल निर्माण झाल्याने वाहतूकीस अडचणी येत आहेत. बुलडाणाऔरंगाबाद रस्त्याचे अनेक दिवंसापासून काम सुरू आहे. थोडासा पाऊस आल्यानंतर या रस्त्यावर चिखल निर्माण होत असून, अपघाताच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे बुलडाणा ते औरंगाबाद या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीचाही प्रश्न आहे. बुलडाणा ते औरंगाबाद मार्गावर धाड असून, या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. परंतू हे काम संथगतीने होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पाऊस येताच या रस्त्यावर चिखल निर्माण होतो. परिणामी, वाहने रोडच्या बाजूला घसरून छोटे-मोठे अपघातही घडत आहे. या रस्त्यावर बºयाच ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चांगले आहे, त्याठिकाणी वाहने भरधाव वेगात जातात. परंतू काही अंतरावर जाताच पुन्हा खोदलेला रस्ता लागतो. त्यामुळे भरधाव वेगात आलेल्या वाहनाचा अपघात होण्याचा धोका वाढलेला आहे. हा रस्ता घाट व वळण मार्गातून जात असल्याने त्याठिकाणीही अपघाताचा धोका अधिक आहे. बुलडाणा-धाड रोडने औरंगाबाद मार्ग जात असल्याने या रस्त्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. बुलडाणा ते धाडपर्यंतच्या या रस्त्याला अनेक खेडे जोडलेली आहेत. काही ठिकाणी पुलाचे कामही सुरू आहे. त्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे, त्याठिकाणावरून आता वाहन नेताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाने खोदून ठेवलेले रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा वेग वाढविण्याची गरज आहे. 

घाट, वळणमार्ग ठरतोय धोक्याचाबुलडाणा ते धाड मार्गावर येणारा घाट व वळणमार्गाच्या ठिकाणीही रस्त्याचे खोदकाम झालेले आहे. खोदकाम झाल्यानंतर त्याठिकाणी रस्ताचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे पाऊस येताच या रस्त्यावरील घाट व वळण मार्ग धोक्याचा ठरत आहे. 

अर्धवट कामाने वाढली डोकेदुखीबुलडाणा-औरंगाबाद मार्गाचे काम बºयाच ठिकाणी अर्धवट झालेले आहे. दोन ते तीन किलोमिटरचा रस्ता पूर्ण केल्यानंतर पुन्हा काही अंतरावरचे काम रखडलेले आहे. थोड्या-थोड्या अंतरावर या रस्त्याचे काम केलेले आहे. या अर्धवट कामामुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. 

धाड येथे रस्तावर साचते पाणीबुलडाणा ते औरंगाबाद रोडवर धाड येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. त्याचबरोबरच चिखलही निर्माण होत आहे. धाड बसथांब्याच्या ठिकाणचा हा रस्ता सध्या अपघातास आमंत्रण देणारा ठरत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAurangabadऔरंगाबाद