शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

बुलडाणा-औरंगाबाद रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 15:20 IST

बुलडाणा ते औरंगाबाद या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीचाही प्रश्न आहे. 

बुलडाणा: जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला. यामध्ये रस्त्या काम सुरू असलेल्या ठिकाणी चिखल निर्माण झाल्याने वाहतूकीस अडचणी येत आहेत. बुलडाणाऔरंगाबाद रस्त्याचे अनेक दिवंसापासून काम सुरू आहे. थोडासा पाऊस आल्यानंतर या रस्त्यावर चिखल निर्माण होत असून, अपघाताच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे बुलडाणा ते औरंगाबाद या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीचाही प्रश्न आहे. बुलडाणा ते औरंगाबाद मार्गावर धाड असून, या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. परंतू हे काम संथगतीने होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पाऊस येताच या रस्त्यावर चिखल निर्माण होतो. परिणामी, वाहने रोडच्या बाजूला घसरून छोटे-मोठे अपघातही घडत आहे. या रस्त्यावर बºयाच ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चांगले आहे, त्याठिकाणी वाहने भरधाव वेगात जातात. परंतू काही अंतरावर जाताच पुन्हा खोदलेला रस्ता लागतो. त्यामुळे भरधाव वेगात आलेल्या वाहनाचा अपघात होण्याचा धोका वाढलेला आहे. हा रस्ता घाट व वळण मार्गातून जात असल्याने त्याठिकाणीही अपघाताचा धोका अधिक आहे. बुलडाणा-धाड रोडने औरंगाबाद मार्ग जात असल्याने या रस्त्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. बुलडाणा ते धाडपर्यंतच्या या रस्त्याला अनेक खेडे जोडलेली आहेत. काही ठिकाणी पुलाचे कामही सुरू आहे. त्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे, त्याठिकाणावरून आता वाहन नेताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाने खोदून ठेवलेले रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा वेग वाढविण्याची गरज आहे. 

घाट, वळणमार्ग ठरतोय धोक्याचाबुलडाणा ते धाड मार्गावर येणारा घाट व वळणमार्गाच्या ठिकाणीही रस्त्याचे खोदकाम झालेले आहे. खोदकाम झाल्यानंतर त्याठिकाणी रस्ताचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे पाऊस येताच या रस्त्यावरील घाट व वळण मार्ग धोक्याचा ठरत आहे. 

अर्धवट कामाने वाढली डोकेदुखीबुलडाणा-औरंगाबाद मार्गाचे काम बºयाच ठिकाणी अर्धवट झालेले आहे. दोन ते तीन किलोमिटरचा रस्ता पूर्ण केल्यानंतर पुन्हा काही अंतरावरचे काम रखडलेले आहे. थोड्या-थोड्या अंतरावर या रस्त्याचे काम केलेले आहे. या अर्धवट कामामुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. 

धाड येथे रस्तावर साचते पाणीबुलडाणा ते औरंगाबाद रोडवर धाड येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. त्याचबरोबरच चिखलही निर्माण होत आहे. धाड बसथांब्याच्या ठिकाणचा हा रस्ता सध्या अपघातास आमंत्रण देणारा ठरत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAurangabadऔरंगाबाद