शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

नाफेडकडे तीन कोटी थकीत; लोणारातील शेतकरी सापडला अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:39 IST

लोणार : गुलाबी बोंडअळीनंतर गारपिटीमुळे शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच शेतकरी हितासाठी शासनाने नाफेडतर्फे सुरू केलेल्या हमी भाव केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विकल्यानंतरही ३ कोटी ७ लाख रुपयांचे चुकारे थकीत असल्यामुळे  शेतकर्‍यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा डोंगर वाढत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विवाह समारंभ मोडण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : गुलाबी बोंडअळीनंतर गारपिटीमुळे शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच शेतकरी हितासाठी शासनाने नाफेडतर्फे सुरू केलेल्या हमी भाव केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विकल्यानंतरही ३ कोटी ७ लाख रुपयांचे चुकारे थकीत असल्यामुळे  शेतकर्‍यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा डोंगर वाढत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विवाह समारंभ मोडण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.  शासकीय हमी भाव केंद्रावर तूर विकण्यासाठी लोणार तालुक्यात गेल्या महिनाभरात अंदाजे ५ हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली; मात्र तूर खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांना, व्यापार्‍यांना तूर विकून पैसे मोकळे करून घेतले. उशिरा तूर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकरी मात्र अधिकच दुखावला गेला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी शासकीय खरेदी केंद्रावर मूग, उडीद व सोयाबीन शेतकर्‍यांनी मोठय़ा अपेक्षेने विकला. शासकीय हमी भाव मिळेल आणि पैसेही लवकर मिळतील, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी विकलेल्या शेतमालाचे मात्र अजून पैसे मिळालेले नाहीत. तर शेतकर्‍यांजवळ असलेली जमापुंजी संपलेली असून, मुलीच्या विवाहापासून तर शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने तगादा लावल्याने ३ ते ५ टक्के व्याजदराने सावकाराकडून कर्ज घेतले जात आहे. नाफेड खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे न मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांनी नगदी पैसे मिळण्यासाठी कमी भावात व्यापार्‍यांना माल विकत आहेत. 

७१९ शेतकर्‍यांची आहे समस्यालोणार तालुक्यातील ७१९ शेतकर्‍यांचा ४ हजार ९८0 क्विंटल उडीद नाफेडने खरेदी केला आहे, तर २ कोटी ६८ लाख ९२ हजार रकमेपैकी ५३४ शेतकर्‍यांना १ कोटी ८७ लाख ९४ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले आहे; मात्र उडिदाचे अजून, ८0 लाख ९८ हजार रुपये नाफेडकडे बाकी आहेत, तसेच  ३९८ शेतकर्‍यांनी २ हजार १९३ क्विंटल मूग नाफेडला विकला. १ कोटी २२ लाख २५ हजार रुपये रकमेपैकी ३३४ शेतकर्‍यांना १ कोटी ६ लाख ५२ हजार रुपये देण्यात आले; मात्र अजूनही ६४ शेतकर्‍यांचे १५ लाख ७३ हजार रुपये नाफेडकडे बाकी आहेत.  

टॅग्स :Farmerशेतकरी