शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नाफेडकडे तीन कोटी थकीत; लोणारातील शेतकरी सापडला अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:39 IST

लोणार : गुलाबी बोंडअळीनंतर गारपिटीमुळे शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच शेतकरी हितासाठी शासनाने नाफेडतर्फे सुरू केलेल्या हमी भाव केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विकल्यानंतरही ३ कोटी ७ लाख रुपयांचे चुकारे थकीत असल्यामुळे  शेतकर्‍यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा डोंगर वाढत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विवाह समारंभ मोडण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : गुलाबी बोंडअळीनंतर गारपिटीमुळे शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच शेतकरी हितासाठी शासनाने नाफेडतर्फे सुरू केलेल्या हमी भाव केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विकल्यानंतरही ३ कोटी ७ लाख रुपयांचे चुकारे थकीत असल्यामुळे  शेतकर्‍यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा डोंगर वाढत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विवाह समारंभ मोडण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.  शासकीय हमी भाव केंद्रावर तूर विकण्यासाठी लोणार तालुक्यात गेल्या महिनाभरात अंदाजे ५ हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली; मात्र तूर खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांना, व्यापार्‍यांना तूर विकून पैसे मोकळे करून घेतले. उशिरा तूर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकरी मात्र अधिकच दुखावला गेला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी शासकीय खरेदी केंद्रावर मूग, उडीद व सोयाबीन शेतकर्‍यांनी मोठय़ा अपेक्षेने विकला. शासकीय हमी भाव मिळेल आणि पैसेही लवकर मिळतील, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी विकलेल्या शेतमालाचे मात्र अजून पैसे मिळालेले नाहीत. तर शेतकर्‍यांजवळ असलेली जमापुंजी संपलेली असून, मुलीच्या विवाहापासून तर शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने तगादा लावल्याने ३ ते ५ टक्के व्याजदराने सावकाराकडून कर्ज घेतले जात आहे. नाफेड खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे न मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांनी नगदी पैसे मिळण्यासाठी कमी भावात व्यापार्‍यांना माल विकत आहेत. 

७१९ शेतकर्‍यांची आहे समस्यालोणार तालुक्यातील ७१९ शेतकर्‍यांचा ४ हजार ९८0 क्विंटल उडीद नाफेडने खरेदी केला आहे, तर २ कोटी ६८ लाख ९२ हजार रकमेपैकी ५३४ शेतकर्‍यांना १ कोटी ८७ लाख ९४ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले आहे; मात्र उडिदाचे अजून, ८0 लाख ९८ हजार रुपये नाफेडकडे बाकी आहेत, तसेच  ३९८ शेतकर्‍यांनी २ हजार १९३ क्विंटल मूग नाफेडला विकला. १ कोटी २२ लाख २५ हजार रुपये रकमेपैकी ३३४ शेतकर्‍यांना १ कोटी ६ लाख ५२ हजार रुपये देण्यात आले; मात्र अजूनही ६४ शेतकर्‍यांचे १५ लाख ७३ हजार रुपये नाफेडकडे बाकी आहेत.  

टॅग्स :Farmerशेतकरी