शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडकडे तीन कोटी थकीत; लोणारातील शेतकरी सापडला अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:39 IST

लोणार : गुलाबी बोंडअळीनंतर गारपिटीमुळे शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच शेतकरी हितासाठी शासनाने नाफेडतर्फे सुरू केलेल्या हमी भाव केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विकल्यानंतरही ३ कोटी ७ लाख रुपयांचे चुकारे थकीत असल्यामुळे  शेतकर्‍यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा डोंगर वाढत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विवाह समारंभ मोडण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : गुलाबी बोंडअळीनंतर गारपिटीमुळे शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच शेतकरी हितासाठी शासनाने नाफेडतर्फे सुरू केलेल्या हमी भाव केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विकल्यानंतरही ३ कोटी ७ लाख रुपयांचे चुकारे थकीत असल्यामुळे  शेतकर्‍यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा डोंगर वाढत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विवाह समारंभ मोडण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.  शासकीय हमी भाव केंद्रावर तूर विकण्यासाठी लोणार तालुक्यात गेल्या महिनाभरात अंदाजे ५ हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली; मात्र तूर खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांना, व्यापार्‍यांना तूर विकून पैसे मोकळे करून घेतले. उशिरा तूर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकरी मात्र अधिकच दुखावला गेला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी शासकीय खरेदी केंद्रावर मूग, उडीद व सोयाबीन शेतकर्‍यांनी मोठय़ा अपेक्षेने विकला. शासकीय हमी भाव मिळेल आणि पैसेही लवकर मिळतील, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी विकलेल्या शेतमालाचे मात्र अजून पैसे मिळालेले नाहीत. तर शेतकर्‍यांजवळ असलेली जमापुंजी संपलेली असून, मुलीच्या विवाहापासून तर शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने तगादा लावल्याने ३ ते ५ टक्के व्याजदराने सावकाराकडून कर्ज घेतले जात आहे. नाफेड खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे न मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांनी नगदी पैसे मिळण्यासाठी कमी भावात व्यापार्‍यांना माल विकत आहेत. 

७१९ शेतकर्‍यांची आहे समस्यालोणार तालुक्यातील ७१९ शेतकर्‍यांचा ४ हजार ९८0 क्विंटल उडीद नाफेडने खरेदी केला आहे, तर २ कोटी ६८ लाख ९२ हजार रकमेपैकी ५३४ शेतकर्‍यांना १ कोटी ८७ लाख ९४ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले आहे; मात्र उडिदाचे अजून, ८0 लाख ९८ हजार रुपये नाफेडकडे बाकी आहेत, तसेच  ३९८ शेतकर्‍यांनी २ हजार १९३ क्विंटल मूग नाफेडला विकला. १ कोटी २२ लाख २५ हजार रुपये रकमेपैकी ३३४ शेतकर्‍यांना १ कोटी ६ लाख ५२ हजार रुपये देण्यात आले; मात्र अजूनही ६४ शेतकर्‍यांचे १५ लाख ७३ हजार रुपये नाफेडकडे बाकी आहेत.  

टॅग्स :Farmerशेतकरी