शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कागदोपत्री लागवडीमुळेच पेटली वनीकरणाची हजारो झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 14:07 IST

खामगाव : सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेला संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येते. कागदोपत्री लागवड झाल्याचे बिंग फूटू  नये म्हणून मलकापूर तालुक्यातील चक्क साडेपाच हजार झाडे पेटविण्यात आली.

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेला संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येते. कागदोपत्री लागवड झाल्याचे बिंग फूटू  नये म्हणून मलकापूर तालुक्यातील चक्क साडेपाच हजार झाडे पेटविण्यात आली.  याप्रकरणी पोलिसांचा पंचनामाही संबंधितांनी ‘मॅनेज’केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

सामाजिक वनीकरण विभागाच्या शेगाव-खामगाव क्षेत्रावरील हजारो झाडे चोरी गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नांदुरा तालुक्यातही लक्षावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला. गत आठवड्यात नांदुरा सामाजिक वनीकरण विभागातंर्गत तालुक्यातील विविध क्षेत्रावर नाविण्यपूर्ण योजनेतून हजारो झाडे लावण्यात आली. मात्र, या झाडांची लागवड आणि देखभाल कागदोपत्री करीत लक्षावधी रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. रोपवाटीकेतही कागदोपत्रीच रोपं तयार झाली. कागदावरच ट्री-गार्डही खरेदीचा भ्रष्टाचार उघडकीस येत नाही तोच, मलकापूर तालुक्यातील धरणगाव क्षेत्रावरील साडे पाच हजार जाळण्यात आल्याची वस्तुस्थिती समोर आली. दरम्यान, एकाच रात्रीतून साडे पाच हजार जळाली तरी कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत असून, कागदोपत्री लावण्यात आलेली वृक्ष लागवड आणि देखभालीचे बिंग फुटू नये. यासाठी वृक्ष पेटविण्याचा बनाव रचण्यात आल्याची चर्चा आता सामाजिक वनीकरण विभागात रंगू लागली आहे. मलकापूर तालुक्यातील वृक्ष जळाल्याप्रकरणी अधिक माहितीसाठी वनक्षेत्रपाल एस.के.काळुसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होवू शकले नाही.

 

साडेपाच हजार झाडे जाळल्याची तक्रार!

मलकापूर वन परिक्षेत्रातंर्गत धरणगाव शिवारातील गट क्रमांक १११ मधील साडेपाच हजार झाडं अज्ञातांनी जाळल्याची तक्रार वनरक्षक बोंबटकार यांनी  १९ जानेवारी रोजी केली. मलकापूर शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, एकाच रात्रीतून हजारो झाडे जळाली तरी कशी? असा संदिग्ध प्रश्न उपस्थित होत आहे.  दरम्यान, वरिष्ठांच्या दबावातून वनरक्षकांनी तक्रार केल्याचे पोलिस चौकशीत समोर आल्याचे समजते.

 

पोलिस पंचनामा ‘मॅनेज’!

धरणगाव क्षेत्रावरील एका शेताजवळ धुरा जाळण्यात आल्याने  काही वृक्षांना आस लागली. यामध्ये काही वृक्ष जळाले. मात्र, प्रत्यक्षात साडेपाच हजार झाडं जाळण्यात आल्याचा पंचनामा पोलिसांनी केला. स्थळावरील वस्तुस्थिती आणि पंचनामा यामध्ये प्रचंड तफावत असल्याने, सामाजिक वनीकरणच्या अधिकाºयांनी पोलिसांनी संगनमत करून हा पंचनामा ‘मॅनेज’ केल्याची चर्चा आहे.

 

मलकापूर तालुक्यातील धरणगाव क्षेत्रावरील वृक्ष जाळल्या प्रकरणी संबंधितांकडून  पोलिसांत तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. वृक्ष लागवड योजनेतंर्गत झालेल्या लागवडीची चौकशी केली जाईल.

- एस.ए.पारडीकर,

विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण, बुलडाणा.

परिस्थिती जन्य पुराव्याच्या आधारे पोलिसांकडून पंचनामा करण्यात येतो. यामध्ये पंच साक्षीदार असतात. तथापि, मलकापूर येथील एकाच रात्रीतून साडेपाच हजार जाळण्यात आलेल्या प्रकाराचा तपास सुरू असून, यामध्ये किंचितही संदिग्धता आढळून आल्यास निस्पक्ष चौकशी करण्याचे संबंधितांना सुचविले जाईल.

- गिरीश बोबडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, मलकापूर.

टॅग्स :khamgaonखामगावfireआगforestजंगल