शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

कागदोपत्री लागवडीमुळेच पेटली वनीकरणाची हजारो झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 14:07 IST

खामगाव : सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेला संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येते. कागदोपत्री लागवड झाल्याचे बिंग फूटू  नये म्हणून मलकापूर तालुक्यातील चक्क साडेपाच हजार झाडे पेटविण्यात आली.

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेला संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येते. कागदोपत्री लागवड झाल्याचे बिंग फूटू  नये म्हणून मलकापूर तालुक्यातील चक्क साडेपाच हजार झाडे पेटविण्यात आली.  याप्रकरणी पोलिसांचा पंचनामाही संबंधितांनी ‘मॅनेज’केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

सामाजिक वनीकरण विभागाच्या शेगाव-खामगाव क्षेत्रावरील हजारो झाडे चोरी गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नांदुरा तालुक्यातही लक्षावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला. गत आठवड्यात नांदुरा सामाजिक वनीकरण विभागातंर्गत तालुक्यातील विविध क्षेत्रावर नाविण्यपूर्ण योजनेतून हजारो झाडे लावण्यात आली. मात्र, या झाडांची लागवड आणि देखभाल कागदोपत्री करीत लक्षावधी रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. रोपवाटीकेतही कागदोपत्रीच रोपं तयार झाली. कागदावरच ट्री-गार्डही खरेदीचा भ्रष्टाचार उघडकीस येत नाही तोच, मलकापूर तालुक्यातील धरणगाव क्षेत्रावरील साडे पाच हजार जाळण्यात आल्याची वस्तुस्थिती समोर आली. दरम्यान, एकाच रात्रीतून साडे पाच हजार जळाली तरी कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत असून, कागदोपत्री लावण्यात आलेली वृक्ष लागवड आणि देखभालीचे बिंग फुटू नये. यासाठी वृक्ष पेटविण्याचा बनाव रचण्यात आल्याची चर्चा आता सामाजिक वनीकरण विभागात रंगू लागली आहे. मलकापूर तालुक्यातील वृक्ष जळाल्याप्रकरणी अधिक माहितीसाठी वनक्षेत्रपाल एस.के.काळुसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होवू शकले नाही.

 

साडेपाच हजार झाडे जाळल्याची तक्रार!

मलकापूर वन परिक्षेत्रातंर्गत धरणगाव शिवारातील गट क्रमांक १११ मधील साडेपाच हजार झाडं अज्ञातांनी जाळल्याची तक्रार वनरक्षक बोंबटकार यांनी  १९ जानेवारी रोजी केली. मलकापूर शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, एकाच रात्रीतून हजारो झाडे जळाली तरी कशी? असा संदिग्ध प्रश्न उपस्थित होत आहे.  दरम्यान, वरिष्ठांच्या दबावातून वनरक्षकांनी तक्रार केल्याचे पोलिस चौकशीत समोर आल्याचे समजते.

 

पोलिस पंचनामा ‘मॅनेज’!

धरणगाव क्षेत्रावरील एका शेताजवळ धुरा जाळण्यात आल्याने  काही वृक्षांना आस लागली. यामध्ये काही वृक्ष जळाले. मात्र, प्रत्यक्षात साडेपाच हजार झाडं जाळण्यात आल्याचा पंचनामा पोलिसांनी केला. स्थळावरील वस्तुस्थिती आणि पंचनामा यामध्ये प्रचंड तफावत असल्याने, सामाजिक वनीकरणच्या अधिकाºयांनी पोलिसांनी संगनमत करून हा पंचनामा ‘मॅनेज’ केल्याची चर्चा आहे.

 

मलकापूर तालुक्यातील धरणगाव क्षेत्रावरील वृक्ष जाळल्या प्रकरणी संबंधितांकडून  पोलिसांत तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. वृक्ष लागवड योजनेतंर्गत झालेल्या लागवडीची चौकशी केली जाईल.

- एस.ए.पारडीकर,

विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण, बुलडाणा.

परिस्थिती जन्य पुराव्याच्या आधारे पोलिसांकडून पंचनामा करण्यात येतो. यामध्ये पंच साक्षीदार असतात. तथापि, मलकापूर येथील एकाच रात्रीतून साडेपाच हजार जाळण्यात आलेल्या प्रकाराचा तपास सुरू असून, यामध्ये किंचितही संदिग्धता आढळून आल्यास निस्पक्ष चौकशी करण्याचे संबंधितांना सुचविले जाईल.

- गिरीश बोबडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, मलकापूर.

टॅग्स :khamgaonखामगावfireआगforestजंगल