शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

गव्हात वाढले टुशांचे प्रमाण, भाव कमी, उत्पादनातही घट

By विवेक चांदुरकर | Updated: April 5, 2024 16:58 IST

गहू उत्पादक शेतकरी संकटात, उत्पादन खर्चही निघेना.

विवेक चांदूरकर,खामगाव : गव्हाच्या पिकात टुशांचे प्रमाण वाढले आहे. एका क्विंटलमध्ये जवळपास २५ किलो टुसा निघत आहे तसेच यावर्षी गव्हाच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांनी घट आली असून, भावही अल्प आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गहू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात रब्बी हंगामात गव्हाची पेरणी ५७,०५९ हेक्टरवर करण्यात आली आहे. गव्हाचे सरासरी पेरणी क्षेत्र ५५,३९६ हेक्टर आहे. यावर्षी १०३ टक्के पेरणी झाली आहे. गतवर्षी गव्हाला २,४०० ते २,५०० रूपये भाव होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली. मात्र, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

सध्या गहू पीक काढणीला आले आहे. शेतकरी हार्वेस्टरने गव्हाची काढणी करीत आहेत. जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे गव्हाचे पीक झाेपले. त्यामुळे उंब्या भरल्या नाहीत. परिणामी टुशांचे प्रमाण वाढले आहे. टुशांच्या प्रमाणामुळे व्यापाऱ्यांनी भाव पाडले असून, अल्प भावात गव्हाची खरेदी करीत आहेत. आधीच गव्हाला भाव कमी आहे. त्यातच उत्पादनात घटल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.गव्हाचे भाव पडले-

गतवर्षी गव्हाला २,४०० ते २,५०० रूपये भाव होता. यावर्षी केवळ १,७०० ते १,८०० रूपये भाव मिळत आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाला ४ एप्रिल रोजी १,९५० ते २,६०० रूपये दर मिळाला. सरासरी भाव २,१०० रूपये भाव मिळाला. बाजार समितीत २३० क्विंटलची आवक झाली होती. ग्रामीण भागात गव्हाची खरेदी कमी भावात करण्यात येत आहे.

यावर्षी गहू पिकात टुशांचे प्रमाण अधिक आहे. तसेच उत्पादनात जवळपास ५० टक्क्यांनी घट आली आहे. त्यातच भावही कमी आहे. परिणामी गहू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामातही नुकसान सहन करावे लागत आहे - कृष्णा पाटील, शेतकरी

अवकाळी पावसामुळे गहू खाली पडल्यानंतर उंब्या भरत नाहीत. त्यामुळे टुशांचे प्रमाण वाढते. तसेच गहू आंबट ओला असताना काढला तर टुशांचे प्रमाण वाढते. ही हार्वेस्टिंगची समस्या आहे.-अनिल गाभणे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWheatगहूFarmerशेतकरी