शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गव्हात वाढले टुशांचे प्रमाण, भाव कमी, उत्पादनातही घट

By विवेक चांदुरकर | Updated: April 5, 2024 16:58 IST

गहू उत्पादक शेतकरी संकटात, उत्पादन खर्चही निघेना.

विवेक चांदूरकर,खामगाव : गव्हाच्या पिकात टुशांचे प्रमाण वाढले आहे. एका क्विंटलमध्ये जवळपास २५ किलो टुसा निघत आहे तसेच यावर्षी गव्हाच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांनी घट आली असून, भावही अल्प आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गहू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात रब्बी हंगामात गव्हाची पेरणी ५७,०५९ हेक्टरवर करण्यात आली आहे. गव्हाचे सरासरी पेरणी क्षेत्र ५५,३९६ हेक्टर आहे. यावर्षी १०३ टक्के पेरणी झाली आहे. गतवर्षी गव्हाला २,४०० ते २,५०० रूपये भाव होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली. मात्र, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

सध्या गहू पीक काढणीला आले आहे. शेतकरी हार्वेस्टरने गव्हाची काढणी करीत आहेत. जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे गव्हाचे पीक झाेपले. त्यामुळे उंब्या भरल्या नाहीत. परिणामी टुशांचे प्रमाण वाढले आहे. टुशांच्या प्रमाणामुळे व्यापाऱ्यांनी भाव पाडले असून, अल्प भावात गव्हाची खरेदी करीत आहेत. आधीच गव्हाला भाव कमी आहे. त्यातच उत्पादनात घटल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.गव्हाचे भाव पडले-

गतवर्षी गव्हाला २,४०० ते २,५०० रूपये भाव होता. यावर्षी केवळ १,७०० ते १,८०० रूपये भाव मिळत आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाला ४ एप्रिल रोजी १,९५० ते २,६०० रूपये दर मिळाला. सरासरी भाव २,१०० रूपये भाव मिळाला. बाजार समितीत २३० क्विंटलची आवक झाली होती. ग्रामीण भागात गव्हाची खरेदी कमी भावात करण्यात येत आहे.

यावर्षी गहू पिकात टुशांचे प्रमाण अधिक आहे. तसेच उत्पादनात जवळपास ५० टक्क्यांनी घट आली आहे. त्यातच भावही कमी आहे. परिणामी गहू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामातही नुकसान सहन करावे लागत आहे - कृष्णा पाटील, शेतकरी

अवकाळी पावसामुळे गहू खाली पडल्यानंतर उंब्या भरत नाहीत. त्यामुळे टुशांचे प्रमाण वाढते. तसेच गहू आंबट ओला असताना काढला तर टुशांचे प्रमाण वाढते. ही हार्वेस्टिंगची समस्या आहे.-अनिल गाभणे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWheatगहूFarmerशेतकरी