शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

डीजेच्या तालावर नाचत बसला नवरा, तिने निवडला 'दुसरा'; विवाह सोहळा ठरला चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 10:30 IST

मलकापूर पांग्रा येथील मुलीचा विवाह कंडारी येथील युवकाबरोबर २२ एप्रिलला ठरला होता. दुपारी साधारण ३.३० वाजत लग्नाची वेळ होती. त्यापूर्वी वराकडील मंडळी लग्नमंडपात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र झाले उलटे, पाहुणे उशिरा आले.

सिंदखेडराजा : गत काही वर्षांपासून लग्न ठरलेल्या वेळेत लागत नसल्याचे चित्र आहे. याला अनेक कारणे असली तरी नवरदेवांसमोर नाचणारी मंडळी हे एक प्रमुख कारण आहे. डीजेच्या तालावर थिकरणाऱ्या मित्रांच्या नादात एकावर नवरीच गमावण्याची वेळ आली. वरात लग्न मंडपात उशिरा पोहोचल्याने संतप्त झालेल्या वधूकडील मंडळींनी लग्नच मोडले. एवढेच नव्हे तर दुसऱ्याच मुलाबरोबर या मुलीचा विवाहही आटाोपला. मलकापूर पांग्रा येथील हा विवाह सोहळा परिसरातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

मलकापूर पांग्रा येथील मुलीचा विवाह कंडारी येथील युवकाबरोबर २२ एप्रिलला ठरला होता. दुपारी साधारण ३.३० वाजत लग्नाची वेळ होती. त्यापूर्वी वराकडील मंडळी लग्नमंडपात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र झाले उलटे, पाहुणे उशिरा आले. त्यामुळे लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या धार्मिक विधींना अपेक्षेप्रमाणे उशीर झाला. लग्नाच्या वेळेत विधी झाल्याने परण्या निघण्यासदेखील उशीर झाला. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र, नवरदेवाची वरात निघाली आणि डीजे, बँडच्या तालावर थिरकणारे नवरदेवाचे मित्र मैदानात उतरले. मद्यधुंद अवस्थेत थिरकण्याच्या नादात दुपारचे लग्न तब्बल चार ते पाच तास उशिराने लागण्याची परिस्थिती निर्माण झाली.

लग्न न लावताच परतला नवरदेववधूकडील मंडळींचा संयम संपला होता. वरात लग्न मंडपात येताच वधूच्या नातेवाइकांनी नवरदेवाकडील मंडळींना उशीर का केला, असा प्रश्न विचारला. संयम संपलेल्या नवरीकडील मंडळींचा पारा चढलेला होता. तसा नवरदेवाकडील मंडळींचादेखील पारा चढला, वादविवाद, झटापट झाली आणि नवरीकडील मंडळींनी जवळच्या पाहुण्यांशी सल्लामसलत करून नवरदेवाला लग्न न लावताच माघारी जाण्याचे फर्मान काढले! वाद वाढला... पण नवरदेवाकडील मंडळींना अखेर लग्न मंडपातून लग्नाशिवाय काढता पाय घ्यावा लागला.

नाचण्याच्या नादात गमावू नका नवरीलग्न ठरविताना लग्न मुहूर्त काढला जातो, मात्र सध्याच्या परिस्थितीत मुहूर्तावर कुठेच लग्न लागत नाही. नवरदेवाच्या मित्रमंडळींना थिरकायचे असते तर वधूकडील मंडळींना लग्नापेक्षा सत्कार समारंभात अधिक रस असतो. याचा परिणाम लग्न मुहूर्तावर होऊ लागला आहे. याचा विचार दाेन्हीकडील मंडळींनी करण्याची काळाची गरज आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा