शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

डीजेच्या तालावर नाचत बसला नवरा, तिने निवडला 'दुसरा'; विवाह सोहळा ठरला चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 10:30 IST

मलकापूर पांग्रा येथील मुलीचा विवाह कंडारी येथील युवकाबरोबर २२ एप्रिलला ठरला होता. दुपारी साधारण ३.३० वाजत लग्नाची वेळ होती. त्यापूर्वी वराकडील मंडळी लग्नमंडपात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र झाले उलटे, पाहुणे उशिरा आले.

सिंदखेडराजा : गत काही वर्षांपासून लग्न ठरलेल्या वेळेत लागत नसल्याचे चित्र आहे. याला अनेक कारणे असली तरी नवरदेवांसमोर नाचणारी मंडळी हे एक प्रमुख कारण आहे. डीजेच्या तालावर थिकरणाऱ्या मित्रांच्या नादात एकावर नवरीच गमावण्याची वेळ आली. वरात लग्न मंडपात उशिरा पोहोचल्याने संतप्त झालेल्या वधूकडील मंडळींनी लग्नच मोडले. एवढेच नव्हे तर दुसऱ्याच मुलाबरोबर या मुलीचा विवाहही आटाोपला. मलकापूर पांग्रा येथील हा विवाह सोहळा परिसरातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

मलकापूर पांग्रा येथील मुलीचा विवाह कंडारी येथील युवकाबरोबर २२ एप्रिलला ठरला होता. दुपारी साधारण ३.३० वाजत लग्नाची वेळ होती. त्यापूर्वी वराकडील मंडळी लग्नमंडपात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र झाले उलटे, पाहुणे उशिरा आले. त्यामुळे लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या धार्मिक विधींना अपेक्षेप्रमाणे उशीर झाला. लग्नाच्या वेळेत विधी झाल्याने परण्या निघण्यासदेखील उशीर झाला. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र, नवरदेवाची वरात निघाली आणि डीजे, बँडच्या तालावर थिरकणारे नवरदेवाचे मित्र मैदानात उतरले. मद्यधुंद अवस्थेत थिरकण्याच्या नादात दुपारचे लग्न तब्बल चार ते पाच तास उशिराने लागण्याची परिस्थिती निर्माण झाली.

लग्न न लावताच परतला नवरदेववधूकडील मंडळींचा संयम संपला होता. वरात लग्न मंडपात येताच वधूच्या नातेवाइकांनी नवरदेवाकडील मंडळींना उशीर का केला, असा प्रश्न विचारला. संयम संपलेल्या नवरीकडील मंडळींचा पारा चढलेला होता. तसा नवरदेवाकडील मंडळींचादेखील पारा चढला, वादविवाद, झटापट झाली आणि नवरीकडील मंडळींनी जवळच्या पाहुण्यांशी सल्लामसलत करून नवरदेवाला लग्न न लावताच माघारी जाण्याचे फर्मान काढले! वाद वाढला... पण नवरदेवाकडील मंडळींना अखेर लग्न मंडपातून लग्नाशिवाय काढता पाय घ्यावा लागला.

नाचण्याच्या नादात गमावू नका नवरीलग्न ठरविताना लग्न मुहूर्त काढला जातो, मात्र सध्याच्या परिस्थितीत मुहूर्तावर कुठेच लग्न लागत नाही. नवरदेवाच्या मित्रमंडळींना थिरकायचे असते तर वधूकडील मंडळींना लग्नापेक्षा सत्कार समारंभात अधिक रस असतो. याचा परिणाम लग्न मुहूर्तावर होऊ लागला आहे. याचा विचार दाेन्हीकडील मंडळींनी करण्याची काळाची गरज आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा