शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

खामगावात १00 एकरावर होणार टेक्सटाइल पार्क - मुख्यमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:18 IST

राज्यभरात टेक्सटाइल पार्कची निर्मिती केली जात आहे. त्यामधील एक टेक्सटाइल पार्क खामगावात होणार असून, त्याकरिता कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुढाकाराने १00 एकर जमीन उपलब्ध झाल्याने लवकरच हा टेक्सटाइल पार्क सुरू करु, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.

ठळक मुद्देनांदगाव पेठच्या धर्तीवर ‘कापूस ते तयार कपडे’ धोरण राबविण्याचा मानस

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  राज्य शासन बळीराजाच्या उत्थानासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कार्य करीत असून कापूस ते कापड, कापड ते तयार कपडे, तयार कपडे ते कपड्यांची निर्यात, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी राज्यभरात टेक्सटाइल पार्कची निर्मिती केली जात आहे. त्यामधील एक टेक्सटाइल पार्क खामगावात होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. शासकीय तंत्र निकेतन मैदानावर आयोजित कृषी महोत्सव-२0१८ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी फलोत्पादन मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, खा.प्रतापराव जाधव, खा.रक्षा खडसे, आ.डॉ.संजय कुटे, आ.डॉ. संजय रायमुलकर, आ.अँड. आकाश फुंडकर, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, नगराध्यक्ष अनिता डवरे,  महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले,   डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.वेंकटेश्‍वरलु आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे निर्माण झालेला टेक्सटाइल पार्क शेतकर्‍यांनी जावून बघावा. जिथे दोन वर्षांपूर्वी काळे कुत्रेही फिरकत नव्हते, तिथे आता अजिबात जमीन शिल्लक नाही, असाच पार्क आता खामगाव येथे तयार केला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

सर्वाधिक गारपिटीचा फटका बुलडाण्यालाच!सर्वाधिक कर्जमाफी बुलडाण्याला मिळाली, तसाच गारपिटीचा सर्वाधिक फटकाही बुलडाण्याला बसला आहे. राज्यात १ लाख २५ हजार हेक्टर जमिनीला गारपिटीने तडाखा दिला. त्यापैकी ४0 हजार हेक्टर क्षेत्र एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून, नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. लवकरच मदतीचे वाटपही सुरू होईल, असा विश्‍वास त्यांनी दिला. 

शेतकर्‍यांना लवकरच १२ तास सौरउर्जाशेतकर्‍यांना दिवसा १२ तास वीज देण्याचे धोरण आमच्या सरकारने आखले असून, त्यासाठी सौरउज्रेचा पर्याय निवडला आहे. एक हजार मेगावॉट सौर वीज निर्मितीचे टेंडर काढले असून, यापैकी ५00 मेगावॉट वीज निर्मितीकरिता कामास सुरूवात झाली आहे. कृषी पंपांना वीज पुरवठा करणारे कृषी फिडर हेच सौर उज्रेवर कार्यान्वित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच गटशेतीला प्रोत्साहन देताना २ लाख ५0 हजार युवकांना शेती कौशल्य तंत्रज्ञान शिकवणार असून, असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 

सर्वाधिक कर्जमाफी बुलडाण्यातछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जमाफी योजनेचा सर्वाधिक लाभ बुलडाणा जिल्ह्याला मिळाला आहे. अर्ज केलेल्या २ लाख ५0 हजार ७४५ शेतकर्‍यांपैकी आतापर्यंत २ लाख १३ हजार २८९ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, ही रक्कम तब्बल ११२९ कोटी रुपये एवढी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  काँग्रेसच्या कार्यकाळात संपूर्ण विदर्भाला २५0 कोटीची कर्जमाफी मिळाली होती. आता एकट्या बुलडाण्याला ११२९ कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. ही आकडेवारीच शेतकर्‍यांचे हित कोणत्या सरकारने जपले हे दर्शविते, असे त्यांनी स्पष्ट  केले.

जैन संघटनेच्या माध्यमातून बुलडाणा सुजलाम सुफलामअखिल भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांनी जैन संघटनेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संघटनेच्यावतीने १५१ जेसीबी बुलडाणा जिल्ह्यात दाखल होत असून, जलयुक्त शिवार योजनेतील सर्व कामे अवघ्या काही दिवसात पूर्ण होतील व हा जिल्हा सुजलाम सुफलाम करून मॉडल जिल्हा म्हणून विकसित करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

१५१ शेतकर्‍यांना ट्रॅक्टरचे वाटपशेतीचे यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ट्रॅक्टरचे वाटप केले जात आहे. त्यामध्ये कृषी महोत्सवाच्या निमित्ताने १५१ शेतकर्‍यांना ट्रॅक्टर देण्यात आले, यापैकी नीता भागवत ठाकरे व विजय शालीग्राम खंडारे या दोन शेतकर्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राधिनिधीक स्वरूपात ट्रॅक्टरची चावी प्रदान करण्यात आली. 

मुख्यमंत्र्यांनी केले भाऊसाहेबांचे कौतुक कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर हे अतिशय संवेदनशील मंत्री आहेत. गारपिटीचे संकट कोसळले. त्याच दिवशी त्यांनी नुकसानाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन अवघ्या दोन दिवसात संपूर्ण राज्यातील पंचनामे पूर्ण केले. लगेच नुकसानाचा अहवाल तयार केला व मदतीसाठी प्रस्ताव ‘कॅबिनेट’समोर ठेवला. ‘कॅबिनेट’ने तो प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे मदतीसाठी पाठविला आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांना लवकरच मदत मिळू शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

जिल्ह्यातील शेतकरी आधुनिकतेकडे वळतोय - ना.फुंडकर‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ या धोरणांतर्गत शेतीचे यांत्रिकीकरण ही योजना कृषी विभागाने सुरू केली, याचा सर्वाधिक लाभ विदर्भातील शेतकर्‍यांनी घेतला असून, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आघाडीवर असल्याचे ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील तब्बल ५00 शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर घेतले असून, मागेल त्याला ट्रॅक्टर देण्याचे काम हे सरकार करीत आहे. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक, या योजनांना शेतकर्‍यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. तब्बल ८४0 कांदाचाळी जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. कितीही संकटे आली, तरी शेतकरी गंभीरपणे संकटाला तोंड देतो व सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहते, हे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे, असा दावा ना. फुंडकर यांनी केला. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत शेतकरी आधुनिकतेकडे वळत असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकर