शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

दहा हजार शेतकर्‍यांची लाभासाठी ससेहोलपट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:44 IST

मलकापूर : शेतकरी कर्जमाफी योजनेत हजारो शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. अर्थात अजूनही यादय़ा अंतिम नाहीत, त्यासाठी लाभार्थ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील शासन व बँका यांच्यातील वेगवेगळ्या मुद्यावरुन पुढे येत असलेले ‘मिसमॅच’ सद्यस्थितीत लाभार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देशासन आणि बँकांमधील ‘मिसमॅच’चा शेतकर्‍यांना फटका

हनुमान जगताप । लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शेतकरी कर्जमाफी योजनेत हजारो शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. अर्थात अजूनही यादय़ा अंतिम नाहीत, त्यासाठी लाभार्थ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील शासन व बँका यांच्यातील वेगवेगळ्या मुद्यावरुन पुढे येत असलेले ‘मिसमॅच’ सद्यस्थितीत लाभार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे. विदर्भ प्रवेशद्वाराच्या सुमारे दहा हजारावर शेतकर्‍यांची  कर्जमाफीच्या लाभासाठी ससेहोलपट होताना दिसत आहे.शासनाच्यावतीने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु करण्यात आली. त्यात कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्जाचा भरणा केल्याचे सर्वश्रुत आहे. अगदी सुरुवातीपासूनच या योजनेला ग्रहण लागल्याचे वारंवार स्पष्ट झाले. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.आधी यादय़ांचा घोळ, त्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांवर नानाविध अटी व शर्ती लादण्यात आल्याने या योजनेत एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे प्रत्यक्षात किती शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली, हा प्रश्न आधीपासूनच आतापर्यंत गुलदस्त्यातच, कारण त्या विषयावरून आजही,  शासन आणि शेतकरी यांच्यातील दुवा असलेल्या सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे कानावर हात आहेत. शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीच्या लाभासाठी हजारो शेतकर्‍यांनी ‘ऑनलाइन’ अर्ज भरले आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये आधारकार्ड नंबरातील चुका, पासबुकवरील नावात तफावत, एकाच कुटुंबातील दोन कर्जदार, माफी मात्र एकाला, अशा विविध बाबींचे मिसमॅच लाभार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत असून, परिणामी विदर्भ प्रवेशद्वारी कर्जमाफीसाठी पात्र सुमारे दहा हजारावर शेतकर्‍यांची लाभासाठी ससेहोलपट होतेय.

‘कशी बशी कर्जमाफी जाहीर झाली. अनेक अटी त्यासाठी लादण्यात आल्या. एक प्रकारे ही शेतकर्यांची थट्टाच आहे. याद्यांचा घोळही आहेच. एक प्रकारे ही गरीब शेतकर्यांची छळवणूक आहे. प्रकरणी अशा शेतकर्यांना शासनाने कर्जमाफीचा लाभ देऊन न्याय द्यावा.- दामोधर शर्मा ,जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना

सरकारला वाटतो तेवढा हुशार शेतकरी नाही, तर तो एक प्रामाणिक माणूस आहे. चुका या माणसाकडूनच होतात. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरताना चुका झाल्या असतील, त्या समजून घेतल्या पाहिजे. कर्जमाफी करुन शासनाने दाखविलेला मोठेपणा यातही दाखवायला हवा. - ज्ञानदेव ढगे, सरपंच अनुराबाद, ता.मलकापूर.

ऑनलाईन अर्ज भरताना माहिती देण्यात आली. त्यात विसंगती आहे. त्यात कुणा एकाची चूक धरता येणार्‍या नाही. आमच्याकडेही त्यापध्दतीची असंख्य प्रकरणे आली आहे. त्यावर उपाययोजना करातना चुकांची दुरुस्ती करण्यावर आम्ही भर दिला. त्यातून बरीचशी प्रकरणे निकाली निघाली आहेत. - संजय जाधव, विभागीय अधिकारी, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक

टॅग्स :Farmerशेतकरीbuldhanaबुलडाणा