शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दहा हजार शेतकर्‍यांची लाभासाठी ससेहोलपट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:44 IST

मलकापूर : शेतकरी कर्जमाफी योजनेत हजारो शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. अर्थात अजूनही यादय़ा अंतिम नाहीत, त्यासाठी लाभार्थ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील शासन व बँका यांच्यातील वेगवेगळ्या मुद्यावरुन पुढे येत असलेले ‘मिसमॅच’ सद्यस्थितीत लाभार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देशासन आणि बँकांमधील ‘मिसमॅच’चा शेतकर्‍यांना फटका

हनुमान जगताप । लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शेतकरी कर्जमाफी योजनेत हजारो शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. अर्थात अजूनही यादय़ा अंतिम नाहीत, त्यासाठी लाभार्थ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील शासन व बँका यांच्यातील वेगवेगळ्या मुद्यावरुन पुढे येत असलेले ‘मिसमॅच’ सद्यस्थितीत लाभार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे. विदर्भ प्रवेशद्वाराच्या सुमारे दहा हजारावर शेतकर्‍यांची  कर्जमाफीच्या लाभासाठी ससेहोलपट होताना दिसत आहे.शासनाच्यावतीने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु करण्यात आली. त्यात कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्जाचा भरणा केल्याचे सर्वश्रुत आहे. अगदी सुरुवातीपासूनच या योजनेला ग्रहण लागल्याचे वारंवार स्पष्ट झाले. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.आधी यादय़ांचा घोळ, त्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांवर नानाविध अटी व शर्ती लादण्यात आल्याने या योजनेत एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे प्रत्यक्षात किती शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली, हा प्रश्न आधीपासूनच आतापर्यंत गुलदस्त्यातच, कारण त्या विषयावरून आजही,  शासन आणि शेतकरी यांच्यातील दुवा असलेल्या सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे कानावर हात आहेत. शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीच्या लाभासाठी हजारो शेतकर्‍यांनी ‘ऑनलाइन’ अर्ज भरले आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये आधारकार्ड नंबरातील चुका, पासबुकवरील नावात तफावत, एकाच कुटुंबातील दोन कर्जदार, माफी मात्र एकाला, अशा विविध बाबींचे मिसमॅच लाभार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसत असून, परिणामी विदर्भ प्रवेशद्वारी कर्जमाफीसाठी पात्र सुमारे दहा हजारावर शेतकर्‍यांची लाभासाठी ससेहोलपट होतेय.

‘कशी बशी कर्जमाफी जाहीर झाली. अनेक अटी त्यासाठी लादण्यात आल्या. एक प्रकारे ही शेतकर्यांची थट्टाच आहे. याद्यांचा घोळही आहेच. एक प्रकारे ही गरीब शेतकर्यांची छळवणूक आहे. प्रकरणी अशा शेतकर्यांना शासनाने कर्जमाफीचा लाभ देऊन न्याय द्यावा.- दामोधर शर्मा ,जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना

सरकारला वाटतो तेवढा हुशार शेतकरी नाही, तर तो एक प्रामाणिक माणूस आहे. चुका या माणसाकडूनच होतात. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरताना चुका झाल्या असतील, त्या समजून घेतल्या पाहिजे. कर्जमाफी करुन शासनाने दाखविलेला मोठेपणा यातही दाखवायला हवा. - ज्ञानदेव ढगे, सरपंच अनुराबाद, ता.मलकापूर.

ऑनलाईन अर्ज भरताना माहिती देण्यात आली. त्यात विसंगती आहे. त्यात कुणा एकाची चूक धरता येणार्‍या नाही. आमच्याकडेही त्यापध्दतीची असंख्य प्रकरणे आली आहे. त्यावर उपाययोजना करातना चुकांची दुरुस्ती करण्यावर आम्ही भर दिला. त्यातून बरीचशी प्रकरणे निकाली निघाली आहेत. - संजय जाधव, विभागीय अधिकारी, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक

टॅग्स :Farmerशेतकरीbuldhanaबुलडाणा