शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

संचमान्यतेत अडकली पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती, १५ मे पर्यंत अंतिम संचमान्यता करण्याचे शिक्षण विभागाचे नियाेजन

By संदीप वानखेडे | Updated: May 7, 2023 17:06 IST

आता शिक्षण विभागाने १५ मे पर्यंत शाळांच्या संच मान्यता अंतिम करण्याचे नियाेजन केले आहे.

बुलढाणा : राज्यभरात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली़. त्याचा निकालही जाहीर करण्यात आला. मात्र, संचमान्यताच झाली नसल्याचे ही भरती रखडल्याचे चित्र आहे. आता शिक्षण विभागाने १५ मे पर्यंत शाळांच्या संच मान्यता अंतिम करण्याचे नियाेजन केले आहे.

गत अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीच झाली नसल्याने जिल्हा परिषदांसह खासगी शाळांमध्ये माेठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. दुसरीकडे डीएड, बीएड झालेले लाखाे भावी शिक्षक बेराेजगार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर राज्य शासनाने शिक्षक भरती प्रक्रियेला गती दिली आहे. शाळांमधील बाेगस विद्यार्थी शाेधण्यासाठी आधार वैध संख्येवर संच मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याची प्रक्रिया शाळांमध्ये सुरू आहे. सद्यस्थितीत आधार वैध विद्यार्थी संख्येवर आधारित अंतरिम संच मान्यता करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या शाळांची आधार वैधतेची कार्यवाही पूर्ण झालेली नाही, अशा शाळांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतरिम करण्यात आलेल्या संच मान्यता १५ मे २०२३ पर्यंत अंतिम करण्याचे शिक्षण विभागाचे नियाेजन आहे.

जुलैपर्यंत पाेर्टलवर येणार रिक्त पदांची माहितीसंच मान्यता अंतिम करून संच मान्यतेचे शाळानिहाय वितरण २० मे २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. संच मान्यता अंतिम झाल्यानंतर व्यवस्थापनाकडून बिंदू नामावली ३० जून २०२३ पर्यंत प्रमाणीत करण्यात येणार आहे. त्यानंतर पहिल्या तिमाहीकरिता १५ जुलैपर्यंत शिक्षकांच्या रिक्त पदे पाेर्टलवर येणार आहेत. 

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थीbuldhanaबुलडाणा