शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अनुदानासाठी शिक्षकांचा लढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 15:14 IST

अनुदानाच्या मुद्यावरुन पश्चिम वºहाडातील एक हजारावर शिक्षक गेल्या चार दिवसांपासून नागपुरात ठाण मांडूण आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: विना अनुदानीत व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाला अनुदान पात्रतेसाठी असलेल्या १०० टक्के निकालाच्या अटीला राज्यभरातील शिक्षकांकडून विरोध दर्शविण्यात येत आहे. २० टक्के सरसकट अनुदान शासन निर्णय रद्द करण्यासाठी शिक्षकांचा शासनदरबारी लढा सुरू आहे. अनुदानाच्या मुद्यावरुन पश्चिम वºहाडातील एक हजारावर शिक्षक गेल्या चार दिवसांपासून नागपुरात ठाण मांडूण आहेत.उच्च माध्यमिकच्या शिक्षकांचे अनेक प्रश्न शासनस्तरावर प्रलंबीत आहेत. गेल्या १८ वर्षापासुन विनावेतन काम करणाऱ्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना १ एप्रिल २०१९ पासून २० टक्के वेतन दिले जाईल, असा शासन निर्णय झालेला आहे. त्यामध्ये अनुदान पात्रतेसाठी १०० टक्के निकालाची अटक घालण्यात आलेली आहे. परंतू १०० टक्के निकालाच्या विरोधात राज्यभरातील विना अनुदानीत व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी पाऊल टाकले आहे. क्षेत्रीय स्तरावरील पात्र अघोषित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविलयांना घोषित करून अनुदान देण्याची मागणी या शिक्षकांमधून होत आहे. २० टक्के सरसकट अनुदानाचा शासन निर्णय रद्द करून सर्वांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे, यासाठी राज्य उच्च माध्यमिक व क़म.वि. शाळा कृती संघटनेच्यावतीने मंगळवारी विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता.अनुदानाच्या प्रश्नासाठी पश्चिम वºहाडातील १ हजारावर शिक्षक विधिमंडळावर धडकले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील १५०, अकोला ४०० व वाशिम जिल्ह्यातील ५०० शिक्षकांचा समावेश आहे. परंतू आतापर्यंत शिक्षकांच्या या प्रश्नावर शासनाला तोडगा काढता आलेला नाही.१८ वर्षापासून वेतनाचा प्रश्नविना अनुदानीत व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील २५ हजार शिक्षकांची १८ वर्ष निघुन गेली तरी आतापर्यंत त्यांना वेतनाची प्रतीक्षा आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये शिक्षक आपले प्रश्न मांडून थकले आहेत. परंतू त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे दिसून येते. कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता देऊन त्यांच्या सोबत वेतनाची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांनी मांडली आहे.सर्व नियमानुसार पूर्तता करूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे पुरवणी मागणीत शिक्षकांच्या विषयाचा समावेश न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वत: तसे आदेश देऊन अनुदानाचा विषय निकाली काढावा. अनुदानाचा, आर्थिक तरतुदीचा विषय मार्गी लावण्यासाठी नागपूर येथे शिक्षक धरणे देत आहेत.- प्रा. गजानन निकम, राज्य सहसचिव,राज्य उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटना.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक