शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सोयाबीन कपाशीवर आलेल्या रोगांसाठी तातडीने उपाययोजना करा -  रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:44 IST

कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निरुपमा डांगे यांची ६ आॅगस्ट रोजी भेट घेवून केली.

ठळक मुद्देया मागण्या १५ आॅगस्ट पर्यंत मान्य न केल्यास स्वाभिमानी आक्रमक आंदोलन करेल असा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला. या रोगावर तातडीने शासनाने उपाय योजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

बुलडाणा: नाफेडमध्ये विकलेल्या तुर, हरभºयाचे चुकारे तातडीने द्या, सन २०१६ मध्ये सोयाबीन उत्पादकांना प्रती क्विंटल घोषीत केलेले अनुदान अद्यापही २६ हजार शेतकºयांना मिळाले नाही, ते अनुदासन वंचित शेतकºयांना ताबडतोब द्या, तसेच कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निरुपमा डांगे यांची ६ आॅगस्ट रोजी भेट घेवून केली. या मागण्या १५ आॅगस्ट पर्यंत मान्य न केल्यास स्वाभिमानी आक्रमक आंदोलन करेल असा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला. या भेटीत रविकांत तुपकरांनी शेतकºयांच्या व्यथा मांडताना सांगीतले की, मागील २०१६ मध्ये महाराष्ट्र सरकारने सोयाबीन या पिकाला बाजारभाव कमी मिळत असल्याने २०० रुपए प्रती क्विंटल अनुदानाची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना यामध्ये बुलडाणा जिल्हयातील जवळपास २६ हजार शेतकरी अजनूही वंचित राहीले आहेत. पावत्या चुकीच्या असल्याच्या कारणावरून शेतकºयांना अपात्र ठरविण्यात आले आहे. खरे तर, या प्रकरणी चुकीच्या पावत्या देणाºया व्यापाºयांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षीत होते. त्यामुळे या प्रकरणाची पुर्नचौकशी करून वंचित शेतकºयांना अनुदान देण्यात यावे. शासनाने नाफेड अंतर्गत शेतकºयांची तूर व हरभºयाची खरेदी केली, मात्र अद्यप शेतकºयांना तूर व हरभºयाचे चुकारे मिळाले नाहीत. पेरणीच्या काळात शेतकºयांना तूर व हरभºयांचा पैसा कामी येईल, असे वाटत होते. मात्र ऐन पेरणीच्या काळातही हे चुकारे शेतकºयांना मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकºयांना आर्थीक अडचणीचा सामना करावा लागला. दुसरीकडे मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढाला आहे. जिल्ह्यात बोगस बीटीचे बियाणे मोठया प्रमाणावर विक्री झाल्याने शेतकºयांनी याच बीटीची लागवड केली आहे.परिणामी कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. शिवाय सोयाबीनवर उंट अळी तसेच चक्रीभुंगा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगावर तातडीने शासनाने उपाय योजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी अप्पर रजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वराडे तसेच स्वाभिमानीचे राणा चंद्रशेखर चंदन, पवन देशमुख, एकनाथ पाटील थुट्टे, महेंद्र जाधव, दत्ता जेऊघाले, अमीन खासाब, गजानन पटोकार, आकाश माळोदे, योगेश तुपकर, हरीभाऊ उबरहंडे, प्रदिप तुपकर, अनिल तुपकर, गजानन तुपकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRavikant Tupkarरविकांत तुपकर