शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

सोयाबीन कपाशीवर आलेल्या रोगांसाठी तातडीने उपाययोजना करा -  रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:44 IST

कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निरुपमा डांगे यांची ६ आॅगस्ट रोजी भेट घेवून केली.

ठळक मुद्देया मागण्या १५ आॅगस्ट पर्यंत मान्य न केल्यास स्वाभिमानी आक्रमक आंदोलन करेल असा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला. या रोगावर तातडीने शासनाने उपाय योजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

बुलडाणा: नाफेडमध्ये विकलेल्या तुर, हरभºयाचे चुकारे तातडीने द्या, सन २०१६ मध्ये सोयाबीन उत्पादकांना प्रती क्विंटल घोषीत केलेले अनुदान अद्यापही २६ हजार शेतकºयांना मिळाले नाही, ते अनुदासन वंचित शेतकºयांना ताबडतोब द्या, तसेच कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निरुपमा डांगे यांची ६ आॅगस्ट रोजी भेट घेवून केली. या मागण्या १५ आॅगस्ट पर्यंत मान्य न केल्यास स्वाभिमानी आक्रमक आंदोलन करेल असा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला. या भेटीत रविकांत तुपकरांनी शेतकºयांच्या व्यथा मांडताना सांगीतले की, मागील २०१६ मध्ये महाराष्ट्र सरकारने सोयाबीन या पिकाला बाजारभाव कमी मिळत असल्याने २०० रुपए प्रती क्विंटल अनुदानाची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना यामध्ये बुलडाणा जिल्हयातील जवळपास २६ हजार शेतकरी अजनूही वंचित राहीले आहेत. पावत्या चुकीच्या असल्याच्या कारणावरून शेतकºयांना अपात्र ठरविण्यात आले आहे. खरे तर, या प्रकरणी चुकीच्या पावत्या देणाºया व्यापाºयांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षीत होते. त्यामुळे या प्रकरणाची पुर्नचौकशी करून वंचित शेतकºयांना अनुदान देण्यात यावे. शासनाने नाफेड अंतर्गत शेतकºयांची तूर व हरभºयाची खरेदी केली, मात्र अद्यप शेतकºयांना तूर व हरभºयाचे चुकारे मिळाले नाहीत. पेरणीच्या काळात शेतकºयांना तूर व हरभºयांचा पैसा कामी येईल, असे वाटत होते. मात्र ऐन पेरणीच्या काळातही हे चुकारे शेतकºयांना मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकºयांना आर्थीक अडचणीचा सामना करावा लागला. दुसरीकडे मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढाला आहे. जिल्ह्यात बोगस बीटीचे बियाणे मोठया प्रमाणावर विक्री झाल्याने शेतकºयांनी याच बीटीची लागवड केली आहे.परिणामी कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. शिवाय सोयाबीनवर उंट अळी तसेच चक्रीभुंगा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगावर तातडीने शासनाने उपाय योजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी अप्पर रजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वराडे तसेच स्वाभिमानीचे राणा चंद्रशेखर चंदन, पवन देशमुख, एकनाथ पाटील थुट्टे, महेंद्र जाधव, दत्ता जेऊघाले, अमीन खासाब, गजानन पटोकार, आकाश माळोदे, योगेश तुपकर, हरीभाऊ उबरहंडे, प्रदिप तुपकर, अनिल तुपकर, गजानन तुपकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRavikant Tupkarरविकांत तुपकर