शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

सोयाबीन कपाशीवर आलेल्या रोगांसाठी तातडीने उपाययोजना करा -  रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:44 IST

कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निरुपमा डांगे यांची ६ आॅगस्ट रोजी भेट घेवून केली.

ठळक मुद्देया मागण्या १५ आॅगस्ट पर्यंत मान्य न केल्यास स्वाभिमानी आक्रमक आंदोलन करेल असा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला. या रोगावर तातडीने शासनाने उपाय योजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

बुलडाणा: नाफेडमध्ये विकलेल्या तुर, हरभºयाचे चुकारे तातडीने द्या, सन २०१६ मध्ये सोयाबीन उत्पादकांना प्रती क्विंटल घोषीत केलेले अनुदान अद्यापही २६ हजार शेतकºयांना मिळाले नाही, ते अनुदासन वंचित शेतकºयांना ताबडतोब द्या, तसेच कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निरुपमा डांगे यांची ६ आॅगस्ट रोजी भेट घेवून केली. या मागण्या १५ आॅगस्ट पर्यंत मान्य न केल्यास स्वाभिमानी आक्रमक आंदोलन करेल असा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला. या भेटीत रविकांत तुपकरांनी शेतकºयांच्या व्यथा मांडताना सांगीतले की, मागील २०१६ मध्ये महाराष्ट्र सरकारने सोयाबीन या पिकाला बाजारभाव कमी मिळत असल्याने २०० रुपए प्रती क्विंटल अनुदानाची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना यामध्ये बुलडाणा जिल्हयातील जवळपास २६ हजार शेतकरी अजनूही वंचित राहीले आहेत. पावत्या चुकीच्या असल्याच्या कारणावरून शेतकºयांना अपात्र ठरविण्यात आले आहे. खरे तर, या प्रकरणी चुकीच्या पावत्या देणाºया व्यापाºयांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षीत होते. त्यामुळे या प्रकरणाची पुर्नचौकशी करून वंचित शेतकºयांना अनुदान देण्यात यावे. शासनाने नाफेड अंतर्गत शेतकºयांची तूर व हरभºयाची खरेदी केली, मात्र अद्यप शेतकºयांना तूर व हरभºयाचे चुकारे मिळाले नाहीत. पेरणीच्या काळात शेतकºयांना तूर व हरभºयांचा पैसा कामी येईल, असे वाटत होते. मात्र ऐन पेरणीच्या काळातही हे चुकारे शेतकºयांना मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकºयांना आर्थीक अडचणीचा सामना करावा लागला. दुसरीकडे मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढाला आहे. जिल्ह्यात बोगस बीटीचे बियाणे मोठया प्रमाणावर विक्री झाल्याने शेतकºयांनी याच बीटीची लागवड केली आहे.परिणामी कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. शिवाय सोयाबीनवर उंट अळी तसेच चक्रीभुंगा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगावर तातडीने शासनाने उपाय योजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी अप्पर रजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वराडे तसेच स्वाभिमानीचे राणा चंद्रशेखर चंदन, पवन देशमुख, एकनाथ पाटील थुट्टे, महेंद्र जाधव, दत्ता जेऊघाले, अमीन खासाब, गजानन पटोकार, आकाश माळोदे, योगेश तुपकर, हरीभाऊ उबरहंडे, प्रदिप तुपकर, अनिल तुपकर, गजानन तुपकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRavikant Tupkarरविकांत तुपकर