शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सोयाबीन कपाशीवर आलेल्या रोगांसाठी तातडीने उपाययोजना करा -  रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:44 IST

कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निरुपमा डांगे यांची ६ आॅगस्ट रोजी भेट घेवून केली.

ठळक मुद्देया मागण्या १५ आॅगस्ट पर्यंत मान्य न केल्यास स्वाभिमानी आक्रमक आंदोलन करेल असा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला. या रोगावर तातडीने शासनाने उपाय योजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

बुलडाणा: नाफेडमध्ये विकलेल्या तुर, हरभºयाचे चुकारे तातडीने द्या, सन २०१६ मध्ये सोयाबीन उत्पादकांना प्रती क्विंटल घोषीत केलेले अनुदान अद्यापही २६ हजार शेतकºयांना मिळाले नाही, ते अनुदासन वंचित शेतकºयांना ताबडतोब द्या, तसेच कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निरुपमा डांगे यांची ६ आॅगस्ट रोजी भेट घेवून केली. या मागण्या १५ आॅगस्ट पर्यंत मान्य न केल्यास स्वाभिमानी आक्रमक आंदोलन करेल असा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला. या भेटीत रविकांत तुपकरांनी शेतकºयांच्या व्यथा मांडताना सांगीतले की, मागील २०१६ मध्ये महाराष्ट्र सरकारने सोयाबीन या पिकाला बाजारभाव कमी मिळत असल्याने २०० रुपए प्रती क्विंटल अनुदानाची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना यामध्ये बुलडाणा जिल्हयातील जवळपास २६ हजार शेतकरी अजनूही वंचित राहीले आहेत. पावत्या चुकीच्या असल्याच्या कारणावरून शेतकºयांना अपात्र ठरविण्यात आले आहे. खरे तर, या प्रकरणी चुकीच्या पावत्या देणाºया व्यापाºयांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षीत होते. त्यामुळे या प्रकरणाची पुर्नचौकशी करून वंचित शेतकºयांना अनुदान देण्यात यावे. शासनाने नाफेड अंतर्गत शेतकºयांची तूर व हरभºयाची खरेदी केली, मात्र अद्यप शेतकºयांना तूर व हरभºयाचे चुकारे मिळाले नाहीत. पेरणीच्या काळात शेतकºयांना तूर व हरभºयांचा पैसा कामी येईल, असे वाटत होते. मात्र ऐन पेरणीच्या काळातही हे चुकारे शेतकºयांना मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकºयांना आर्थीक अडचणीचा सामना करावा लागला. दुसरीकडे मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढाला आहे. जिल्ह्यात बोगस बीटीचे बियाणे मोठया प्रमाणावर विक्री झाल्याने शेतकºयांनी याच बीटीची लागवड केली आहे.परिणामी कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. शिवाय सोयाबीनवर उंट अळी तसेच चक्रीभुंगा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगावर तातडीने शासनाने उपाय योजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी अप्पर रजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वराडे तसेच स्वाभिमानीचे राणा चंद्रशेखर चंदन, पवन देशमुख, एकनाथ पाटील थुट्टे, महेंद्र जाधव, दत्ता जेऊघाले, अमीन खासाब, गजानन पटोकार, आकाश माळोदे, योगेश तुपकर, हरीभाऊ उबरहंडे, प्रदिप तुपकर, अनिल तुपकर, गजानन तुपकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRavikant Tupkarरविकांत तुपकर