शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:12 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शनिवारी सकाळी 8.30 वाजता रास्तारोको केला. 

वरवट बकाल ता. संग्रामपूर : पश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शनिवारी सकाळी 8.30 वाजता रास्तारोको केला. आता शांत बसायचे नाही, सरकारच्या मानगुटीवर बसून सोयाबीन कापसाची नुकसान भरपाई घेवू असे आवाहन करीत 20 ऑक्टोंबर रोजी चक्काजाम आंदोलनात ताकदीने रस्त्यावर उतरा असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना केले होते. त्या अनुषंगाने आज वरवट बकाल येथे बस थांब्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संघटीत होऊन दुध व ऊसाला भाव मिळवून घेतला. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला भाव मिळत नाही. कारण इथला शेतकरी संघटीत नाही. दुसरीकडे भाजपचे सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारला नुकसान भरपाई व जिल्हा दुष्काळग्रस्त् घोषीत करा, सोयाबीन कापसाला हमीभाव जाहीर करा व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई दया या बरोबरच तुर, उडीद व हरभऱ्याचे चुकारे तातडीने दया, ऑनलाईनच्या गोंधळामुळे मागील वर्षी जे शेतकरी पिकविमा भरु शकले नाही त्यांना 50 टक्के मिकविम्याची रक्क्म दया अशा विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आजचे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी असलेल्या या भाजप सरकारचे कमळ 2019 ला औषधालाही ठेवू नका असे आवाहनही रविकांत तुपकर यांनी यावेळी केले. आंदोलनात शेतकऱ्यांनी बैलजोडी, सोयाबीन, कापूस रस्त्यावर टाकून निषेध केला तसेच टायर जाळण्यात आले. यावेळी युवकांनी वाहन अडवण्यात आले. या आंदोलनात युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर,युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष राहूल मारोडे तालुका अध्यक्ष उज्वल चोपडे, जळगाव जा. तालुका अध्यक्ष नितीन पाचपोर, योगेश मुरूख, रोषण देशमुख,सागर खानझोडे, रामेश्वर घाटे, गणेश वहितकर, गजानन आमझरे, विलास तराळे, राजू उमाळे, भगवान तायडे, मोहन पाटील यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना