शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

‘स्वाभिमानी’ची ५० जागा लढण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:21 IST

महाआघाडीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्यासाठी राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीत सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुका लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्यासाठी राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना विचारणा केली असता त्यांनी स्वबळाच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्वाभिमानीचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून रणनीती आखल्याची माहिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रबळ आघाडी तयार व्हावी हा त्यांचा मानस आहे; मात्र या आघाडीत सन्मानजनक जागा मिळत नसतील तर सर्व पर्याय खुले ठेवण्याचीही भूमिका त्यांनी मांडली आहे. राज्यातील २८८ पैकी ५० विधानसभा मतदारसंघात प्रसंगी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागण्याचेही निर्देश त्यांनी पदाधिकाºयांना दिले आहेत. मनसेसोबतही आघाडीची चर्चास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. या चर्चेमधून आगामी काळात हे दोन पक्ष एकत्र येतील का, असे अंदाज राजकीय क्षेत्रात बांधले जात आहेत. याबाबत मात्र स्वाभिमानीचे नेते आताच काही बोलायला तयार नाहीत. स्वाभिमानीने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. आघाडीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत हा आग्रह राहणारच आहे; मात्र पक्ष म्हणून आम्हालाही स्वबळाची ताकद निर्माण करावी लागणारच आहे. त्यासाठी राज्यातील ५० मतदारसंघांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आॅगस्ट महिन्यात होणाºया कार्यकारिणीच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे.- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाcongressकाँग्रेस