शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

‘स्वाभिमानी’ची ५० जागा लढण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:21 IST

महाआघाडीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्यासाठी राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीत सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुका लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्यासाठी राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना विचारणा केली असता त्यांनी स्वबळाच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्वाभिमानीचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून रणनीती आखल्याची माहिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रबळ आघाडी तयार व्हावी हा त्यांचा मानस आहे; मात्र या आघाडीत सन्मानजनक जागा मिळत नसतील तर सर्व पर्याय खुले ठेवण्याचीही भूमिका त्यांनी मांडली आहे. राज्यातील २८८ पैकी ५० विधानसभा मतदारसंघात प्रसंगी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागण्याचेही निर्देश त्यांनी पदाधिकाºयांना दिले आहेत. मनसेसोबतही आघाडीची चर्चास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. या चर्चेमधून आगामी काळात हे दोन पक्ष एकत्र येतील का, असे अंदाज राजकीय क्षेत्रात बांधले जात आहेत. याबाबत मात्र स्वाभिमानीचे नेते आताच काही बोलायला तयार नाहीत. स्वाभिमानीने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. आघाडीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत हा आग्रह राहणारच आहे; मात्र पक्ष म्हणून आम्हालाही स्वबळाची ताकद निर्माण करावी लागणारच आहे. त्यासाठी राज्यातील ५० मतदारसंघांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आॅगस्ट महिन्यात होणाºया कार्यकारिणीच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे.- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाcongressकाँग्रेस