शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

जिल्हा उपनिबंधकांच्या टेबलवर ‘स्वाभिमानी’ने ओतली तूर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 02:00 IST

बुलडाणा : शासनाने शेतकर्‍यांची तूर खरेदी केली; मात्र अद्यापही बर्‍याच शेतकर्‍यांना चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकर्‍यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २८ मे रोजी जिल्हा उपनिबंधकांच्या टेबलावर तूर ओतून निषेध व्यक्त केला. 

ठळक मुद्देतूर खरेदीचे चुकारे मिळाले नसल्याने संघटनेने व्यक्त केला निषेध

बुलडाणा : शासनाने शेतकर्‍यांची तूर खरेदी केली; मात्र अद्यापही बर्‍याच शेतकर्‍यांना चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकर्‍यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २८ मे रोजी जिल्हा उपनिबंधकांच्या टेबलावर तूर ओतून निषेध व्यक्त केला. शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे; मात्र खिशात पैसे नसल्यामुळे बी-बियाणे, खते खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे नाही. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु अद्यापही बर्‍याच शेतकर्‍यांना कर्ज मिळाले नाही. बँक अधिकार्‍यांकडून शेतकर्‍यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. शासनाने नाफेड अंतर्गत शेतकर्‍यांची तूर खरेदी केली; मात्र तुरीचे चुकारे मिळालेले नाही. शेतकर्‍यांना तत्काळ तुरीचे चुकारे देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफीक करीम यांच्या नेतृत्वात जिल्हा उपनिबंधकांच्या टेबलवर तूर ओतून निषेध करण्यात आला. यावेळी कडूबा मोरे, मिस्किन शाह, सैयद जहिरोद्दीन, अजगर शाह, रामदास खसावत, हरिभाऊ उबरहंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना