बुलडाणा : जिल्ह्यात अतवृष्टी व गारपीटीमुळे शेतकर्यांचे यावर्षी प्रचंड नुकसान झाले आहे. सदर नुकसान तात्काळ मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज २४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.स्थानिक जयस्तंभ चौक परिसरातून दुपारी १ वाजता स्वाभिमानी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील रायपुर, पिंलळगांव सैलानी, दुधा, देवपुर, चांडोळ व चिखली तालुक्यातील अमडापूर येथील गारपीटग्रस्त शेतकर्यांना अदयापही नुकसान भरपाईचे अनुदान देण्यात आले नाही. असा आरोप करीत ते तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आठ दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानीचा मोर्चा
By admin | Updated: June 25, 2014 00:01 IST