शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

वर्षभरात १८ बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 12:03 IST

Child marriage गेल्या वर्षभरात  १८ बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला यश आले आहे.

ठळक मुद्देएकूण ९२७ बाल संरक्षण समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. बुलडाणा जिल्हा अग्रेसर असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  जिल्ह्यात गेल्या वर्षभरात  १८ बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाला यश आले आहे. बालविवाह रोखण्यात राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्हा अग्रेसर असल्याचे एकंदरीत चित्र आहे.बालविवाह रोखण्यासोबतच बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यात जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवर एकूण ९२७ बाल संरक्षण समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.  त्यामध्यमातून जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासोबच बालकांवर होणारे अत्याचार थांबविण्याचे प्रयत्न केले जातात. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात दोन वर्षांपासून ज्या मुला-मुलींचा विवाह ठरत आहे. त्यांचा जन्माचा दाखला बघूनच पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. यात फोटोग्राफर, मंडप व्यावसायिकांकडे बुकिंग करतानाच त्यांच्याकडून मुला, मुलींच्या जन्माचा दाखल बघितला जातो. त्यानंतरच बुकिंग केले जाते. त्यातून असे बालविवाह रोखण्यास मदत मिळत आहे. 

नववर्षात रोखले तीन बालविवाहजिल्ह्यात नववर्षात तीन बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला व बाल विकास  अधिकारी कार्यालयांतर्गत रोखण्यात आले आहे. यासोबतच मोताळा तालुक्यातील कोथली येथे एक बालविवाह रोखण्यात आला होता. तेथे अल्पवयीन मुलाच थेट कुंकवाचा कार्यक्रमच घेण्यात आला होता. समुपदेशन करून संबंधिताना समज दिली.

ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वाचीग्रामीण भागात बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. बालविवाह प्रतिबंधासाठी तो काम करतो. त्यास सहायक म्हणून अंगणवाडी सेविका मदत करत असते. ग्रामपातळीवरील बालसंरक्षण समितीमधील हे दोघे महत्त्वाचा दुवा असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बालविवाह कायदा काय आहे?२००६ मधील बालविवाह प्रतिबंधक कायदा असून, त्यातंर्गत मुला-मुलींचे वय हे कमी असल्यास संबंधित बालविवाह रोखण्यात येऊन संबंधित कुटुंबांचे समुपदेशन करण्यात येत. त्याचा चांगला सकारात्मक परिणाम जिल्ह्यात झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSocialसामाजिक