शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:42 IST

शासनाच्या ‘शाळा बंद, ऑनलाइन शिक्षण चालू’ या उपक्रमांतर्गत सध्या किनगावराजा व आजूबाजूच्या परिसरातील गुरुजी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देताना ...

शासनाच्या ‘शाळा बंद, ऑनलाइन शिक्षण चालू’ या उपक्रमांतर्गत सध्या किनगावराजा व आजूबाजूच्या परिसरातील गुरुजी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देताना सध्या दिसत आहेत. परंतु, विद्यार्थी अशा ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणात अजूनतरी पूर्णतः समर्पित झालेले दिसत नाहीत. शासनाने ज्या गावात एकही कोरोना रुग्ण नाही, त्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. परंतु, पहिली ते सातवी या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेला सरकारकडून कोरोना प्रसाराच्या भीतीमुळे शाळा सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. मात्र, ग्रामीण आणि शहरी भागात विविध राजकीय कार्यक्रम आणि लग्न सोहळे हे विनामास्क आणि गर्दी करून कुठलेही कोरोनाचे नियम न पाळता राजरोस पद्धतीने होत आहेत. मग अशा कार्यक्रमांना शासन कशी काय परवानगी देते, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडत आहे.

अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित

शाळा बंद असल्या तरी शाळेवर शिक्षकांची उपस्थिती शासनाने शंभर टक्के अनिवार्य केली आहे. त्यामुळे शिक्षकांना पालक आणि विद्यार्थी हे शाळा नियमितपणे कधी सुरू होणार, याची सतत विचारणा करीत आहेत. विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाइन शिक्षण दिले जाते. परंतु, या ऑनलाइन शिक्षणातही खूप अडचणी निर्माण होत आहेत. काही पालकांकडे मोबाइल घेण्याची ऐपत नसल्यामुळे असे विद्यार्थी ऑनलाइन क्लास करू शकत नाहीत, अशा समस्याही आहेत. काही पालकांनी आपल्या मुलांना मोबाइल उपलब्ध करून दिला आहे. परंतु ग्रामीण भागात नेहमी असलेल्या नेटवर्कच्या अडथळ्यामुळेही विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. यापेक्षा कोरोना नियमांचे पालन करून दररोज शाळा जर सुरू झाल्या तर योग्य राहतील, अशा प्रतिक्रियाही पालकांच्या येत असल्याचे चित्र आहे.

इतर कार्यक्रम सुरू, मग शाळा बंद का?

शासन निर्णयानुसार १७ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, प्राथमिक स्तरावर शाळा सुरू करण्यास सरकारकडून कोणताही निर्णय अजून झाला नाही. सरकार शाळा सुरू करण्यास परवानगी देत नाही आणि इतर सार्वजनिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम सर्रासपणे सुरू आहेत, याची चर्चा पालक वर्गात सुरू असून योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.