शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

‘रोहयो’ कामांमुळे पेटल्या ३१२ मजुरांच्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 10:28 IST

ग्रामीण भागातील मजूरांसाठी रोहयोची कामे सुरू केल्याने तालुक्यातील ३१२ मजुरांना दिलासा मिळाला आहे.

- सुधीर चेके पाटीललोकमत न्यूज नेटवर्कचिखली : लॉकडाउनमुळे तळहातावर पोट असलेल्यांची चूलच पेटत नसल्याने जगायच कसं असा प्रश्न निर्माण होत असताना; प्रशासनाने वेळीच दखल घेतली. ग्रामीण भागातील मजूरांसाठी रोहयोची कामे सुरू केल्याने तालुक्यातील ३१२ मजुरांना दिलासा मिळाला आहे.लॉकडाउनमुळे सुरूवातीच्या टप्प्यात सर्वच व्यवहार बंद असल्याने दिवसभर मोलमजुरी केल्याशिवाय चूल पेटणार नाही, अशा अवस्थेतील मजुरांवर उपासमार ओढावली होती. तालुक्यातील अनेक मजुरांनी काम उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यानुसार रोहयोअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांचे प्रस्ताव तयार करून संबंधित ग्रामपंचायतीने पंचायत समिती प्रशासनाला अहवाल सादर केला. मजुरांच्या कामाच्या मागणीचा विचार लक्षात घेत पंचायत समिती प्रशासनाने तालुक्यातील ३५ गावांत सामाजिक वनीकरणाच्या नर्सरी, ग्रा. प. वृक्षलागवड, ग्रामीण भागातील स्मशानभूमीचे सुशोभिकरण, सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर, विहीर पुनर्भरण, शौचालय शोषखड्डा, घरकूल आदी सुमारे ७७ कामांना सुरूवात केली. या माध्यमातून ३१२ मजुरांच्या हाताला काम मिळाले. कोरोनामुळे यंदा परिसरातील अनेक लहान-मोठे उद्योग धंदे बंद असल्याने अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मात्र, रोहयोमुळे हे संकट दूर झाले. कामांवरील मजुरांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काम करताना मजुरांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे आदी खबरदारी बाळगण्याच्या सूचना देखील प्रशासनाव्दारे देण्यात आल्या आहेत.

चिखली तालुक्यातील मजुरांची संख्याचिखली तालुक्यात एकूण मजुरांची संख्या मोठी असली तरी प्रशासनाकडे रितसर नोंदणी करून व सक्रीय जॉब कार्डधारक मजूरांची संख्या १० हजार २६८ आहे. यातील ३१२ मजुरांना सध्या रोजगार उपलब्ध झालेला आहे.

३५ गावात रोहयोच्या कामाला सुरूवात करण्यात आली. शेततळ्यांची कामे केली जाणार असल्याने ज्या मजुरांना कामाची आवश्यकता आहे, अशा मजुरांनी स्थानिक ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी करावी. मागणी केलेल्या प्रत्येक मजुराला काम आणि त्या बदल्यात योग्य दाम दिला जाईल.- एस.जी.कांबळे, प्रभारी गटविकास अधिकारी, चिखली

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखली