शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

SSC Result 2019: अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 2:19 PM

अमरावती विभागामध्ये बुलडाणा जिल्हा निकालाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्याचा सरासरी निकाल ७७.०७ टक्के लागला असून अमरावती विभागामध्ये बुलडाणा जिल्हा निकालाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. असे असले तरी गत वर्षीच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्याचा सरासरी निकाल हा १२ टक्क्यांनी घटल्याचे वास्तव निकालाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.जिल्ह्यातील ५१८ शाळांतील ४० हजार ७०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी प्रत्यक्षात ४० हजार ४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३० हजार ८८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ही ७७.०७ टक्के आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ७२.९६ टक्के तर मुलींचे हे प्रमाण ८२.१२ टक्के आहे. परीक्षा दिलेल्या २२ हजार २२ हजार ९२ मुलांपैकी १६ हजार ११९ मुले उत्तीर्ण झाली. १७ हजार ९८० मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ हजार ७६५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक असून त्याची टक्केवारी ही ९०.१५ टक्के आहे. गेल्या वर्षीही सिंदखेड राजा तालुका जिल्ह्यात अव्वल होता. त्याची टक्केवारी ही ९४.९७ टक्के होती. दरम्यान, सिंदखेड राजाच्या खालोखाल चिखली तालुक्याचा ८५.८९ टक्के तर देऊळगाव राजा तालुक्याचा निकाल ८४.०९ टक्के लागलाा आहे. बुलडाणा तालुक्याचा निकाल ८३.६५ टक्के, मलकापूर तालुक्याचा ७५.९४ टक्के, खामगाव तालुक्याचा निकाल ७४.९४ टक्के, मोताला तालुक्याचा निकाल ७४.७५ टक्के, लोणार तालुक्याचा निकाल ७२.६५ टक्के, शेगाव तालुक्याचा निकाल ७२.१७ टक्के, मेहकर तालुक्याचा निकाल ७१.१६ टक्के, संग्रामपूर तालुक्याचा निकाल ६९.७९ टक्के, जळगाव जामोद तालुक्याचा ६८.८३ टक्के आणि सर्वात शेवटी तळाला नांदुरा तालुक्याचा ६७.८३ टक्के लागला आहे. गेल्यावर्षी नांदुरा तालुक्याचाच निकाल जिल्ह्यात सर्वात कमी लागला होता.१२ टक्क्यांनी निकालात घटबुलडाणा जिल्ह हा अमरावती विभागामध्ये यंदा दहावीच्या परीक्षेत विभागात प्रथम आला असला तरी बुलडाणा जिल्ह्याचा गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.०९ टक्क्यांनी निकाल घसरला आहे. गेल्यावर्षी बुलडाणा जिल्ह्याचा निकाल हा ८९.१६ टक्के लागला होता. यंदा तो घटून ७७.०७ टक्के लागला आहे. प्रात्याक्षीक परीक्षांचे दिले जाणारे गुण देणे बंद केल्यामुळे हा निकाल घसरल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रश्नी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांच्याशी संपर्क साधला असता अलिकडील काळात प्रश्नपत्रिकांचे स्वरुप काहीसे बदलले आहे. काळानुरूप अभ्यासक्रमात बदल होत आहे. सोबतच ज्ञानरचनावादाच्या आधारावर प्रश्नपत्रिकांचे स्वरुप ठरू पाहत आहे. त्यामुळे घटलेला सरासरी निकाल हा प्रात्याक्षीक परीक्षांचे गुण देणे बंद केल्यामुळे घसरला असे म्हणणे संयुक्तीक ठरणार नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSSC Resultदहावीचा निकाल