शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

SSC Result 2019: अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:21 IST

अमरावती विभागामध्ये बुलडाणा जिल्हा निकालाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्याचा सरासरी निकाल ७७.०७ टक्के लागला असून अमरावती विभागामध्ये बुलडाणा जिल्हा निकालाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. असे असले तरी गत वर्षीच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्याचा सरासरी निकाल हा १२ टक्क्यांनी घटल्याचे वास्तव निकालाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.जिल्ह्यातील ५१८ शाळांतील ४० हजार ७०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी प्रत्यक्षात ४० हजार ४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३० हजार ८८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ही ७७.०७ टक्के आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ७२.९६ टक्के तर मुलींचे हे प्रमाण ८२.१२ टक्के आहे. परीक्षा दिलेल्या २२ हजार २२ हजार ९२ मुलांपैकी १६ हजार ११९ मुले उत्तीर्ण झाली. १७ हजार ९८० मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ हजार ७६५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक असून त्याची टक्केवारी ही ९०.१५ टक्के आहे. गेल्या वर्षीही सिंदखेड राजा तालुका जिल्ह्यात अव्वल होता. त्याची टक्केवारी ही ९४.९७ टक्के होती. दरम्यान, सिंदखेड राजाच्या खालोखाल चिखली तालुक्याचा ८५.८९ टक्के तर देऊळगाव राजा तालुक्याचा निकाल ८४.०९ टक्के लागलाा आहे. बुलडाणा तालुक्याचा निकाल ८३.६५ टक्के, मलकापूर तालुक्याचा ७५.९४ टक्के, खामगाव तालुक्याचा निकाल ७४.९४ टक्के, मोताला तालुक्याचा निकाल ७४.७५ टक्के, लोणार तालुक्याचा निकाल ७२.६५ टक्के, शेगाव तालुक्याचा निकाल ७२.१७ टक्के, मेहकर तालुक्याचा निकाल ७१.१६ टक्के, संग्रामपूर तालुक्याचा निकाल ६९.७९ टक्के, जळगाव जामोद तालुक्याचा ६८.८३ टक्के आणि सर्वात शेवटी तळाला नांदुरा तालुक्याचा ६७.८३ टक्के लागला आहे. गेल्यावर्षी नांदुरा तालुक्याचाच निकाल जिल्ह्यात सर्वात कमी लागला होता.१२ टक्क्यांनी निकालात घटबुलडाणा जिल्ह हा अमरावती विभागामध्ये यंदा दहावीच्या परीक्षेत विभागात प्रथम आला असला तरी बुलडाणा जिल्ह्याचा गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.०९ टक्क्यांनी निकाल घसरला आहे. गेल्यावर्षी बुलडाणा जिल्ह्याचा निकाल हा ८९.१६ टक्के लागला होता. यंदा तो घटून ७७.०७ टक्के लागला आहे. प्रात्याक्षीक परीक्षांचे दिले जाणारे गुण देणे बंद केल्यामुळे हा निकाल घसरल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रश्नी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांच्याशी संपर्क साधला असता अलिकडील काळात प्रश्नपत्रिकांचे स्वरुप काहीसे बदलले आहे. काळानुरूप अभ्यासक्रमात बदल होत आहे. सोबतच ज्ञानरचनावादाच्या आधारावर प्रश्नपत्रिकांचे स्वरुप ठरू पाहत आहे. त्यामुळे घटलेला सरासरी निकाल हा प्रात्याक्षीक परीक्षांचे गुण देणे बंद केल्यामुळे घसरला असे म्हणणे संयुक्तीक ठरणार नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSSC Resultदहावीचा निकाल