शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

४० एकर शेतातील सोयाबीन उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:38 IST

यासंदर्भात तालुका कृषी विभागाला ८ गावातील १५ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त आहेत.

- अझहर अलीलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी दुकानदारांकडून नामांकित कंपनीकडून उत्पादित सोयाबीन बियाणे खरेदी करून त्याची पेरणी केली, त्या बियाण्याची उगवणच न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ४० एकरातील सोयाबीन उगवले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात तालुका कृषी विभागाला ८ गावातील १५ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त आहेत. प्राप्त तक्रारींवर कृषी विभागाचे अधिकारी- कर्मचारी पंचनामे करीत आहेत. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. विविध कंपनीच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकºयांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.संग्रामपूर तालुक्यातील एकलारा ४, पळशी २, वरवट बकाल २, मोमिनाबाद १, वानखेड ३, काथरगाव १, पिंप्री १, मारोड १ अशा ८ गावातील १५ शेतकºयांनी तालुका कृषी कार्यालयाकडे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या. कृषी विभागाला सुरुवातीला एकलारा व पळशी येथील शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अधिकाºयांनी शेत शिवारात जाऊन पंचनामे केले. एक मीटर मधील प्लँट पापुलेशन नुसार सोयाबीन बियाण्याची उगम क्षमता केवळ १० ते १५ टक्के असल्याचे अहवाल कृषी विभागाने शेतकºयांना दिला. त्यामुळे सोयाबीन बियाणे निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाला प्राप्त विविध ८ गावातील १५ तक्रारींमध्ये विविध कंपन्यांचे सोयाबीन उगवले नसल्याचे नमूद आहे. एकूण ४० एकर क्षेत्रफळावरील सोयाबीन उगवले नसल्याने यावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. रविवारी ६ गावातील ९ शेतकºयांच्या तक्रारीवर कृषी विभागाकडून पंचनामे सुरू होते. बियाणे उगवले नसल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत करण्याची मागणी पुढे येत आहे.

बियाणे कंपन्यावर कारवाईची मागणीसंग्रामपूर तालुक्यात ४० एकर क्षेत्रावरचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. निकृष्ट दर्जाच्या बियाणे विकणाºया संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.

शेतकºयांना मदतीचा मुद्दाही ऐरणीवरकाबाडकष्ट करून तसेच कर्ज काढून सोयाबीती पेरणी केली. मात्र बियाणे उगवलेच नसल्याने ८ गावातील १५ शेतकºयांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे कृषी विभाग शेतकºयांना आर्थिक मदत मिळवून देणार की केवळ कागदोपत्री घोडे नाचवणार, हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.

शेतकरी नेत्यांची चुप्पीबोगस सोयाबीन बियाण्यांच्या मुद्द्यावर शेतकºयांचे आंदोलन करून मोठे झालेले काही शेतकरी नेत्यांनी याप्रकरणात चुप्पी साधली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांचा कुणीच वाली नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.तालुक्यातील प्राप्त तक्रारीनुसार पंचनामे केले जात आहेत. त्यापैकी काही सोयाबीन बियाण्यांची उगम क्षमता १० ते १५ टक्के असल्याचे प्राथमिक चौकशीअंती दिसून आले. तसा अहवालही उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आला आहे.-अमोल बनसोडेतालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी