शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

४० एकर शेतातील सोयाबीन उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:38 IST

यासंदर्भात तालुका कृषी विभागाला ८ गावातील १५ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त आहेत.

- अझहर अलीलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी दुकानदारांकडून नामांकित कंपनीकडून उत्पादित सोयाबीन बियाणे खरेदी करून त्याची पेरणी केली, त्या बियाण्याची उगवणच न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ४० एकरातील सोयाबीन उगवले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात तालुका कृषी विभागाला ८ गावातील १५ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त आहेत. प्राप्त तक्रारींवर कृषी विभागाचे अधिकारी- कर्मचारी पंचनामे करीत आहेत. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. विविध कंपनीच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकºयांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.संग्रामपूर तालुक्यातील एकलारा ४, पळशी २, वरवट बकाल २, मोमिनाबाद १, वानखेड ३, काथरगाव १, पिंप्री १, मारोड १ अशा ८ गावातील १५ शेतकºयांनी तालुका कृषी कार्यालयाकडे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या. कृषी विभागाला सुरुवातीला एकलारा व पळशी येथील शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अधिकाºयांनी शेत शिवारात जाऊन पंचनामे केले. एक मीटर मधील प्लँट पापुलेशन नुसार सोयाबीन बियाण्याची उगम क्षमता केवळ १० ते १५ टक्के असल्याचे अहवाल कृषी विभागाने शेतकºयांना दिला. त्यामुळे सोयाबीन बियाणे निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाला प्राप्त विविध ८ गावातील १५ तक्रारींमध्ये विविध कंपन्यांचे सोयाबीन उगवले नसल्याचे नमूद आहे. एकूण ४० एकर क्षेत्रफळावरील सोयाबीन उगवले नसल्याने यावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. रविवारी ६ गावातील ९ शेतकºयांच्या तक्रारीवर कृषी विभागाकडून पंचनामे सुरू होते. बियाणे उगवले नसल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत करण्याची मागणी पुढे येत आहे.

बियाणे कंपन्यावर कारवाईची मागणीसंग्रामपूर तालुक्यात ४० एकर क्षेत्रावरचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. निकृष्ट दर्जाच्या बियाणे विकणाºया संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.

शेतकºयांना मदतीचा मुद्दाही ऐरणीवरकाबाडकष्ट करून तसेच कर्ज काढून सोयाबीती पेरणी केली. मात्र बियाणे उगवलेच नसल्याने ८ गावातील १५ शेतकºयांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे कृषी विभाग शेतकºयांना आर्थिक मदत मिळवून देणार की केवळ कागदोपत्री घोडे नाचवणार, हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.

शेतकरी नेत्यांची चुप्पीबोगस सोयाबीन बियाण्यांच्या मुद्द्यावर शेतकºयांचे आंदोलन करून मोठे झालेले काही शेतकरी नेत्यांनी याप्रकरणात चुप्पी साधली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांचा कुणीच वाली नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.तालुक्यातील प्राप्त तक्रारीनुसार पंचनामे केले जात आहेत. त्यापैकी काही सोयाबीन बियाण्यांची उगम क्षमता १० ते १५ टक्के असल्याचे प्राथमिक चौकशीअंती दिसून आले. तसा अहवालही उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आला आहे.-अमोल बनसोडेतालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी