शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात दहा टक्के क्षेत्रावर रब्बी पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 15:41 IST

आतापर्यंत अवघ्या १० टक्के क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत जमीनतील ओलावा कमी झालेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी खोळंबली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या १० टक्के क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.अतिवृष्टीने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान भरून न निघणारे आहे. अति पावसाने जमीनीत ऐवढे पाणी साचले होते, की काही शेतकऱ्यांनी मोटारपंप लाऊन आपल्या शेतातील पाणी बाहेर काढले. सध्या शेतात पाणी साचलेले दिसत नसले तरी, जमीनीत अती ओलावा असल्याने मशागतीची कामे करणे अवघड आहे. या अतिपावसाचा परिणामा सध्या रब्बी हंगामावर होत आहे. रब्बी पेरणीसाठी शेतात ट्रॅक्टर टाकल्यानंतर या पेरणीयंत्राला चिखलाचे गोळे लागातात. त्यामुळे शेतकरी पेरणी करू शकत नाहीत. बुलडाणा तालुक्यासह मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, चिखली या भागामध्ये सध्या ही समस्या सर्वाधिक आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या उरकत नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात रब्बी हंगामाचे नियोजित क्षेत्र १ लाख ५७ हजार ७६० हेक्टर आहे. त्यामध्ये गहू, हरभरा पिकाचा पेरा सर्वाधिक असतो. परंतू सध्या कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यात अवघ्या १०.८० टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. १७ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडे आहे. यामध्ये जमीनीत असलेला अति ओलावा कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नदीपात्राच्या परिसरातील शेती निकामी!अतिवृष्टीमुळे नदीपात्राच्या परिसरातील शेती निकामी झाल्याचे दिसून येते. अनेक शेतामधील मातीच खरडून गेली आहे. जिल्ह्यातून पैनगंगासह इतर अनेक नदीपात्र वाहतात. त्या नदीपात्राच्या काठावरील शेतात खरीपाचे नुकसान झालेच; शिवाय रब्बी हंगामाची पेरणी करणेही अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे रब्बी पेरणीचे क्षेत्र झपाट्याने वाढत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

तालुका निहाय पेरणीजिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यात १ हजार १, संग्रामपूर तालुक्यात ३५२ हेक्टर, चिखली तालुक्यात १ हजार ३६० हेक्टर, देऊळगाव राजा तालुक्यात ४ हजार ७९६ हेक्टर, सिंदखेड राजा तालुक्यात ९ हजार ९६ हेक्टर, मोताळा तालुक्यात ४३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी