शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

अडीच लाख हेक्टरवर दुबार पेरणी

By admin | Updated: August 11, 2015 00:08 IST

पावसाचा लहरीपणा ; पेरणी क्षेत्रापैकी मोड व नापेर क्षेत्रही वाढले.

बुलडाणा : जून महिन्यानंतर पावसाने दीड महिना दडी मारली तरी जिल्ह्यात ८९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या; मात्र तब्बल दोन महिने पाऊस नसल्यामुळे बरेच क्षेत्र नापेर राहिले, तर काही शेतकर्‍यांनी पेरणी क्षेत्रात मोड म्हणजेच पेरलेले शेत वखरून टाकले. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास २ लाख ५२ हजार हेक्टरवर दुबार पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. कृषी विभागाने यंदा ७ लाख ४८ हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले. त्यापैकी ७ ऑगस्टपर्यत ६ लाख ६३ हजार म्हणजे ८९ टक्के पेरणी पूर्ण केली; मात्र मे महिन्याचा शेवटचा आठवडा सोडला, तर पुढे जून व जुलै पावसाने कायमस्वरूपी दडी मारली. पावसाआभावी काही ठिकाणी बियाणे उगवलीच नाही, तर बर्‍याच ठिकाणी लहान पिके कोमेजून सुकून गेल्यामुळे हताश झालेल्या शेतकर्‍यांनी आपल्या शेतात नांगर फिरवून पिके वखरून काढली. काही गावांतील निराश झालेल्या काही शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील उभ्या पिकावर जनावरे चरण्यास सोडली. यामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी पिकांची मोड होणारे संभाव्य क्षेत्र १ लाख ९३ हजार ४१६ हेक्टर निर्माण झाले आहे. त्यामुळे या मोड होणार्‍या पिक पेरणी क्षेत्रापैकी दुबार पेरणीचे संकट १ लाख ७१ हजार ४५९ हेक्टरवर निर्माण होणाची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्यात पहिल्याच आठवड्यात पावसाने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सरसरीपेक्षा जास्त पाऊस झाला. बर्‍याच ठिकाणी पूर आणि अतवृष्टीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. आधी पावसाने मारलेली दडी व नंतर अतवृष्टी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यानंतर आता शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून, कृषी विभागाकडून जिल्ह्यातील संभाव्य दुबार पेरणी होणारे क्षेत्र २ लाख ५२ हजार ८४७ हेक्टर एवढे वर्तविण्यात आले आहे.