शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 11:16 IST

Farmers in Buldhana District एक वर्षापासून आधार प्रमाणीकरण होत नसल्यामुळे  सहा हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र, कर्जमाफीच्या यादीत नाव असल्यावरही एक वर्षापासून आधार प्रमाणीकरण होत नसल्यामुळे  सहा हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत.           महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. बुलडाणा जिल्ह्यातील ३ लाख ६० हजार शेतकरी पीककर्जाचा लाभ घेतात. त्यापैकी १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र, जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी अजूनही आधार प्रमाणीकरण नसल्यामुळे कर्जमाफीपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीत नाव आहे. मात्र, एक वर्षापासून आधार प्रमाणीकरण झाले नाही. यावर्षी मार्च महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोनामुळे ऑनलाइन सेंटर बंद होते. त्यामुळे आधार प्रमाणीकरण होऊ शकले नाही. मात्र, त्यानंतर चार महिने झाल्यावरही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने त्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागत आहे. यासोबतच पीककर्जाची थकबाकी न ठेवता नियमित परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सरसकट देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षापूर्वी केली होती; परंतु अद्याप शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळाले नाहीत. 

जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी आधार कार्ड प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे पीककर्जापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांनी त्वरित आधार कार्ड प्रमाणीकरण करण्याची गरज आहे.-उत्तर मनवर, व्यवस्थापक, लिड बँक, बुलडाणा

टॅग्स :Farmerशेतकरीkhamgaonखामगावbuldhanaबुलडाणा