शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
3
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
4
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
5
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
6
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
7
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
8
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
9
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
10
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
11
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
12
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
13
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
14
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
15
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
16
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
17
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
18
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
19
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
20
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब..बांधावरचे वाद सोडवले, आता वाटण्याही करून द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

बांधाच्या वादाचे अनेक प्रकरणे न्यायालयात खितपत पडून आहेत. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे धुरे नामशेष झाले आहेत. पूर्वी बैलांना चारा मिळावा, म्हणून ...

बांधाच्या वादाचे अनेक प्रकरणे न्यायालयात खितपत पडून आहेत. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे धुरे नामशेष झाले आहेत. पूर्वी बैलांना चारा मिळावा, म्हणून धुरे राखून ठेवल्या जायचे. त्यामुळे पावसाचे पाणी व्यवस्थित शेताबाहेर जात होते. आता पाऊस थोडा जरी अधिक झाला तर एका एका शेतातून दुसऱ्या शेतात पाणी जाते. परिणामी, वाद उद्भवतात. या वादाने रक्ताची नाती दुरावली, किरकोळ कारणावरून न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांमुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक गोची झाली. यावर तोडगा काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गावपातळीवर पोलीस पाटील, सरपंच, तलाठी यांना विश्वासात घेऊन भांडणाचे मूळ शोधून त्या-त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील सवडद, गुंज, वरोडी, जागदरी, मलकापूर पांग्रा, राताळी, साखरखेर्डा, मोहखेड, लोणी लव्हाळा, हिवरा आश्रम, शिंदी हनवतखेड येथे जाऊन सामंजस्यातून किरकोळ वादाला मूठमाती दिली.

'बांधांच्या वादाचे निवारण बांधावर'

बांधावरचे वाद मिटविणे हे काम महसूल विभागाचे असले तरी प्राथमिक तक्रार ही पोलीस ठाण्यातच शेतकरी घेऊन येतात. यामध्ये त्यांचा वेळ, पैसा खर्च होतोच. शिवाय वैरभाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. याची दखल घेत ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी 'बांधांच्या वादाचे निवारण बांधावर' या उपक्रमांतर्गत महसूल विभाग आणि गावपातळीवरील संबंधित लोकांना सोबत घेऊन पुढाकार घेतला.

बांधाचे वाद सोडविण्यासाठी आपण सामाजिक हेतूने प्रयत्न केला. हे वाद उद्भवण्याची कारणे अनेक आहेत. वाढत्या लोकसंख्येने क्षेत्रफळ कमी झाले आहे. निसर्गाच्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावली जात नाही, त्यामुळे पेरणीपूर्व वाद टाळण्यासाठी उन्हाळ्यात शेतमोजणी करणे आवश्यक आहे.

-जितेंद्र आडोळे सहा.पोलीस निरीक्षक

पोलीस स्टेशन, साखरखेर्डा.