शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

राज्यातील ५२९ गावांमध्ये ‘श्वासानंद’ नामजप अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 16:50 IST

हा नामजप आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत घेण्यात आला असला तरी हे अभियान कार्तिक पोर्णिमेपर्यंत सुरू होते. 

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : चातुर्मासानिमित्त राज्यातील ५२९ गावांमध्ये श्वासानंद नामजप अभियान राविण्यात आले. ‘ॐ ब्रह्मी श्वासानंदाय नम:’ असा हा नामजप आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत घेण्यात आला असला तरी हे अभियान कार्तिक पोर्णिमेपर्यंत सुरू होते. मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर संस्थानमध्ये जन्मलेले एकोणिसाव्या शतकातील संत बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद माऊली यांना इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या धर्मक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाते. त्यांच्या गुरुगादीवरील चौथे उत्तराधिकारी अ‍ॅड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या आदेशाने त्यांच्या भक्तांतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ५२९ लहानमोठ्या गावांमध्ये ‘श्वासानंद नामजप अभियान’ राबविण्यात आले. एकाचवेळी एवढ्या गावांमध्ये सारख्याच पद्धतीने शिस्तबद्धरित्या राबविल्या गेलेल्या या उपक्रमाची आध्यात्मिक प्रांतात विशेष दखल घेतल्या जात आहे.संत बाळाभाऊ महाराज यांचा भक्तवर्ग राज्यात आणि देशातच नव्हे तर विदेशातही विखुरलेला आहे. गुरुभक्तांच्या या विशाल संप्रदायाचे संवाहक विद्यमान पीठाधीश अ‍ॅड. रंगनाथ महाराज पितळे यांनी महाराजांच्या महामंत्राचा सामुहिक नामजप करण्याची प्रेरणा दिली. आणि राज्यस्तरीय नामजप अभियान समिती गठित होऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. चातुर्मासातील चार महिन्यांचा पवित्र कालावधी या अभियानासाठी निवडण्यात आला. या उपक्रमाच्या विशेष नोंदपुस्तिका तयार करण्यात येऊन त्या राज्यस्तरीय समितीचे संयोजक सुरेश बोचरे (औरंगाबाद), सहसंयोजक श्रीरंग सावजी (मेहकर), श्वासानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष आशिष उमाळकर यांच्या नेतृत्वाखालील चमूने महाराष्ट्रात सर्वत्र पोचविल्या. या उपक्रमाला गुरुभक्तांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. अभियानाची सांगता चातुर्मास समाप्तीनंतर मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर संस्थानमध्ये गायत्री परिवाराच्या पौरोहित्याखाली विधिवत होम-हवन करून या अभियानाची सांगता करण्यात आली. कार्तीक पोर्णिमेला या अभियानाची सांगता झाली. मुंबईपासुन ते चंद्रपूरपर्यंत एकूण ५२९ गावांमध्ये ठरविलेल्या पद्धतीनुसार शिस्तबद्धरीतीने हे अभियान राबविण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक