शहरं
Join us  
Trending Stories
1
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
2
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
3
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
4
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
5
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
6
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
7
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
8
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
9
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
10
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
11
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
12
बॉलिवूडवर शोककळा! पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
14
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
15
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
16
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
17
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
18
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
19
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
20
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात

राज्यातील ५२९ गावांमध्ये ‘श्वासानंद’ नामजप अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 16:50 IST

हा नामजप आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत घेण्यात आला असला तरी हे अभियान कार्तिक पोर्णिमेपर्यंत सुरू होते. 

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : चातुर्मासानिमित्त राज्यातील ५२९ गावांमध्ये श्वासानंद नामजप अभियान राविण्यात आले. ‘ॐ ब्रह्मी श्वासानंदाय नम:’ असा हा नामजप आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत घेण्यात आला असला तरी हे अभियान कार्तिक पोर्णिमेपर्यंत सुरू होते. मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर संस्थानमध्ये जन्मलेले एकोणिसाव्या शतकातील संत बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद माऊली यांना इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या धर्मक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाते. त्यांच्या गुरुगादीवरील चौथे उत्तराधिकारी अ‍ॅड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या आदेशाने त्यांच्या भक्तांतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ५२९ लहानमोठ्या गावांमध्ये ‘श्वासानंद नामजप अभियान’ राबविण्यात आले. एकाचवेळी एवढ्या गावांमध्ये सारख्याच पद्धतीने शिस्तबद्धरित्या राबविल्या गेलेल्या या उपक्रमाची आध्यात्मिक प्रांतात विशेष दखल घेतल्या जात आहे.संत बाळाभाऊ महाराज यांचा भक्तवर्ग राज्यात आणि देशातच नव्हे तर विदेशातही विखुरलेला आहे. गुरुभक्तांच्या या विशाल संप्रदायाचे संवाहक विद्यमान पीठाधीश अ‍ॅड. रंगनाथ महाराज पितळे यांनी महाराजांच्या महामंत्राचा सामुहिक नामजप करण्याची प्रेरणा दिली. आणि राज्यस्तरीय नामजप अभियान समिती गठित होऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. चातुर्मासातील चार महिन्यांचा पवित्र कालावधी या अभियानासाठी निवडण्यात आला. या उपक्रमाच्या विशेष नोंदपुस्तिका तयार करण्यात येऊन त्या राज्यस्तरीय समितीचे संयोजक सुरेश बोचरे (औरंगाबाद), सहसंयोजक श्रीरंग सावजी (मेहकर), श्वासानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष आशिष उमाळकर यांच्या नेतृत्वाखालील चमूने महाराष्ट्रात सर्वत्र पोचविल्या. या उपक्रमाला गुरुभक्तांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. अभियानाची सांगता चातुर्मास समाप्तीनंतर मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर संस्थानमध्ये गायत्री परिवाराच्या पौरोहित्याखाली विधिवत होम-हवन करून या अभियानाची सांगता करण्यात आली. कार्तीक पोर्णिमेला या अभियानाची सांगता झाली. मुंबईपासुन ते चंद्रपूरपर्यंत एकूण ५२९ गावांमध्ये ठरविलेल्या पद्धतीनुसार शिस्तबद्धरीतीने हे अभियान राबविण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक