शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अयोध्येत श्रीराम मंदिर निर्मितीशिवाय स्वस्थ बसणार नाही - शक्ती शांतानंद महर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:05 IST

चिखली : भारतात रामराज्याची पुनस्र्थापना करण्याची सुरुवात अयोध्ये तील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यापासून करायची आहे.  त्यासाठी गेल्या २७ वर्षांपासून दरवर्षी रामराज्य रथयात्नेच्या माध्यमातून  जनजागृती व जनसंघटन सुरू आहे. या अभियानाची सांगता मंदिर निर्मि तीनेच होईल व अयोद्धेत श्रीराम मंदिर निर्माण केल्याशिवाय स्वस्थ  बसणार नाही, असा निर्धार कोल्लूर (कर्नाटक) येथील मुकाम्बिका  पीठाचे शक्ती शांतानंद महर्षी यांनी केले. 

ठळक मुद्दे मंदिर उभारण्याचा रामराज्य रथयात्रेत एकमुखी निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : भारतात रामराज्याची पुनस्र्थापना करण्याची सुरुवात अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यापासून करायची आहे.  त्यासाठी गेल्या २७ वर्षांपासून दरवर्षी रामराज्य रथयात्नेच्या माध्यमातून  जनजागृती व जनसंघटन सुरू आहे. या अभियानाची सांगता मंदिर निर्मि तीनेच होईल व अयोद्धेत श्रीराम मंदिर निर्माण केल्याशिवाय स्वस्थ  बसणार नाही, असा निर्धार कोल्लूर (कर्नाटक) येथील मुकाम्बिका  पीठाचे शक्ती शांतानंद महर्षी यांनी केले. अयोध्या ते रामेश्‍वरम रामराज्य रथयात्नेचे २४ फेब्रुवारी रोजी चिखलीत  आगमन झाले होते. यानिमित्त आयोजीत सभेत ते बोलत होते. शक्ती शां तानंद महर्षी यांच्या निर्धाराला उपस्थितांनी एकमुखी पाठिंबा दिला. तत्पूर्वी  शेगाव मार्गे चिखलीत दाखल झालेल्या रामराज्य रथयात्रेचे श्री  खटकेश्‍वर महाराज संस्थानमध्ये रथयात्नेचे उत्साहात स्वागत झाले. तेथून  चौफुली - बसस्थानक - शिवाजी चौक - जयस्तंभ चौक - सिमेंट रोड  - चिंच परिसर मार्गे रथयात्ना श्रीराम मंदिर (रामदासी) येथे पोहोचली.  मार्गात जागोजागी स्वागत कमानी, सडा, रांगोळ्या, पुष्पवृष्टी, फटाक्यांची  आतषबाजी करून नागरिकांनी रथयात्नेचे स्वागत केले. जयस्तंभ चौकात  युवा प्रतिष्ठानने पुष्पवृष्टी केली, तर चिंच परिसरात गजानन महाराज सेवा  समितीच्यावतीने पताका, तोरणे लावून, मशाली पेटवून व दिव्यांची  आरास करून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. रथयात्नेच्या  मार्गात अनेकांनी पाणी वाटप केले. ‘आम्ही चिखलीकर’ ढोल-ताशा प थक व रामनामाच्या जयघोषांनी आसमंत निनादून गेला होता. श्रीराम  मंदिरासमोर महाआरती पार पडल्यानंतर आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात  जाहीर सभा झाली. त्यावेळी शक्ती शांतानंद महर्षी, परागबुवा रामदासी,  प्रभाकरबुवा रामदासी, अरुणानंद महाराज आणि लंके महाराज उपस्थित  होते. गजानन हिंगे, हरिहर सोळंके, मंगेश देशमुख, शंकर देशमुख, रवी  महाजन, शशिकांत शेडगे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन  सुधीर लंके व प्रा. प्रमोद देशपांडे तर आभार परागबुवा रामदासी यांनी  मानले.

टॅग्स :ChikhliचिखलीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर