शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गेले दिगंबर ईश्वर विभूती...राहिल्या त्या कीर्ती जगामाजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 10:54 IST

Shivshankarbhau Patil funeral in Shegaon : श्री गजानन महाराज की जय’ या श्लोकाचा गजर करीत भाऊंना अखेरचा निरोप दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ‘गेले दिगंबर ईश्वर विभूती...राहिल्या त्या कीर्ती’ या अंभगाचे स्वर कानावर पडताच बुधवारी अवघी विदर्भ पंढरी शोकसागरात बुडाली. भरत खंडाला व्यवस्थापनाचे धडे देणारा व्यवस्थापन गुरू ब्रम्हात सामावल्याचे समजताच, बुलडाणा जिल्ह्यातील अनेकांची पावलं, शेगावकडे धावली. भाऊंना कृतीशीलतेतून श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी कमालिच्या शिस्तीत शेगावकर एकवटले. व्यावसायिकांनी लागलीच आपली प्रतिष्ठाने बंद केलीत. क्षर्णाधात अवघे शेगाव शांत झाले. अनेकांच्या डोळ्यांना अश्रृधारा लागल्या... निमित्त होते ते कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या अंत्यसंस्काराचे.कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन झाल्याचे सायंकाळी ५ वाजता जाहीर झाले. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील विविध संस्थानचे पीठाधीश, वारकरी, किर्तनकार ताबडतोब संत नगरीत दाखल झाले. श्री गजानन महाराज संस्थान सोबतच नागझरी येथील गोमाजी महाराज संस्थान, संत भोजने महाराज संस्थान अटाळी, जागृती आश्रम, दत्तुजी महाराज संस्थान, सखाराम महाराज संस्थान इलोरा, हनुमान संस्थान वारी हनुमान, बर्डेश्वर संस्थान तरवाडीचे पदाधिकारी आणि विश्वस्त शेगावकडे धावले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, शेगावचे प्रभारी तहसिलदार डॉ. सागर भागवत, यांच्यासह श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, श्रीराम पुंडे आणि रफीकसेठ भाऊंच्या निवासस्थानी पोहोचले. ना.डॉ. शिंगणे, आ.अ‍ॅड. आकाश फुंडकर, आ. डॉ. संजय कुटे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

‘अनंत कोटी ब्रम्हाड नायक’चा गजर!हरिपाठानंतर ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता’... या अभंगासोबतच गेले दिगंबर ईश्वर विभूती...राहिल्या त्या कीर्ती जगामाजी...या अभंगांनी भाऊंच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. तोच संत नगरीतील आबाल वृध्दांनी ‘अनंत कोटी ब्रम्हाड नायक...महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सचितानंद भक्तप्रतीपालक शेगाव निवासी समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जय’ या श्लोकाचा गजर करीत भाऊंना अखेरचा निरोप दिला.

मोहन भागवतांची शोकसंवेदना!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत यांनी भ्रमणदूरध्वनीद्वारे आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्यात. आ. निळकंठदादा पाटील यांच्याशी संवाद साधून सरसंघचालकांनी ‘भाऊं’प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

दीडतासात अंत्यसंस्काराचे नियोजनभरत खंडातील व्यवस्थापनाचे गुरू असलेल्या शिवशंकर भाऊ पाटील यांच्या अंत्यसंस्काराचे नियोजन अवघ्या दीड तासात श्री गजानन महाराज संस्थानने केले. कोरोना काळात गर्दी होणार नाही, याची संपूर्ण खबरदारी श्री गजानन महाराज संस्थानने भाऊंच्या अंत्यसंस्काराप्रसंगी प्रामुख्याने पाळली.

सर्व धर्मियांची हजेरी!शिवशंकरभाऊंच्या निधनाची वार्ता वाºयासारखी शेगावात पसरताच, अनेकांची पाऊले भांऊच्या घराच्या दिशेने वळली. गर्दी टाळत काहींनी बाळापूर रोडपरिसरातील इमारतींचा आसरा घेतला. सर्वच धर्मातील गणमान्य आणि मान्यवरांनी भाऊंना श्रध्दांजली अर्पण केली.

गर्दी टाळण्याचे आवाहनव्यवस्थापन गुरूंच्या अंत्यविधीला अजिबात गर्दी होणार नाही, शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे व मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्याचे जाहीर करीत निळकंठदादा पाटील, श्रीकांतदादा पाटील यांनी गर्दी टाळण्याचे आवाहन केले. ‘आपण आमच्या दु:खात सहभागी आहातच...घरुनच श्रध्दांजली अर्पण करावी’ अशी भावनिक सादही भाऊंच्या निधनानंतर पाटील परिवाराच्यावतीने घालण्यात आली. शेगावकरांनीही या आवाहनाला प्रतिसाद देत, भाऊंच्या निवासस्थानाऐवजी परिसरातील इमारतींवरूनच भाऊंचे अखेरचे दर्शन घेतले. 

टॅग्स :Shegaonशेगावkhamgaonखामगाव