शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिवसेना व युवासेनेचे मोबाइल टॉवरवर 'शोले स्टाइल' आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 19:26 IST

'Sholay Style' agitation on mobile tower :युवासेना तालुका प्रमुख नंदू कऱ्हाडे यांनी मोबाइल टॉवरवर चढून याकडे लक्ष वेधले.

चिखली : गत काही दिवसांपासून तालुक्यातील नागरिकांना मोबाइल रेंजच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराने ऑनलाइन शिक्षण, आरोग्य, शेती आदी सर्वच बाबींच्या सुविधा प्रभावित झाल्या आहेत. तथापि, कॉलड्रॉप होणे व नेटवर्क गायब होणे, या बाबी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याची दखल घेत शिवसेना व युवासेनेच्या वतीने १० जुलै रोजी आंदोलन करण्यात आले, तर युवासेना तालुका प्रमुख नंदू कऱ्हाडे यांनी मोबाइल टॉवरवर चढून याकडे लक्ष वेधले.

चिखली शहराला लागूनच असलेल्या खोर, माळशेंबा, अंत्री, वाघापूर, चांधई, गोद्री, पळसखेड दौलत, भोकर या गावांमध्ये मोबाइल रेंजची मोठी समस्या आहे. यामुळे ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत असून, विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सोबतच आजारपणात तत्काळ सेवा उपलब्ध करून देणाऱ्या १०८ नंबरवरदेखील सामान्य नागरिकांना फोन करता येत नाही. शेतीसह इतर सर्वच क्षेत्रांशी निगडित योजना या ऑनलाइन असल्याने त्यांचा लाभ घेण्यासही नागरिकांना त्रास होत आहे. या समस्यांचा पाढा नागरिकांनी शिवसेना संपर्क कार्यालयात मांडल्यानंतर नंदू कऱ्हाडे यांच्यासह प्रीतम गैची, पप्पू परिहार, आनंद गैची, प्रवीण सरदड, पंकज हाके, प्रदीप माळोदे यांनी पुढाकार घेत खोर येथील टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. दरम्यान, शिवसेना पदाधिकाऱ्यांनीदेखील यामध्ये सहभाग घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख भास्करराव मोरे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, विलास घोलप, समाधान जाधव, दत्ता देशमुख, मंगेश ठेंग, शेख बबलू, बंटी कपूर, साजीद, सरपंच दीपक पाटील, ज्ञानेश्वर वाघ, पो.पा. सुरेश पाटील, रमेश पाटील, अशोक मोहिते, अंकुश डहाके, राजू लोखंडे, दत्ता मैद, सोमनाथ तायडे, बंटी पांडे, वसंता साखरे, राजू बोरे, राजू कारले, जना पाटील, मदन कारले, बाळू कऱ्हाडे, प्रल्हाद कऱ्हाडे, प्रदीप माळोदे, योगेश डुकरे, गजानन पारवे, दीपक पांडे, प्रदीप वाघ, समाधान मोरे, अमोल मोरे, गोपाल डुकरे, पल्हाद राणा, संजय पवार यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.आठ दिवसांत समस्या साेडविण्याचे आश्वासन

तहसीलदार येळे यांच्या मध्यस्तीने मोबाइल कंपनीचे प्रतिनिधी पांडे यांना धारेवर धरले असता आठ दिवसांच्या आत मोबाइल टाॅवरची फ्रिक्वेंसी वाढविण्यासह समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन संबंधितांनी दिले आहे.

टॅग्स :Chikhliचिखलीagitationआंदोलन